बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

इयत्ता नववी भूगोल बाह्यप्रक्रिया भाग 1 स्वाध्याय

प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) कायिक विदारण म्हणजे काय ?

उत्तर :

i) वातावरणाशी संबंध येऊन खडकांचे विच्छेदन होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण असे म्हणतात.

ii) खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक तुकडे होणे यालाच कायिक विदारण म्हणतात.

iii) यात मुख्यतः औष्णिक ताण, स्फटिकीकरण, दाबमुक्ती इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो.

iv) कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो.

2) रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर :

रासायनिक विदारणाचे पुढील तीन प्रकार आहेत.

i) कार्बनन – पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणातून प्रवास करत असते. त्या दरम्यान त्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कर्बाम्ल तयार होते. कर्बाम्लात चुनखडकातील कॅल्शियम कार्बोनेटसारखे क्षार सहजगत्या विरघळून खडकांचे विघटन होते.

ii) द्रवीकरण – मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवशेषण होऊन चुनखडी तयार होते. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात.

iii) भस्मीकरण – ज्या खडकांत लोहखनिज असते, त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो, त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो.

3) जैविक विदारण कसे घडून येते ?

उत्तर :

i) पृथ्वीवरील जैविक घटकांच्या क्रियेमुळे जे खडकांचे विखंडन होते त्यास ‘जैविक विदारण’ असे म्हणतात.

ii) वनस्पती आणि प्राणी हे पृथ्वीवरील प्रमुख जैविक घटक आहेत. वनस्पती, जीव-जंतू, प्राणी व मानव यांच्यामुळे जैविक अपक्षय क्रिया घडून येते.

iii) जैविक विदारण कायिक किंवा रासायनिक प्रकारचे असू शकते.

vi) पाण्याच्या शोधार्थ वनस्पतींची मुळे खडकांच्या भेगांतून खोलीपर्यंत शिरतात. वनस्पतींच्या वाढींबरोबर त्या मुळांचीही वाढ होते. ही मुळे मोठी झाल्याने खडकांच्या भेगांवर दाब पडून भेगा रुंदावतात. या क्रियेमुळे खडक फुटतात व विदारण घडून येते.

v) काही प्राणी-जीवजंतू जमीन पोखरून बिळे तयार करतात. या क्रियेतही विदारण होते.

vi) वनस्पतींच्या मुळाशी असणारे पाणी काही अंशी आम्लधर्मी असल्याने अशा पाण्याजवळील खडक रासायनिक विदारणास बळी पडतात.

4) विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा

उत्तर :

 विदारण 

 विस्तृत झीज

 

i) खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला ‘विदारण’ असे म्हणतात. 

ii) विदारणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत. कायिक, रासायनिक व जैविक. 

i) विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलद्वारे होणे, या प्रक्रियेला ‘विस्तृत झीज’ असे म्हणतात. 

ii) विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीने व मंद उतारावर ती संथ गतीने होते. 

प्रश्न. 2. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. 

1) भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

2) आर्द हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

3) शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

4) खटकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

5) अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते. 

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण – i) अपपर्णन ही क्रिया जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात होत असते. उदा. उष्ण वाळवंटी प्रदेशात जास्त तापमान असल्याने तिथे ही क्रिया घडते. त्यामुळे तिथे रेताड मृदा आहे.

ii) जांभी मृदा ही उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात आढळते.

प्रश्न. 3. खालील ओघतक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

प्रश्न. 4. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. 

1) काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. 

उत्तर :

जैविक विदारण

2) खडकातील लोहावर गंज चढतो. 

उत्तर :

रासायनिक विदारण

3) खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. 

उत्तर :

कायिक विदारण

4) थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. 

उत्तर :

कायिक विदारण

5) ओसाड प्रदेशात वाळू तयार होते. 

उत्तर :

कायिक विदारण

प्रश्न. 5. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :

हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.

i) १८ जून २०१७ रोजी मेघालय येथील थारिया गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात ६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.

ii) ३० जुलै २०१५ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे ७० टक्के भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान बालके असे सुमारे ४०० जण गाडले गेले, येत तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडल्या गेले.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय 

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इयत्ता नववी

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इतिहास 

प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या

उत्तर :

‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने पुढील मागण्या केल्या. चंदीगढ पंजाबला दयावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यासअधिक स्वायत्तता द्यावी. 

2) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे

उत्तर :

 सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. 

i) त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. उत्तर चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत. 

ii) परस्परांच्या सणउत्सवांत सहभागी झाले पाहिजे. 

iii) एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहीजेत.  

iv) आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे.

3) प्रदेशवाद केव्हा बळावतो

उत्तर :

i) ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. 

ii) इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे. हा अवाजवी प्रांताभिमान होय. 

iii) जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो.

प्रश्न. 2. टिपा लिहा

1) जमातवाद

उत्तर :

i) जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर दरभिमानात होते. तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात. 

ii) आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांचा धर्माला कमी लेखणे यालाच जमातवाद असे म्हणतात. 

iii) अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होता.

2) प्रदेशवाद

उत्तर :

i) प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय. 

ii) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. यालाच प्रदेशवाद म्हणतात. 

iii) आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे. या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो. 

iv) विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.

प्रश्न. 3. का ते लिहा. 

1) ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले

उत्तर :

कारण – i) १९८० साली पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले. 

ii) सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. 

iii) या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. 

iv) भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते. म्हणून सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्ट करावे लागले.

2) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे

उत्तर :

कारण – i) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. 

ii) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.

iii) सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

प्रश्न. 4. पुढील संक्षिप्त रुपाचे पूर्ण रूप लिहा. 

1) MNF 

उत्तर :

मिझो नॅशनल फ्रॅट

2) NNC

उत्तर :

नागा नॅशनल कौन्सिल 

3) PLGA

उत्तर :

पीपल्य लिबरेशन गुरिला आर्मी

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

इयत्ता नववी राज्यशास्त्र महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून निर्माण होणारी व्यवस्था ………..

अ)  राजकीय व्यवस्था

ब) आंतरराष्ट्रीय व्यवस्था

क) सामाजिक व्यवस्था

ड) यांपैकी नाही

उत्तर :

आंतरराष्ट्रीय व्यवस्था

2. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ……………

अ) युद्ध टाळणे

ब) वसाहतींचे स्वातंत्र्य

क) राष्ट्रांची अर्थव्यवस्था करणे

ड) नि:शस्त्रीकरण करणे

उत्तर :

युद्ध टाळणे

3. शीतयुद्ध …………… या घटनेमुळे संपले. 

अ) संयुक्त राष्ट्राची स्थापना

ब) सोव्हिएत युनियनचे विघटन

क) लष्करी संघटनांची

ड) क्यूबाचा

उत्तर :

सोव्हिएत युनियनचे विघटन

प्रश्न. 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण – पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला.

2. शीतयुद्धांमुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. 

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण – i) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोनमहासत्तांच्या गटात सामील झाले होते.

ii) राष्ट्रांची अशी दोन गटात विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. अर्थात शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले.

3. मिखाईल गोर्बोचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे.

कारण – i) सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बोचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईक’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अंमलात आणली.

ii) या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. म्हणून मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

प्रश्न. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1) शीतयुद्ध

उत्तर :

(i) दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले.

ii) या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता.

iii) अर्थात प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण करणे याला ‘शीतयुद्ध’ असे म्हणतात.

iv) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती म्हणजे शीतयुद्ध होय.

v) अर्थात दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत

युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता उदयास आल्या होत्या. त्याच्यात असलेल्या तणावपूर्ण संबंधाला ‘शीतयुद्ध’ म्हटले जाते.

2) अलिप्ततावाद

उत्तर :

i) शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात.

ii) अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.

3) परस्परावलंबन

उत्तर :

i) कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी जगातले सर्व देश अवलंबून असतात. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात.

ii) राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. याला परस्परावलंबन म्हणतात.

iii) परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट आहे.

4) द्विध्रुवीकरण 

उत्तर :

i) शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांशी अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय.

ii) द्विध्रुवीकरणामुळे शीतयुद्धाचा आवाका वाढला. तणावाचे क्षेत्र व्यापक झाले.

5) जागतिकीकरण

उत्तर :

i) शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यामुळे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले.

ii) जगभरातील लोकांमध्ये विचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात.

iii) विविध देशांत माहिती तंत्रज्ञान, भांडवल, लोक, बाजारपेठा आाणि वस्तू यांचा मुक्त संचार आणि देवाण-घेवाण म्हणजे जागतिकीकरण होय.

प्रश्न. 4. पुढील विषयांवर तुमचे मत व्यक्त करा. 

1) राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या ?

उत्तर :

i) जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये हुकूमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. राष्ट्रसंघाने तेथे लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता तर दुसरे महायुद्ध टळले असते.

ii) अमेरिकेने युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला होता. राष्ट्रसंघाने अमेरिकेला अणुबॉम्ब टाकण्यास प्रतिबंध केला असता तर युद्धास प्रतिबंध झाला असता आणि पर्यायाने राष्ट्रसंघाच्या मदतीने दुसरे महायुद्ध टळले असतं.

2) शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावाद आवश्यक होता. 

उत्तर :

i) शीतयुद्धाच्या काळातील अलिप्ततावाद ही एक महत्त्वाची चळवळ होती.

ii) अलिप्ततावादाने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास प्रोत्साहन मिळाले.

iii) मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. अलिप्ततावादामुळे शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली नसती. म्हणून शीतयुद्धाच्या काळात अलिप्ततावाद आवश्यक होता.

3) शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. 

उत्तर :

i) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता तर सोब्जिएत युनियनला समाजवादाचा प्रसार करायचा होता. यामध्ये सामान्य जनतेचे हाल होत होते. त्यांचा सर्वांगिण विकास होण्याऐवजी ते या दोन महासत्तांमध्ये पिचले जात होते.

ii) या दोन महासत्तांमुळे तणावाचे क्षेत्र व्यापक झाले होते. त्यामुळे तेथील लोक मूलभूत हक्कांपासून वंचीत राहिले.

 4) आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून कोणत्या देशांचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो ? 

उत्तर :

आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धी म्हणून साऊथ अरेबिया, चीन, फ्रान्स, जापान, रशिया, युनायटेंड किंगडम, जर्मनी, भारत या देशांचा महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो.

प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध यांच्यात पुढील मुद्द्यांच्या आधारे तुलना करा. 

 मुद्दे 

 पहिले महायुद्ध 

 दुसरे महायुद्ध

1) कालखंड 

 १९१४ ते १९१८

 १९३९ ते १९४५

2) सहभागी राष्ट्रे 

 मित्र राष्ट्रे – ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका.

मध्यगत राष्ट्रे – जर्मन, ऑस्ट्रिया-हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया.

 मित्र राष्ट्रे – ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन अमेरिका.

अक्ष राष्ट्रे – जर्मनी, जपान, इटली.

3) परिणाम (राजकीय व आर्थिक) 

राजकीय परिणाम – जागतिक राजकारणात महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय झाला. जर्मनी, रशिया, ऑस्ट्रिया, हंगेरी आणि तुर्कस्तान यांची साम्राज्ये नष्ट झाली.

आर्थिक परिणाम – जगातील अनेक राष्ट्रांनी आर्थिक स्थिती ढासळली युद्धकाळात शेती, उद्योगधंदे थंड झाले. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महागाई वाढली.

 राजकीय परिणाम – या महायुद्धात पराभव झाला म्हणून जर्मनी, इटली व जपान यांच्या साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. ती राज्ये विजयी होऊनही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे साम्राज्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यात अपयश आले.

आर्थिक परिणाम – मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाल्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोलमडली. युद्ध संपल्यावर सामान्य माणसाच्या जीवनात हालअपेष्टा कमी होण्याऐवजी वाढल्या. अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला.

4) युद्धोत्तर स्थापना झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना

राष्ट्रसंघ

नाटो, संयुक्त राष्ट्रसंघटना

2) शीतयुद्धाची अखेर होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ?

उत्तर :

१९४५ पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक गोष्टी / बाबी कारणीभू ठरल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

i) सोव्हिएत युनियनने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचेअर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.

ii) सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ‘ग्लासनोस्त’ (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणामुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.

iii) पूर्व युरोपमधील सोव्हिएत युनियनच्या प्रभावाखाली देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.

iv) सोव्हिएत युनियनचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत युनियनमधील सर्वांत मोठा देश होता.

3) शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात कोणते महत्त्वाचे बदल घडून आले ?

उत्तर :

सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. या शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक राजकारणात पुढील महत्त्वाचे बदल घडून आले.

i) जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली.

ii) राष्ट्राराष्ट्रामधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार – कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला.

iii) सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधाना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखादया देशाला ‘शत्रुराष्ट्र’ म्हणून सबोधण्याऐवजी ‘स्पर्धक राष्ट्र’ ही संकल्पना पुढे आली.

iv) संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत.

v) पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.

इयत्ता नववी राज्यशास्त्र सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

2. भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

3. भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

4. संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

5. भारत व अन्य देश स्वाध्याय

6. आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय

भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) अणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश …………… हा होता. 

अ) लष्करी क्षमता निर्माण करणे

ब) अणुचाचणी करणे

क) अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे

ड) ऊर्जेची निर्मिती

उत्तर :

अणूऊर्जा आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश ऊर्जेची निर्मिती हा होता.

2) जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट ……………. बनले आहे. 

अ) आण्विक विकास

ब) आर्थिक विकास

क) अणुचाचणी

ड) सुरक्षा व्यवस्था

उत्तर :

जगातील सर्व राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आर्थिक विकास बनले आहे.

3) भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्त्वाची आहे. 

अ) मुक्त आर्थिक धोरण

ब) परस्परावलंबन

क) अलिप्ततावाद

ड) आण्विक विकास

उत्तर :

आण्विक विकास

4) इ. स. १९७४ साली भारताने ………….. या ठिकाणी अणुचाचणी केली. 

अ) श्रीहरीकोटा

ब) थुंबा

क) पोखरण

ड) जैतापूर

उत्तर :

इ. स. १९७४ साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली.

प्रश्न. 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण – i) पं. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली.

ii) भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला.

iii) आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले.

2) अटलबिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यास जाता पुढाकार घेतला. 

उत्तर :

हे विधान चूक आहे.

कारण – अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री या पदांवरील व्यक्ती करतात. त्यावेळी या पदावर अटलबिहारी वाजपेयी होते.

प्रश्न. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) भारताचे परराष्ट्र धोरण

उत्तर :

i) भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली.

ii) भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम ५१ नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे.

iii) त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे.

iv) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. या चौकटीत भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण विकसित झाले आहे.

2) राष्ट्रीयहितसंबंध

उत्तर :

i) राष्ट्रीयहितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना होय.

ii) आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना असे म्हणतो.

iii) या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो.

अ) आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते.

ब) आर्थिक विकास हेही एक महत्त्वाचे राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते.

3) जागतिक शांतता 

उत्तर :

i) आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जागतिक शांतता आवश्यक असते. जगातील अर्धविकसित आणि अविकसित देशांच्या विकासासाठीही जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे स्पष्ट मत होते. याच कारणामुळे भारताने सुरुवातीपासूनच जागतिक शांततेचा पुरस्कार केला. तसेच आपल्या परराष्ट्रीय धोरणात शांती प्रयत्नांना महत्त्वाचे स्थान दिले.

ii) जागतिक शांतता हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे भारत कोणत्याही लष्करी किंवा सैनिकी संघटनात सामील झाला नाही. याशिवाय जगात कोठेही युद्ध सुरू झाल्यास ते तात्काळ थांबवण्यासाठी भारताने प्रयत्न केले.

iii) जागतिक शांततेच्या उद्देशाने प्रेरित होऊनच भारताने इजिप्त, कोरियास, व्हिएतनाम आणि इंडोचायना तसेच इराण, इराक या देशातील संघर्षात युद्धबंदीसाठी सतत प्रयत्न केले. पाकिस्तानचा पराभव करणे सोपे असूनही काश्मीर प्रश्न भारताने संयुक्त राष्ट्राकडे नेला. आणि पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेशही परत केला. यांवरून भारताचे जागतिक शांतता धोरण दिसते.

प्रश्न. 4. अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे, याविषयी तुम्हांला काय वाटते ?

उत्तर :

अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे.

i) आज जगभरातील जवळ जवळ सर्वच राष्ट्रे अणुबॉम्ब बनविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतही क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी झालेला आहे.

ii) वाढत्या आतंकवादाला घाबरून आणि कधीही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पेटेल या भितीने आपआपली सैनिकी ताकद वाढविण्यास प्रयत्नशील आहेत. भारतही त्यात मागे नाही. आशिया खंडात याबाबतीत आता स्पर्धा सुरु झालेली आहे. यामुळे जागतिक शांतता भंग होत आहे.

iii) आज जगातील अनेक देशांनी अणुबॉम्ब व अण्वस्त्र सज्जतेमुळे महासत्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे दररोज जगातील कोणत्या ना कोणत्या देशात आतंकी हमले होऊन कित्येक लोक मृत्यूमुखी पडत असतात. आपल्या देशातील जनता आतंकवादाच्या सावटाखाली जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. या सर्वामुळे जागतिक शांततेस धोक निर्माण झाला आहे.

iv) अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक आतंकवाद वाढण्यास खत-पाणी मिळाले आहे. देशातील असुरक्षिततेची भावनाही जागतिक आतंकवाद वाढण्यास कारणीभूत ठस्त आहे. देशातील जागतिक आतंकवादामुळे ही जागतिक शांतता नष्ट होत आहे.

v) अण्वस्त्र सज्जता असलेली शक्तीशाली राष्ट्रे ताकदीच्या जोरावर जागतिक शांतता निर्माण करु शकतात. पण ती दीर्घकाळ टिकत नाही.

या सर्व चर्चेवरून अण्वस्त्र सज्जतेमुळे जागतिक शांततेस धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट होते.

प्रश्न ५ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भारताचे परराष्ट्र धोरण कोणत्या मूल्यांवर आधारित आहे ? 

उत्तर :

i) भारताचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते.

ii) भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारित आहे.

iii) भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जागतिक शांतता, सुरक्षितता व सह-अस्तित्व हे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये मित्रत्वाचे संबंध राहावेत, त्यांच्यात परस्पर सहकार्य वाढावे आणि जगातील राष्ट्रांचा आर्थिक विकास घडून यावा यासाठी जागतिक शांतता आवश्यक आहे. असे भारताचे परराष्ट्र धोरण आहे.

2) भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले ?

उत्तर :

भारत व चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने १९९० मध्ये पुढाकार घेतला. भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले.

i) भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये चीनला भेट दिली.

ii) भारताचे पंतप्रधान श्री. नरसिंहराव यांनी इ.स. १९९३ मध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले.

iii) पुढे श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले.

iv) तसेच जानेवारी २००१ मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किपेंग यांनीही भारताला भेट दिली. या सर्वांनी भारत-चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले.

३) भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे लिहा.

उत्तर :

भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.

i) अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायदयाचा आदर करणे.

ii) शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे. राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे.

iii) भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे.

iv) दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात.

v) भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे.

प्रश्न. 6. पुढील संकल्पनाचित्र तयार करा. 

उत्तर :

भारतीय कलांचा इतिहास प्रश्न उत्तरे

भारतीय कलांचा इतिहास प्रश्न उत्तरे

भारतीय कलांचा इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय

बाह्यप्रक्रिया भाग – 1 प्रश्न उत्तरे

बाह्यप्रक्रिया भाग – 1 प्रश्न उत्तरे

बाह्यप्रक्रिया भाग – 1 प्रश्न उत्तरे इयत्ता नववी

बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी प्रश्न उत्तरे इयत्ता नववी

महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने प्रश्न उत्तरे

भारतापुढील अंतर्गत आव्हाने प्रश्न उत्तरे

भारतापुढील अंतर्गत आव्हाने प्रश्न उत्तरे इयत्ता नववी

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

उपयोजित इतिहास प्रश्न उत्तरे

उपयोजित इतिहास प्रश्न उत्तरे

उपयोजित इतिहास प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

उपयोजित इतिहास स्वाध्याय

निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे

निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे

निवडणूक प्रक्रिया प्रश्न उत्तरे इयत्ता दहावी

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय