शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय इयत्ता नववी

इयत्ता नववी इतिहास शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ – 

अ) डॉ. विजय भटकर 

ब) डॉ. आर. एच. दवे

क) पी. पार्थसारथी

ड) वरीलपैकी कोणीही नाही. 

उत्तर :

परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ – डॉ. विजय भटकर 

2) जीवन शिक्षण हे मासिक ………… या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. 

अ) बालभारती 

ब) विद्या प्राधिकरण

क) विद्यापीठ शिक्षण आयोग

ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

उत्तर :

जीवन शिक्षण हे मासिक विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. 

3) आय. आय. टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. 

अ) कृषी

ब) वैद्यकीय

क) कुशल दर्जाचे व्यवस्थापन 

ड) अभियांत्रिकी

उत्तर :

अभियांत्रिकी

प्रश्न. 2. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील पुढील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंध तक्ता पूर्ण करा. 

 व्यक्ती 

 कार्य  

  भारताचे पहिले शिक्षणमंत्री

 ……………….. 

  ……………………

  विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष

  प्रा. सय्यद राऊफ 

 …………………. 

  ……………….

  कोसबाड प्रकल्प

उत्तर :

 व्यक्ती 

 कार्य  

  भारताचे पहिले शिक्षणमंत्री

  मौलाना अबुल कलाम आझाद   

  डॉ. डी. एस. कोठारी

  विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष

  प्रा. सय्यद राऊफ 

 इयत्ता 1 ली ते ७ वी च्या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करणे

  अनुताई वाघ

  कोसबाड प्रकल्प


2) ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिचर्य अँड ट्रेनिंग’ या संस्थेची माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा व ती माहिती ओघ तक्त्याच्या स्वरूपात लिहा. 

उत्तर :

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. 

उत्तर :

कारण – i) १९९४ मध्ये ‘खडू-फळा’ योजनेचा विस्तार करून १०० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एका जादा शिक्षकाच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. 

ii) मुलींच्या  शाळा, अनुसूचित जाती-जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. 

iii) शिक्षक भरतीत ५०% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. 

iv) १९९४ मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचे ठरले. म्हणून जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला.

2) NCERT ची स्थापना करण्यात आली. 

उत्तर :

कारण – i) केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा NCERT चा मुख्य उद्देश आहे. 

ii) या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका वठवली. 

iii) तसेच NCERT ने राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. 

iv) शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन – अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा यांसारखे उपक्रम राबवले म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली. 


3) भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. 

उत्तर :

कारण – i) कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, आर्थिक वनस्पतिशास्त्र इत्यादी विभागांद्वारे भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कार्य सुरू झाले. 

ii) या संस्थेद्वारे गहू, कडधान्ये, गळिताची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. 

iii) या संस्थेची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. त्यामुळे भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. 


प्रश्न. 4. टिपा लिहा. 

1) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ

उत्तर :

i) देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 

ii) १९७४ मध्ये सरकारने पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्यांच्या सूचनांनुसार व शिफारशींनुसार २० सप्टेंबर १९८५ रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. 

iii) या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. 

iv) विद्यापीठाने १९९० मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक्-श्राव्य पद्धतीने दूरस्थ शिक्षण कार्यक्रम सुरू केला. 

v) या विद्यापीठाने विविध शाखांमधून एक हजारांहून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात ५८ प्रशिक्षण केंद्रे, परदेशात ४१ केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केली.

2) कोठारी आयोग

उत्तर :

i) १९६४ मध्ये डॉ. डी. एस. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला. तो कोठारी आयोग होय. 

ii) या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील १० + २ + ३ या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. १९७२ पासून ही व्यवस्था अंमलात आली. 

iii) कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा, हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा, शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढशिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. 

iv) अनुसूचित जाती-जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चावरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या. 

v) महाराष्ट्र राज्याने १० + २ + ३ ही शैक्षणिक रचना १९७२ मध्ये स्वीकारून १९७५ मध्ये दहावीची पहिली शालान्त परीक्षा घेतली. 

3) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर

उत्तर :

i) भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांत मोलाचे संशोधन केले. 

ii) अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले.


4) बालभारती

उत्तर :

i) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) या संस्थेची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे झाली. 

ii) शालेय विदयार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. 

iii) मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगु या आठ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. 

iv) ‘किशोर’ हे विदयार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित करते.

प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1) खडू – फळा (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता ?

उत्तर :

‘खडू – फळा’ (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता. 

i) प्राथमिक शाळेत मुलांची १००% उपस्थिती : प्राथमिक शाळेत जास्तीत जास्त मुलांची उपस्थिती १००% टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढेल. सर्व शिक्षित होईल.

ii) विद्यार्थी गळती रोखने : प्राथमिक म्हणजे १ ली ते ५ वी गळतीचे प्रमाण जे ४६% आहे. व ५ वी ते १० पर्यंतचे गळतीचे प्रमाण ६०% पर्यंत आहे. ते अनुक्रमे २०% आणि ४०% घटविण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे सर्व शिक्षित होईल.

iii) मुलींचे शिक्षण : या योजनेअंतर्गत ज्या मुली सामाजिक व आर्थिक कारणाने शाळेत येवू शकत नाहीत त्यांना अनौपचारिक शिक्षणातून शिक्षण प्रवाहात आणणे हा उद्देश आहे.

iv) दिव्यांगासाठी शिक्षण : दिव्यांगासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असल्याने या योजनेअंतर्गत त्यासाठी शिक्षणाची सोय केली आहे.

v) प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन : प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन करून अभ्यासक्रमात पुनर्रचना करण्यात आली आहे. पाठाचा बोजा अभ्यासक्रमातून घटविण्यात आला असून पाठांतरावरील भर कमी केला आहे.

vi) पर्यायी शिक्षण : या योजनेत प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाचीही सोय केली आहे. व्यावसायिक शिक्षणाची गरज अभ्यासासाठी त्या जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात येते. आणि त्याआधारे मनुष्यबळाची गरज पाहून हे अभ्यासक्रम दिले जातात.

vii) समाजजागृती : शिक्षणामुळे समाजजागृती घडून येते. प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला तर अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी, परंपरा नष्ट होईल. समाज शिक्षित झाला तर समाजाची प्रगती होईल. देशाचा विकास होईल. या योजनेअंतर्गत समाजजागृती घडविण्याचाही उपक्रम राबविला आहे.


2) शेतीच्या विकासात कृषी विद्यालये / महाविदयालये कोणती भूमिका बजावतात ?

उत्तर :

शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविदयालये यांची भूमिका –

i) देशातील सर्व कृषी विद्यापीठातून आधुनिक तंत्राचे कृषी शिक्षण दिले जाते. कृषी संशोधनही त्याच पद्धतीने चालते. 

ii) संकरित, सुधारीत शेती संशोधनाबरोबर आता जनुक बदल, एरोपॉनिक, हायटेक संशोधन केले जाते. 

iii) मात्र गेल्या काही वर्षांपासून काही अध्यात्मिक शिक्षकांनी सेंद्रिय व वैदिक शेतीचे प्रयोग सुरू करून त्याचा प्रचार व प्रसार केला आहे. हा संकल्प पूर्णत्वाला नेण्याच्या प्रक्रियेत कृषी विद्यालयांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. 

iv) शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर किफायतशीर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शेती विकसित झाली पाहिजे. कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सक्षम शेती करून दाखविली पाहिजे यासाठी शेतीच्या विकासात कृषी विद्यालये/ महाविद्यालये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.


3) भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा. 

उत्तर :

भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती – i) ‘भारतीय वैद्यकीय उत्तर अनुसंधान परिषद’ या संस्थेने विविध रोगांवर संशोधन करणारी २६ केंद्रे देशभर सुरू केली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. 

ii) याच क्षेत्रातील प्रगत वैदयकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थेची स्थापना झाली. 

iii) या संस्थेवर वैदयकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली. 

iv) वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविदयालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. 

v) सर्वसामान्यांना माफक दरात वैदयकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. 

iv) सरकारने वैदयकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी १९५८ मध्ये ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेचे पुनर्गठन केले. या संस्थेवर वैदयकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली. 

4) तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा. 

उत्तर :

i) ‘स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ – या उपक्रमाअंतर्गत शाळेचा परिसर व त्याबाहेरील परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगितले जाते.

ii) पर्यावरण संरक्षण – पर्यावरण संरक्षणासंबंधी ‘झाडे लावा जीवन जगवा’, ‘वृक्षदिंडी’ हे उपक्रम राबविल्या जातात. या उपक्रमांद्वारे झाडांचे महत्त्व सर्वांना पटवून दिले जाते.

iii) मुली वाचवा – ‘मुलगी ही ओझ नसून ती दोन्ही घरांचा उद्धार करणारी असते,’ हे सर्वांना समजावून सांगण्यासाठी ‘मुली वाचवा’ हा उपक्रम शालेय आणि सहशालेय यांच्या मार्फत राबविल्या जातो. या उपक्रमाअंतर्गत मुलींचे मोफत शिक्षण, भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा, मुलींची सर्व क्षेत्रातील प्रगती यासंबंधी माहिती दिली जाते.

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय

आर्थिक विकास स्वाध्याय

आर्थिक विकास स्वाध्याय

इयत्ता नववी इतिहास आर्थिक विकास स्वाध्याय

आर्थिक विकास स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न. 1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) १९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ………… बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

अ) १२ 

ब) १४ 

क) १६ 

ड) १८ 

उत्तर :

१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख १४ बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

2) वीस कलमी कार्यक्रमाची …………….. यांनी घोषणा केली. 

अ) पं. नेहरू 

ब) लालबहादूर शास्त्री

क) इंदिरा गांधी

ड) पी. व्ही. नरसिंहराव

उत्तर :

वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली. 

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) कावसजी दावर – पोलादाचा कारखाना

2) डॉ. दत्ता सामंत – गिरणी कामगारांचे नेतृत्त्व

3) ना. मे. लोखंडे – गिरणी कामगारांना सुट्टी

4) नारायण सुर्वे – कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन

उत्तर :

चुकीची जोडी :  कावसजी दावर – पोलादाचा कारखाना

प्रश्न. 2. अ) दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. 

तक्ता पूर्ण करा. 

 पंचवार्षिक योजना 

 कालावधी  

 उद्दिष्टे  

  पहिली 

  ………..

 शेती, सामाजिक विकास

  दुसरी

 १९५६ – १९६१ 

 औद्योगिकीकरण 

  तिसरी 

 ………. 

  विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ

  …………

 १९६९ – १९७४ 

शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन 

 पाचवी 

 …………

 …………

उत्तर :

 पंचवार्षिक योजना 

 कालावधी  

 उद्दिष्टे  

  पहिली 

 १९५१ – १९५६ 

 शेती, सामाजिक विकास

  दुसरी

 १९५६ – १९६१ 

 औद्योगिकीकरण 

  तिसरी 

 १९६१ – १९६६ 

  विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ

  चौथी

 १९६९ – १९७४ 

शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंबनियोजन 

 पाचवी 

 १९७४ – १९७९ 

 आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे 

ब) टिपा लिहा.  

1) मिश्र अर्थव्यवस्था

उत्तर :

i) प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. 

ii) मिश्र अर्थव्यवस्था ही खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

iii) आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थेला’ भारताने प्राधान्य दिले. 

iv) या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र व संयुक्त क्षेत्र असे तीन भाग दिसून येतात. 

v) मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खासगी व सार्वजनिक क्षेत्र यांत सुसंवाद असणे गरजेचे असते. तसेच या अर्थव्यवस्थेचे एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग.

2) वीस कलमी कार्यक्रम

उत्तर :

१ जुलै १९७५ रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत.

i) शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे. 

ii) कामगारांचा उदयोगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. 

iii) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. 

iv) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. 

v) हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. 

उत्तर :

कारण – i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात.  

ii) तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. 

iii) परंतु मिश्र अर्थव्यवस्था ही खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

iv) आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्था’ ही सर्वांधिक योग्य अर्थव्यवस्था ठरली. त्यामुळे स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला.

2) १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

उत्तर :

कारण – i) भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. 

ii) राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या आकाशवाणीवरील भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की, आपली उद्दिष्ट्ये लवकर साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

iii) आतापर्यंत बँक कर्जासाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्र काहीसे दुर्लक्षित राहिले आहे. शेती, लघु उद्योग तसेच निर्यात यांना पुरेसा कर्जपुरवठा व्हावा, बँकांवरील मोजक्या लोकांचे नियंत्रण रद्द व्हावे, बँकांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिकतेची जोड मिळावी, नवीन उद्योजक वर्गाला प्रोत्साहन दयावे, बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे. तसेच त्यांच्या नोकरीच्या शर्ती चांगल्या असाव्यात. यासाठी १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

3) गिरणी कामगार संपावर गेले. 

उत्तर :

कारण – i) १९८१ च्या दिवाळीत कामगारांना २०% बोनसची अपेक्षा होती. 

ii) कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून, कामगार वर्गाला विश्वासात न घेता ८ ते १७% वर तडजोड केली. 

iii) बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली. काही कामगार डॉ. दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 

iv) ६५ गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्याचे नेतृत्त्व दत्ता सामंत करू लागते. त्यामुळे गिरणी कामगार संपावर गेले.


प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1) आठव्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले. 

उत्तर :

आठव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आले. 

i) प्रधानमंत्री रोजगार योजना. 

ii) महिला समृद्धी योजना. 

iii) राष्ट्रीय सामाजिक, आर्थिक साहाय्य योजना.

iv) मध्यान्ह आहार योजना. 

v) इंदिरा महिला योजना

vi) गंगा कल्याण योजना.


2) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले. 

उत्तर :

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पुढील प्रकल्प सुरू करण्यात आले.

i) दुर्गापूर, भिलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, पेरांबुरचा आगगाडीच्या डब्यांचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंदयांचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. 

ii) शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी भाक्रा-नांगल, दामोदर यांसारखी प्रचंड धरणे उभारण्यात आली.

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय

उपयोजित इतिहास स्वाध्याय

उपयोजित इतिहास स्वाध्याय 

इयत्ता दहावी तिसरा धडा उपयोजित इतिहास स्वाध्याय 

१. अ ) दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय …………. या शहराचे उत्खनन करताना सापडले.

उत्तर : जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उर  या शहराचे उत्खनन करताना सापडले.

2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार …………. येथे आहे.

उत्तर : भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार दिल्ली  येथे आहे.

ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. 

1. कुटीयट्टम  –  केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

2. रम्मन  –  पश्चिम बंगालमधील नृत्य

3. रामलीला  –  उत्तर भारतातील सादरीकरण

4. कालेबेलिया  – राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य

उत्तर :

चुकीची जोडी : रम्मन  –  पश्चिम बंगालमधील नृत्य

२. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1. उपयोजित इतिहास. 

उत्तर :

i) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे ‘उपयोजन’ होय.

ii) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच ‘इतिहासाचे उपयोजन’ असे म्हणतात.

iii) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते, त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो.

iv) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते.

2. अभिलेखागार 

उत्तर :

i) प्राचीन दस्तऐवज, ग्रंथ, अभिलेख यांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करून आवश्यकतेनुसार ती कागदपत्रे उपलब्ध करून देणारा शासकीय विभाग वा यंत्रण म्हणजे ‘अभिलेखागार’ होय.

ii) जे दस्तऐवज संग्रहालये वा ग्रंथालये यांच्याकडून प्रदर्शित केले जात नाहीत परंतु ऐतिहासिकदृष्ट्या ते महत्त्वाचे असतात, अशा कागदपत्रांचे जतन अभिलेखागारांमध्ये केले जाते.

iii) हे दस्तऐवज शासनाला संशोधकांना आणि जनतेला आवश्यकतेनुसार अभिलेखागाराकडून उपलब्ध केले जातात. तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालये आणि अभिलेखागारे यांचे कार्य या दृष्टीने सारखेच असते.

iv) अभिलेखागारांतील कागदपत्रांत कोणताही बदल केला जात नसल्याने ही कागदपत्रे अत्यंत विश्वसनीय मानली जातात.

३. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

४. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1.तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. 

उत्तर :

i) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला.

ii) दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला.

iii) कृषी उत्पादने, वस्तूंची उत्पादने, स्थापत्य अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले.

iv) यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो.

2. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. 

उत्तर :

i) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते.

ii) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.

iii) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

५. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा :  

(अ) विज्ञान (ब) कला (क) व्यवस्थापनशास्त्र.

उत्तर :

प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्य आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय

अ)  विज्ञान : मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.

ब) कला : कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

क) व्यवस्थापनशास्त्र : उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.

2. उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो. 

उत्तर :

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. या इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो –

i) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.

ii) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.

iii) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना घेणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.

3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे, यासाठी किमान ६ उपाय सुचवा. 

उत्तर :

इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात :

i) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी

ii) वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे या कृती टाळण्याबाबत उपाय योजावेत.

iii) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू सावधतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी केली पाहिजे.  होणार नाही याची काळजी घ्यावी.

iv) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.

v) प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.

vi) या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.

vii) या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन सामाजिक प्रबोधन करावे.

4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. 

उत्तर :

नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात –

i) प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते.

ii) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.

iii) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते.

iv) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अश उद्योग व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन 

बाह्यप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

बाह्यप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

इयत्ता नववी भूगोल बाह्यप्रक्रिया भाग 2 स्वाध्याय

प्रश्न. 1. पुढीलपैकी योग्य विधान ओळखून लिहा. 

1) तापमानकक्षेची वाऱ्याच्या कार्याला मदत होय. 

2) वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कारकांपेक्षा प्रभावी असते. 

3) भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते. 

4) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. 

उत्तर :

4) वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी, हिमनदी, सागरी लाटा यांप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते. 

प्रश्न. 2. पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखून दुरुस्त करून लिहा. 

1) हिमनदीच्या पृष्ठभागावरील बर्फ तळभागावरील बर्फापेक्षा जास्त गतीने पुढे जात असतो. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

2) मंद उतार, मंदावलेली गती व वाहून आणलेला गाळ यांमुळे नदीचे संचयनकार्य घडून येते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

3) नदी, हिमनदीपेक्षा जास्त वेगाने वाहते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

4) हिमनदीची गती मध्यभागी कमी, तर दोन्ही काठांवर जास्त असते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

कारण हिमनदीच्या प्रवाहाचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की, प्रवाहाच्या मध्यभागी तिचा कमाल वेग असतो. उभय काठांवर हा वेग कमी होत जातो. त्याचप्रमाणे तळाकडे हा वेग कमी होतो. हिमनदी हे पाण्याचे घनस्वरूप आहे. 

प्रश्न. 3. चुकीची जोडी ओळखा. 

अ) संचयन – ‘V’ आकाराची दरी

आ) वहन – ऊर्मिचिन्हे

इ) खनन – भूछत्र खडक

उत्तर :

अ) खनन – ‘V’ आकाराची दरी

आ) संचयन – ऊर्मिचिन्हे

प्रश्न. 4. खालील आकृत्यांमधील भूरुपे कोणती, ते लिहा. 

उत्तर :

प्रश्न. 5. खाली दिलेल्या भुरूपांचे कारकांनुसार वर्गीकरण करून पुढील तक्ता पूर्ण करा. 

(धबधबा, त्रिभुज प्रदेश, हिमगव्हर, गिरिशृंग, बारखाण, हिमोढ, कुंभगर्ता, भूछत्र खडक, विलयविवर, खाजण, पुळण, लवणस्तंभ) 

 नदी 

वारा  

हिमनदी  

सागरी लाटा  

भूजल  

 

 

 

 

 

उत्तर :

 नदी 

वारा  

हिमनदी  

सागरी लाटा  

भूजल  

 धबधबा, त्रिभुज प्रदेश, कुंभगर्ता

 बारखाण, भूछत्र खडक

 हिमगव्हर, गिरिशृंग, हिमोढ

 पुळण, खाजण

 विलयविवर, लवणस्तंभ

प्रश्न. 6. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरुपे कोणती ?

उत्तर :

नदीच्या खननकार्यामुळे घलई, व्ही (V) आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरुपे निर्माण होतात. 

2) लवणस्तंभाची निर्मिती कोणत्या कारकामुळे होते व कोठे होते ?

उत्तर :

i) लवणस्तंभाची निर्मिती भूजल या कारकामुळे होते. 

ii) चूनखडकांच्या प्रदेशातून क्षारयुक्त पाणी जाताना गुहांच्या छतांतून ते पाझरते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील क्षार गुन्हेच्या छताशी व तळाशी सचतात. ही क्रिया सतत झाल्याने छताकडे व तळाशी अनुक्रमे झुंबरांची व स्तंभाची निर्मिती होते. अशाप्रकारे लवणस्तंभाची निर्मिती होते. 

3) सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे निर्माण होणारी भूरुपे कोणती ?

उत्तर :

सागरी जलाच्या संचयनकार्यामुळे पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरुपे निर्माण होतात. 

4) हिमोढाचे प्रकार कोणते ?

उत्तर :

हिमोढाचे संचयनाच्या स्थानानुसार भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ असे चार प्रकार होतात. 

प्रश्न. 7. खालील चित्राचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. बाह्यकारकांमुळे तयार झालेली भूरुपे ओळखा. त्यांना पेन्सिलने क्रमांक देऊन त्यांची नावे दिलेल्या क्रमांकानुसार वहीत लिहा. 

उत्तर :

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

जैविक विदारण कसे घडून येते

जैविक विदारण कसे घडून येते ?

उत्तर :

i) पृथ्वीवरील जैविक घटकांच्या क्रियेमुळे जे खडकांचे विखंडन होते त्यास ‘जैविक विदारण’ असे म्हणतात. 

ii) वनस्पती आणि प्राणी हे पृथ्वीवरील प्रमुख जैविक घटक आहेत. वनस्पती, जीव-जंतू, प्राणी व मानव यांच्यामुळे जैविक अपक्षय क्रिया घडून येते. 

iii) जैविक विदारण कायिक किंवा रासायनिक प्रकारचे असू शकते. 

vi) पाण्याच्या शोधार्थ वनस्पतींची मुळे खडकांच्या भेगांतून खोलीपर्यंत शिरतात. वनस्पतींच्या वाढींबरोबर त्या मुळांचीही वाढ होते. ही मुळे मोठी झाल्याने खडकांच्या भेगांवर दाब पडून भेगा रुंदावतात. या क्रियेमुळे खडक फुटतात व विदारण घडून येते. 

v) काही प्राणी-जीवजंतू जमीन पोखरून बिळे तयार करतात. या क्रियेतही विदारण होते. 

vi) वनस्पतींच्या मुळाशी असणारे पाणी काही अंशी आम्लधर्मी असल्याने अशा पाण्याजवळील खडक रासायनिक विदारणास बळी पडतात.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते

रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर :

रासायनिक विदारणाचे पुढील तीन प्रकार आहेत.

i) कार्बनन – पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. कर्बाम्लात चुनखडकातील कॅल्शियम कार्बोनेटसारखे क्षार सहजगत्या विरघळून खडकांचे विघटन होते.

ii) द्रवीकरण – मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवशेषण होऊन चुनखडी तयार होते. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. 

iii) भस्मीकरण – ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

कायिक विदारण म्हणजे काय

कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर :

i) वातावरणाशी संबंध येऊन खडकांचे विच्छेदन होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण असे म्हणतात. 

ii) खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक तुकडे होणे यालाच कायिक विदारण म्हणतात. 

iii) यात मुख्यतः औष्णिक ताण, स्फटिकीकरण, दाबमुक्ती इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो. 

iv) कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :

हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.

i) १८ जून २०१७ रोजी मेघालय येथील थारिया गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात ६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.

ii) ३० जुलै २०१५ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे ७० टक्के भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान बालके असे सुमारे ४०० जण गाडले गेले, येत तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडल्या गेले.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय

प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय

प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय इयत्ता दहावी

प्राकृतिक रचना व जलप्रणाली भूगोल स्वाध्याय

प्रश्न १. अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. 

अ ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ………..

उत्तर : ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे.

आ ) भारताप्रमाणे ब्राझीमध्ये सुद्धा …………

उत्तर : भारताप्रमाणे ब्राझीमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे.

इ ) ॲमेझाॅन नदीचे खोरे मुख्यत: …………..

उत्तर : ॲमेझाॅन नदीचे खोरे मुख्यत: मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

ई ) ॲमेझाॅन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत …………….

उत्तर : ॲमेझाॅन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही.

उ ) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही …………..

उत्तर : अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळबेटे आहेत.

ऊ ) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ………….

उत्तर : अरवली पर्वताच्या पायथ्याशी माळवा पठार आहे.

प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा

उत्तर :

 भारताची प्राकृतिक रचना 

 ब्राझीलची प्राकृतिक रचना

 

i) भारताची प्राकृतिक रचना ही भारतीय भूमीची समुद्रपाटीपासूनची उंची, भू-उतार, खडक प्रकार इत्यादी घटकांतील विविधता विचारात घेऊन केली आहे.

ii) भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग केले जातात.

1. हिमालय

2. उत्तर भारतीय मैदान

3. द्वीपकल्प

4. किनारपट्टीचा प्रदेश

5. द्वीपसमूह

iii) भारतात अतिप्राचीन पठारे व अतिउंच पर्वत आहेत.

iv) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा तरीबहुज प्रदेश बनतो. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तसेच हा भाग विस्तीर्ण मैदानांचा आहे.

v) भारतात उत्तर वाहिनी, दक्षिण वाहिनी, पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नद्या आहेत.

 

i) ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझाॅन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने दोन भाग पडतात.

ii) ब्राझीलचे पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात.

1. उच्चभूमी

2. अजस्त्र कडा

3. किनारी प्रदेश

4. मैदानी प्रदेश

5. द्वीपसमूह

iii) ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे.

iv) उत्तरेकडील ॲमेझाॅनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही विस्तीर्ण मैदाने नाहीत.

v) ब्राझीलमध्ये पूर्व वाहिनी नद्या आहेत.

आ ) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत ?

उत्तर :

भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पढील उपाययोजना केल्या जात आहेत :

i) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे.

ii) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.

iii) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे.

iv) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदयांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.

इ ) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती ?

उत्तर :

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

i) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.

ii) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे असमपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे.

iii) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात.

iv) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.

v) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन’ म्हणतात. व्हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.

vi) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश ‘थरचे वाळवंट’ किंवा ‘मरुस्थळी’ या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो.

vii) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.

viii) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

ई ) पँटनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत ?

उत्तर :

पँटनाल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत :

i) पँटनाल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनदया वाहतात.

ii) या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारे पाणी जमा होते.

iii) पँटनाल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते.

iv) मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते.

उ ) भारतातील प्रमुख जलविभाजन कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. 

उत्तर :

भारतातील नद्या उगमक्षेत्रानुसार प्रमुख दोन भागात विभागल्या आहेत. 1) हिमालयातील नद्या 2) द्वीपकल्पावरील नद्या.

i) द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे.

ii) द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.

iii) नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य पर्वत आणि दक्षिणेस सातपुडा पर्वत यांच्या दरम्यानच्या अरुंद दरीतून वाहते.

iv) तापी नदी ही नर्मदा नदीला जवळजवळ समांतर वाहते. या दोन नद्यांमधील सातपुडा पर्वत हा जलविभाजक आहे. तापी खोऱ्याच्या दक्षिणेकडील बाजू अजिंठा-सातमाळा डोंगरांची असून त्यामुळे तापी खोरे गोदावरी खोऱ्यापासून विभक्त झाले आहे.

v) पश्चिम घाट हा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांच्या प्रमुख जलविभाजक आहे.

प्रश्न ३. टिपा लिहा. 

 अ ) ॲमेझाॅन नदीचे खोरे

उत्तर :

i) ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वांत मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानाचा) सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे.

ii) ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद, म्हणजेच सुमारे १३०० किमी रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथेॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ २४० किमी होते.

iii) जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते, तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची (मैदानाची) रुंदी वाढत जाते.

iv) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा (मैदानी) प्रदेश दुर्गम बनला आहे.

आ ) हिमालय 

उत्तर :

i) हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताचा सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वतप्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशपर्यत उत्तर-ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे.

ii) हिमालय ही एकच पर्वतरांग नसून, हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही हिमालय पर्वतश्रेणीतील सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे.

iii) दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत.

iv) हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊँ हिमालय) आणि पूर्व हिमालय (असम हिमालय) असेही भाग केले जातात.

इ ) ब्राझीलची किनारपट्टी

उत्तर :

i) ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.

ii) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्तेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो.

iii) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनदया येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजाँ बेट, माराजाँ व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजाॅ हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकॅटिस या यांच्यादरम्यान तयार झाले आहे.

iv) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नदया घेऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे रक्षण होते.

ई ) भारताचा द्वीपकल्पीय विभाग

उत्तर :

i) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो.

ii) भारतीय दवीपकल्पीय विभागात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे.

iii) भारताच्या दवीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक-तेलगंणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी महत्त्वाची पठारे आहेत. या विभागाच्या मध्य भागात विध्य सातपुडा पर्वत आहेत.

iv) भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.

उ ) अजस्त्र कडा

उत्तर :

i) क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे.

ii) सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते. त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्व कडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते. अजस कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची ७९० मीटर इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते.

iii) अजस्त्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो.

iv) अजस्त्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातविन्मुख प्रदेश (पर्जन्यछायेचा प्रदेश) आढळतो. हा भाग ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.

प्रश्न ४. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत. 

उत्तर :

i) ब्राझीलमधील अनेक नदया ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात.

ii) ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे उम्याटण्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नदया या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात.

iii) या नदया अटलांटिक महासागरास जाऊन मिळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नदया आढळत नाहीत.

आ ) भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. 

उत्तर :

i) पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे.

ii) भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात.

iii) भारताची पूर्व किनारपट्टी नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.

इ ) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. 

उत्तर :

i) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात.

ii) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.

ii) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

ई ) ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. 

उत्तर :

i) ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

ii) या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते.

iii) गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.

प्रश्न ५. अचूक गट ओळखा. 

अ ) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. 

i) पॅराना नदी खोरे – गियाना उच्चभूमी – ब्राझील उच्चभूमी

ii) गियाना उच्चभूमी – ॲमेझॉन खोरे – ब्राझील उच्चभूमी

iii) किनारपट्टीचा प्रदेश – ॲमेझॉन खोरे – ब्राझील उच्चभूमी

उत्तर :

ii) गियाना उच्चभूमी – ॲमेझॉन खोरे – ब्राझील उच्चभूमी

आ ) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहे. 

i) जरुका – झिंगू – अरागुआ

ii) निग्रो – ब्रांका – पारू

iii) जापूरा – जारूआ – पुरूस

उत्तर :

i) जरुका – झिंगू – अरागुआ

इ ) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. 

i) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड

ii) छोटा नागपूर – माळवा – मारवाड

iii) तेलंगणा – महाराष्ट्र – मारवाड

उत्तर :

i) कर्नाटक – महाराष्ट्र – बुंदेलखंड

इयत्ता दहावी भूगोल सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. क्षेत्रभेट 

2. स्थान – विस्तार 

3. प्राकृतिक रचना व जलप्रणाली 

4. हवामान

5. नैसर्गिक वनस्पती व प्राणी

6. लोकसंख्या 

7. मानवी वस्ती 

8. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय 

9. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन

भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय इयत्ता नववी

इतिहास भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

प्रश्न. 1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री …………………… होते. 

अ) राजीव गांधी

ब) श्रीमती इंदिरा गांधी

क) एच. डी. देवेगौडा

ड) पी. व्ही. नरसिंहराव

उत्तर :

श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री राजीव गांधी होते.

2) भारतीय हरितक्रांतीचे जनक ………………. होत. 

अ) डॉ. वर्गीस कुरीयन

ब) डॉ. होमी भाभा

क) डॉ. एम. एस. स्वामीनाथन

ड) डॉ. नॉमेन बोरलॉग

उत्तर :

भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन होत.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) इंदिरा गांधी – आणीबाणी

2) राजीव गांधी – विज्ञान-तंत्रज्ञान सुधारणा

3) पी. व्ही. नरसिंहराव – आर्थिक सुधारणा

4) चंद्रशेखर – मंडल आयोग

उत्तर :

चुकीची जोडी  :  चंद्रशेखर – मंडल आयोग

प्रश्न. 2. अ) पाठातील आशयाच्या साहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रमे तक्ता तयार करा. 

उत्तर :

 प्रधानमंत्री

 त्यांचा कालावधी

 १) पंडित जवाहर नेहरू

१९४७ – १९६४

 २) श्री. गुलजारीलाल नंदा

(मे – जून १९६४)

 ३) श्री. लालबहादूर शास्त्री

१९६४ – १९६६

 ४) श्रीमती इंदिरा गांधी

१९६६ – १९७७

 ५) श्री. मोरारजी देसाई

१९७७ – १९७९

 ६) श्री. चरणसिंग

१९७९ – १९८०

 ७) श्रीमती इंदिरा गांधी

१९८० – १९८४

 ८) श्री राजीव गांधी

१९८४ – १९८९

 ९) श्री. विश्वनाथ प्रतापसिंग

१९८९ – १९९०

 १०) श्री. चंद्रशेखर

१९९० – १९९१

 ११) श्री. पी. व्ही. नरसिंहराव

१९९१ – १९९६

 १२) श्री. अटलबिहारी वाजपेयी

१९९६ – (१ महिना)

 १३) श्री. एच. डी. देवेगौडा

१९९६ – १९९७

 १४) श्री. इंद्रकुमार गुजराल

१९९७ – १९९८

 १५) श्री. अटलबिहारी वाजपेयी

१९९८ – २००४

 १६) डॉ. मनमोहनसिंग

२००४ – २०१४

 १७) श्री. नरेंद्र मोदी

२०१४ पासून

ब) टिपा लिहा. 

1) जागतिकीकरण

उत्तर :

i) विश्वात एककेंद्रिय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औदयोगिकीकरण वाढविणे आणि आयात व निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिती निर्माण करणे याला जागतिकीकरण असे म्हणतात.

ii) डॉ. दीपक नायर यांच्या मते, ‘राष्ट्रराज्यांच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय.’

iii) जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधनसामग्री आणि भांडवलाचे सुलभ परिचलन (देवाणघेवाण) निर्माण करणे होय. – श्रवणकुमारसिंग

iv) माल्कन आदिशेष्य यांच्या मते, ‘जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असताना तिला मिळालेले जागतिक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होय.’

2) धवलक्रांती

उत्तर :

i) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले यालाच ‘धवलक्रांती’ असे म्हणतात.

ii) धवलक्रांती ‘ऑपरेशन फ्लड’ या नावाने ओळखली जाते. ऑपरेशन फ्लड ही भारतातील योजना आहे. ज्याद्वारे भारतातील दुग्धउत्पादनातील कमतरता दूर केली जाऊ शकते.

iii) जगातील कमी दुग्धोत्पादक म्हणून ओळखला जाणारा भारत देश आज धवलक्रांतीमुळे जगातील सर्वांत मोठा दुग्धोत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

प्रश्न. 3. अ) पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले

उत्तर :

कारण – i) अनेक विरोधी पक्षांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली.

ii) या नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला.

iii) त्यावेळी मोराराजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष होते व ते प्रधानमंत्री झाले. या पक्षातील आपापसातील मतभेद अधिक वाढले. त्यामुळे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.

2) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले

उत्तर :

कारण – i) १९८० च्या दशकात शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले.

ii) या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप धारण केले. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता.

iii) १९८४ मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी त्या मंदिरात लष्कर पाठवावे लागले.

3) भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला

उत्तर :

कारण – i) भारताच्या स्वातंत्र्यापासूनच अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत.

ii) भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते.

iii) नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला.

ब) पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले

उत्तर :

i) १९९१ च्या सुमारास सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले.

ii) त्यानंतर भारतात पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले.

iii) याच काळात अयोध्या येथील रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला. अशाप्रकारे जग आणि भारताच्या इतिहासात १९९१ हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले.

2) भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती

उत्तर :

अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत.

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. 

 भारतापुढील आव्हाने

 बलस्थाने

 उदा., भारत – पाकिस्तान युद्ध

विविधतेतही एकता

 ……………………………

 …………………………

 ……………………………..

 अण्वस्त्र सज्जता

 फुटीरतावाद

…………………………….

उत्तर :

 भारतापुढील आव्हाने

 बलस्थाने

 उदा., भारत – पाकिस्तान युद्ध

विविधतेतही एकता

 जातीयवाद

 सर्वधर्म समभाव

 दहशतवाद

 अण्वस्त्र सज्जता

 फुटीरतावाद

राष्ट्रीय ऐक्य

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय