लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते

लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते.

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण

i) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.

ii) लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

iii) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

उत्तर :

i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.

ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.

iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.

उत्तर :

भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.

ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.

iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

उत्तर :

i) ब्राझील देशाच्या उत्तर भागात अँमेझाॅन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे 25 °से. असते.

ii) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.

iii) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे

सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे.

उत्तर :

i) विसाव्या-एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.

ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.

iii) हौशी खेळाडू शिकवण्यासाठी; प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.

iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो; त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली

प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

उत्तर :

i) इंग्रजी शिक्षणाचे भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.

ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.

iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकरांचे लक्ष वेधले गेले.

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच, त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर कोणती आव्हाने आहेत ?

उत्तर :

जागतिक पातळीवर लोकशाहीसमोर पुढील आव्हाने आहेत –

i) लष्करी राजवटींचा फार मोठा धोका जगभरातील लोकशाही देशांसमोर आहे.

ii) लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या खऱ्या लोकशाहीचा प्रसार करणे.

iii) केवळ राजकीय लोकशाही नव्हे; तर खऱ्या लोकशाहीची अंमलबजावणी करणे.

iv) लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजवणे.

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

उत्तर :

i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 8,515,770 चौरस किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रभेट केवळ सुमारे 32,87,263 चौरस किमी आहे.

ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे 20 कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे.

iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

उत्तर :

i) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

ii) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्यछायेचा प्रदेश होतो.

iii) भारतातील या भागांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो. या भागांत 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो.

iv) दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. त्यामुळे भारतातील राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे ?

उत्तर :

i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवानाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनांतील वनस्पतींची पाने गळतात.

ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.

iii) 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.

iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. त्यामुळे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.