भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत

उत्तर :

i) भारताचा पूर्व किनारा नदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात.

ii) भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे.

iii) गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत

हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत

उत्तर :

i) हिमालयातील बहुतांश नदया अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.

ii) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते. 

iii) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

उत्तर :

i) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.

ii) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.

iii) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते.

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

उत्तर :

i) भारत देश सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.

ii) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो.

iii) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणेमुळे भारतात आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारताची लोखसंख्या जास्त असून भारतात शेती-उद्योगधंद्याचा विकास झाला आहे. म्हणून भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

उत्तर :

i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.

iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते.

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

1) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ………………….. 

i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

उत्तर : 

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी …………………… 

i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते. 

ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 

iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 

iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात. 

उत्तर :

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ………………

i) १५ मिनिटांचा फरक असतो. 

ii) ०४ मिनिटांचा फरक असतो. 

iii) ३० मिनिटांचा फरक असतो. 

iv) ६० मिनिटांचा फरक असतो. 

उत्तर :

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ०४ मिनिटांचा फरक असतो. 

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1. स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते

उत्तर :

कारण  i) पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते.. 

ii) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा २४ तासांचा कालावधी होय. 

iii) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जस जसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वांत कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वांत लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. 

iv) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. 

2. ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

उत्तर :

कारण  i) देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. 

ii) जागतिक व्यवहाराच्यादृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. 

iii) ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच ०° रेखावृत्त आहे म्हणून ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

3. भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे

उत्तर :

कारण  i) उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबादजवळील मिर्झापूर शहरावरून जाणारे ८२°३०’ पूर्व हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. 

ii) या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. म्हणून भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

4. कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

उत्तर :

कारण  i) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात. 

ii) कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोईचे होत नाही. म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा

उत्तर :

i) कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. 

ii) पूर्वेकडून पश्चिमेकडे अंतर कमी होत जाते. म्हणून ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर रात्रीचे ३ वाजले असतील.

2. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते

उत्तर :

i) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. 

ii) देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. 

iii) म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.

3. ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा

उत्तर :

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ ही आधीच्या दिवसाचे रात्रीचे ९.३० वाजले असतील.

प्रश्न. 4. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब,क, या ठिकाणाची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.   

 ठिकाण रेखावृत्त  दिनांक  वेळ  
 अ  १२०°  
 ब  १६०°  
 क ६०°  

उत्तर :

 ठिकाण रेखावृत्त  दिनांक  वेळ  
 अ  १२०° २२ जून संध्याकाळचे ६:००  
 ब  १६०° २० जून रात्रीचे १:००  
 क ६०° २२ जून दुपारचे २:००  

प्रश्न. 5. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतीखाली चोेकटीत लिहा.  

उत्तर :

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो

प्रश्न

जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते. 

किंवा  

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. 

किंवा 

पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो. 

उत्तर

 

 

i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न येता वरून आल्याचा भास होतो. म्हणून पाण्याची खोली कमी भासते किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो.

वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा

प्रश्न

 वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.

उत्तर

 

 

पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात –

i) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात.

ii) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो.

iii) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. 

iv) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते.

v) हस्तोदयोग, कुटीरोदयोग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. 

vi) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात.

vii) विविध प्रकारचे भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते.

viii) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते..

ix) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते.

x) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांधिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो.

भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत

प्रश्न

भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत 

उत्तर

 

 

भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पढील उपाययोजना केल्या जात आहेत :

i) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. 

ii) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे.

iii) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. 

iv) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदयांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी.

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा

आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा.

उत्तर :

हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.

i) १८ जून २०१७ रोजी मेघालय येथील थारिया गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात ६ नागरिक मृत्युमुखी पडले, तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत.

ii) ३० जुलै २०१५ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकरजवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीण हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे ७० टक्के भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री-पुरुष, लहान बालके असे सुमारे ४०० जण गाडले गेले, येत तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडल्या गेले.

इयत्ता नववी भूगोल सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. वितरणाचे नकाशे स्वाध्याय

2. अंतर्गत हालचाली स्वाध्याय

3. बाह्यप्रक्रिया भाग – 1 स्वाध्याय

4. बाह्यप्रक्रिया भाग – 2 स्वाध्याय

5. वृष्टी स्वाध्याय

6. सागरजलाचे गुणधर्म स्वाध्याय

7. आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

8. अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

9. व्यापार स्वाध्याय

10. नागरीकरण स्वाध्याय

11. वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

12. पर्यटन स्वाध्याय