ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो

एका वाक्यात उत्तरे लिहा

ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

उत्तर :

ब्राझीलमधील ईशान्येकडील भाग अवर्षण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो.

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर :

राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

i) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.

ii) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्यक्ष पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो.

iii) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो, तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.

iv) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा

उत्तर :

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत.

i) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहीत असावाच लागतो.

ii) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच खेळाचे कौशल्य माहीत असावे लागते.

iii) ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

iv) विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती दयावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.

v) खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूच माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.

vi) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्याचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहीत करून घ्यावाच लागतो.

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

ग्राहक चळवळ अस्तित्वात आली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) अर्थव्यवस्थेत बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते

लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारा पक्ष सत्तेवर येतो.

ii) संसदेत व विधिमंडळात सर्व निर्णय बहुमतानेच घेतले जातात.

iii) बहुसंख्य समाजाचे कल्याण करणे, हाच लोकशाहीचा उद्देश असतो; म्हणून लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते

उत्तर :

i) आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचात जमा होतो.

ii) वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.

खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

खेळांचे महत्त्व स्पष्ट करा

उत्तर :

खेळांचे पुढील दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे –

i) खेळांमुळे जीवनातील व्यथा व चिंता विसरल्या जातात.

ii) माणसाच्या मनाला विरंगुळा मिळतो, त्यामुळे मन ताजेतवाने व उल्हसित होते.

iii) खेळामुळे व्यायाम होऊन शरीर काटक व बळकट होते.

iv) खेळामुळे मनोधैर्य वाढते, चिकाटी व खिलाडूपणा हे गुण अंगी बाणतात.

v) सांघिक खेळातून सहकार्य व संघभावना वाढीस लागते.. vi) खेळांमुळे नेतृत्वगुण विकसित होतात.

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण –

i) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.

ii) समाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.

iii) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.

iv) शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात. लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात

उत्तर :

खेळाशी अनेक घटक संबंधित असतात. त्यातूनच पुढील अनेक व्यावसायिक संधी प्राप्त होतात –

i) खेळांसंबंधी लेखन करणारे लेखक व समीक्षक.

ii) आकाशवाणी, दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून खेळांचे समालोचन करणारे स्मालोचक, तज्ज्ञ व त्यांना माहिती पुरवणारे साहाय्यक.

iii) खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक, मैदान तयार करणारे तज्ज्ञ, पंच इत्यादी.

iv) खेळांचे चित्रीकरण करणारे कॅमेरामन व त्यांचे साहाय्यक व संगणक तज्ज्ञ.

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण –

i) 1989 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली.

ii) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले.

iii) 1977 चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.