अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी

अर्थशास्त्राशी परिचय स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रश्न. 2. स्पष्टीकरण लिहा. 

1) अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. 

उत्तर :

i) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटनांशी संबंधीत असते. यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. 

ii) मासिक उत्पन्नातून तुमचे उत्पन्न व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी गरजांच्या तीव्रतेनुसार क्रमवारी लावता येते. अधिक महत्त्वाच्या गरजा आधी भागवल्या जातात आणि कमी महत्त्वाच्या गरजा नंतर पूर्ण केल्या जातात. उदा.- आजारपणामध्ये आईस्क्रिम खरेदी करण्याऐवजी औषधाला जाधान्य दयावे लागते. 

iii) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे. वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा, हे अर्थशास्त्रामुळे समजते. या विवेंचनावरून असे स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते.

2) भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. 

उत्तर :

i) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खासगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खासगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रांत कार्य करते. 

ii) जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खासगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. 

iii) प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. 

iv) अशाप्रकारे आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा ‘मिश्र अर्थव्यवस्थे’ला भारताने प्राधान्य दिले. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.

3) अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात. 

उत्तर :

i) जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार पडतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था. 

ii) जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांची भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 

iii) चीन, रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. सामाजिक कल्याण साधणे हा या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांचे घटक एकत्रितरीत्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात, म्हणजेच सरकारी मालकीचे असतात. 

iv) भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. या अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे होय. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. या विवेंचनावरून हे स्पष्ट होते की, अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे तीन गट पडतात.

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 

1) व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते ?

उत्तर :

व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते.

2) अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे ?

उत्तर :

अर्थशास्त्र ही संज्ञा ओईकोनोमिया (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.

3) भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते ?

उत्तर :

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते. 

4) जागतिकीकरण म्हणजे काय ?

उत्तर :

जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे होय.

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी

आंतरराष्ट्रीय वाररेषा स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेषावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा. 

उत्तर :

प्रश्न. 2. खालील प्रश्नांतील योग्य पर्याय निवडा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल ?

1) पूर्वकडून पश्चिमेकडे

2) पश्चिमेकडून पूर्वेकडे

3) दक्षिणेकडून उत्तरेकडे

4) उत्तरेकडून दक्षिणेकडे

उत्तर :

पश्चिमेकडून पूर्वेकडे

आ) जर १५° पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे १० वाजले असतील, तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील ?

1) बुधवार सकाळचे सहा

2) बुधवार रात्रीचे नऊ

3) गुरुवार दुपारचे दोन

4) गुरुवार संध्याकाळचे सहा

उत्तर :

बुधवार रात्रीचे नऊ

इ) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. 

1) ०°

2) ९०° पूर्व

3) ९०° पश्चिम

4) १८०°

उत्तर :

१८०°

ई) पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो ?

1) पूर्व

2) पश्चिम

3) उत्तर 

4) दक्षिण

उत्तर :

पश्चिम

उ) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे कशामुळे सुसूत्रता येते ?

1) जी. पी. एस. प्रणाली

2) संरक्षण खाते

3) वाहतुकीचे वेळापत्रक

4) गोलार्ध ठरवण्यासाठी

उत्तर :

वाहतुकीचे वेळापत्रक

प्रश्न. 3. भौगोलिक कारणे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. 

उत्तर :

कारण – i) आतंरराष्ट्रीय विमानसेवा, दळणवळण सेवा, आर्थिक व व्यापारी व्यवहार यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. 

ii) आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झाली आहे. 

iii) आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक वा घडामोडींच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची ठरत आहे. 

iv) जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. 

v) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते.

आ) पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. 

उत्तर :

कारण – i) आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती, तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती.

ii) पूर्व बाजूला एक वार व एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. 

iii) शिवाय जमिनीवरून चालतांना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो.

प्रश्न. 4. थोडक्यात उत्तरे लिहा. 

अ) आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत ?

उत्तर :

आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना पुढील बाबी विचारात घेतल्या आहेत. (i) प्रवासाची दिशा (ii) चालू असलेला वार व दिनांक

i) प्रवासाची दिशा – आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते, की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो, तर पूर्वेला संपतो. 

ii) चालू असलेला वार व दिनांक – पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली, तर त्याला आहे तोच वार (मागचा) मानावा लागतो. 

आ) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.

इ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय बाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. 

ii) त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८० रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.

ई) आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही ?

उत्तर :

i) आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात, तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. 

ii) विशेषतः जेव्हा प्रवास करतांना १८०° रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा तारीख व वार यांमध्ये बदल करावा लागतो.

उ) आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच का विचारात घेतली जाते ?

उत्तर :

i) १८०° रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यावर १८०° रेखावृत १२ तासांच्या फरकाने येते, त्यामुळे या रेखावृत्ताच्या अनुषंगाने दिनांक व वारामध्ये बदल किंवा समायोजन केले जाते. 

ii) जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही १८०° रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली जाते.

प्रश्न. 5. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल, ते नकाशासंग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. 

अ) मुंबई-लंडन-न्यूयॉर्क-लॉसएंजिलिस-टोकियो. 

आ) दिल्ली-कोलकाता-सिंगापूर-मेलबर्न. 

इ) कोलकाता-हाँगकाँग-टोकियो-सॅनफ्रॅन्सिस्को

ई) चेन्नई-सिंगापूर-टोकियो-सिडनी-सांतियागो

उ) दिल्ली-लंडन-न्यूयॉर्क

उत्तर :

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग – 1 बोर्ड प्रश्नपत्रिका 2022

1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा :

i) सोने विलेपित दागिने हे ……………………. चे एक उदाहरण आहे. 

अ) विद्युत विलेपन

ब) संमिश्रीकरण

क) धनाग्रीकरण

ड) जस्त विलेपन

उत्तर :

सोने विलेपित दागिने हे विद्युत विलेपन चे एक उदाहरण आहे.

ii) उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य …………………. च्या नियमावर आधारित आहे. 

अ) न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम

ब) न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम

क) न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम

ड) न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

उत्तर :

उपग्रह प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम च्या नियमावर आधारित आहे.

iii) L.P.G. मध्ये ………………. हा एक ज्वलनशील घटक असतो. 

अ) इथेन

ब) प्रोपेन

क) मिथेन

ड) इथिन

उत्तर :

L.P.G. मध्ये प्रोपेन हा एक ज्वलनशील घटक असतो.

iv) बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती ………………. आहे. 

अ) 4.0 D

ब) 0.25 D

क) -4.0 D

ड) -0.4 D

उत्तर :

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेंमी आहे, तर भिंगाची शक्ती 4.0 D आहे.

v) शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ………………. रंग सर्वात कमी वळतो. 

अ) लाल

ब) पिवळा

क) जांभळा

ड) निळा

उत्तर :

शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता लाल रंग सर्वात कमी वळतो.

ब) खालील प्रश्न सोडवा :

i) वेगळा घटक ओळखा :

INSAT, GSAT, IRS, PSLV

उत्तर :

PSLV

ii) सहसंबंध ओळखा :

गण 1 : अल्कली धातू :: ……………. : हॅलोजन

उत्तर :

गण 1 : अल्कली धातू :: गण 17 : हॅलोजन

iii) योग्य जोडी जुळवा :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

अ) 1.31

ब) 1.36

क) 1.33

उत्तर :

 स्तंभ ‘अ’

 स्तंभ ‘ब’

 पाण्याचा अपवर्तनांक

क) 1.33

iv) चूक की बरोबर ते लिहा :

विद्युत मोटार यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. 

उत्तर :

चूक

v) दिलेल्या रचनासूत्रासाठी IUPAC नाव लिहा :

उत्तर :

प्रोपेन-2-ओल

2. अ) शास्त्रीय कारणे लिहा (कोणतीही दोन) 

i) गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. 

उत्तर :

i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.

ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ii) घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. 

उत्तर :

i) साध्या सूक्ष्मदर्शीच्या अथवा विशालक भिंगाच्या (बहिर्गोल भिंगाच्या) नाभीय अंतराच्या आत वस्तू ठेवली असता तिची सुलट व मोठी प्रतिमा भिंगाच्या त्याच बाजूस दिसते.

ii) वस्तूच्या विशालकापासूनच्या अंतराचे अनुयोजन करून ही मोठी प्रतिमा सुस्पष्ट दृष्टीच्या लघुतम अंतरावर मिळवता येते. त्यामुळे डोळ्यावर ताण न पडता घड्याळाचे सूक्ष्म भाग सुलट व मोठे दिसण्यासाठी घड्याळे दुरुस्त करताना घड्याळजी साधी सूक्ष्मदर्शी अथवा विशालक (बहिर्गोल भिंग) वापरतात.

iii) खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. 

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खादयतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

ब) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) :

i) जर एका ग्रहावर एक वस्तू 5m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती ?

उत्तर :

ii) होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा. 

उत्तर :

iii) प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा. 

उत्तर :

प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम :

i) आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या सद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका काच प्रतलात असतात.

ii) दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता sin i/sin r हे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून, r हा अपवर्ती कोन आहे.

iv) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

a) अँल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा. 

उत्तर :

बॉक्साईड

b) अँल्युमिनिअम धातुकातील मृदा अशुद्धी लिहा. 

उत्तर :

सिलिका, आयर्न ऑक्साइड

v) खालील दिलेल्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाच्या आकृतीचे निरीक्षण करून ‘अ’ आणि ‘ब’ या ठिकाणी योग्य नामनिर्देशन करा :

3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही पाच) :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्रुटी लिहा. 

उत्तर :

i) मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत कोबाल्ट (Co) व निकेल (Ni) या मूलद्रव्यांचे पूर्णाकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती.

ii) मेंडेलीव्हने आवर्तसारणीत मांडल्यानंतर खूप काळाने सम स्थानिकांचा शोध लागला समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर भिन्न अणुवस्तुमाने असल्यामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत त्यांना कशा प्रकारे स्थान द्यावयाचे हे एक मोठे आव्हान होते.

iii) मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांना शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलीव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य नव्हते.

iv) हायड्रोजनचे स्थान : हायड्रोजनची जागा अल्क धातूंच्या गणात (गण I) की हॅलोजनांच्या गणात (गण VIII) हे निश्चित ठरवता आले नाही.

ii) दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा :

उत्तर :

केप्लरचा पहिला नियम :

ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.

केप्लरचा दुसरा नियम :

ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.

केप्लरचा तिसरा नियम :

सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्गहा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.

iii) खालील रासायनिक अभिक्रियाचे प्रकार ओळखा :

अ) CuSO4 + Fe  FeSO4 + Cu

उत्तर :

विस्थापन अभिक्रिया

ब) 2Mg + O2  2MgO

उत्तर :

संयोग अभिक्रिया

क) 2KClO3  2KCl + 3O2

अपघटन अभिक्रिया

iv)

v) खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही, जोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही.

अ) उष्णतेचे स्थानांतरण कोठून कोठे होते. 

उत्तर :

उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे उष्णता स्थानांतरण होते.

ब) अशा स्थितीत आपल्याला उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो ?

उत्तर :

उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो.

क) ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल ?

उत्तर :

उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता.

vi) बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

 ………………..

 ………………….

 2.

 ………………….

 अनंत अंतरावर

………………….

 3.

 …………………

 …………………

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

उत्तर :

 अ.क्र.

 वस्तूचे स्थान

प्रतिमेचे स्थान

प्रतिमेचे स्वरूप

 1.

 2F1 च्या पलीकडे

Fआणि 2F2 या दरम्यान

 वास्तव व उलट

 2.

नाभी F1 वर

 अनंत अंतरावर

वास्तव व उलट

 3.

 F1 आणि 2F1 यांच्या दरम्यान

 2F1 च्या पलीकडे

 वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी

vii) खालील संज्ञा स्पष्ट करा :

अ) धातुविज्ञान 

उत्तर :

धातुकांपासून धातूंचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरुन जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.

ब) धातुके

उत्तर :

ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात.

क) मृदा अशुद्धी

उत्तर :

धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धीला मृदा अशुद्धी म्हणतात.

viii) अवकाश मोहिमांचे महत्त्व सांगा. 

उत्तर :

i) अवकाश मोहिमामुळेच आता क्षणार्धात जागतिक संपर्क साधून माहितीची देवाणघेवाण करता येते.

ii) युद्धात शत्रुसैन्याचा सुगावा, काही नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना, आपत्ती व्यवस्थापन, खनिज साठ्यांचा शोध, व्यापार पर्यटन वाहतूक सेवांची सुलभता, जगाचे वैश्विक खेड्यात रूपांतर इत्यादी असंख्य फायदे मानवाच्या अवकाश मोहिमांमुळे लाभले आहेत.

iii) अवकाश मोहिमांमुळे सूर्यमंडल, त्यापलीकडील विश्व यांची अधिक माहिती/ज्ञान मिळण्याबरोबरच, पृथ्वीवरील मानवी जीवनातही खूप बदल झाले.

4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही एक) :

i) खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :

अ) वरील आकृतीत दर्शविलेले यंत्र ओळखा. 

उत्तर :

आकृतीत विद्युत जनित्र हे यंत्र आहे.

ब) या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर आधारित आहे ?

उत्तर :

हे यंत्र विद्युतचुंबकीय प्रवर्तन या तत्त्वावर कार्य करते. कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलास विद्युतधारानिर्माण होते.

क) या यंत्राचे कार्य स्पष्ट करा. 

उत्तर :

1) फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते ती ABCD या दिशेने जाते.

2) पुढील परिपथात विद्युतधारा B2 → B1 अशी गॅल्व्हाॅनोमीटर मधून जाते.

3) अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CD च्या जागी व CD ही शाखा AB च्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा DCBA या दिशेने जाते.

4) बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 → B2 अशी म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती निर्माण होते.

ड) या यंत्राचा उपयोग लिहा. 

उत्तर :

या यंत्राचा उपयोग यांत्रिक ऊर्जेच्या मदतीने विद्युत निर्मिती करण्यासाठी केला जातो.

ii) अ) दिलेल्या रचना सूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा :

1) 

 

 

उत्तर :

संपृक्त

 

2)  

उत्तर :

असंपृक्त

 

ब) वरील 1) व 2) या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका सरंचना रेखाटा. 

1)

2)

 

क) समजातीय श्रेणी म्हणजे काय ?

उत्तर :

उत्तर :

कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात.

नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते

प्रश्न

 नॅफ्थॅलीनच्या ज्वलनामध्ये ज्योत पिवळी दिसते.

उत्तर

 

 

i) नॅफ्थॅलीन हे असंपृक्त संयुग आहे. असंपृक्त संयुगामध्ये कार्बनचे प्रमाण संपृक्त संयुगांच्या मानाने जास्त असते. त्यामुळे असंपृक्त संयुगाच्या ज्वलनाच्या दरम्यान न जळलेले कार्बन कण सुद्धा तयार होतात.

ii) ज्योतीमध्ये असताना हे तापलेले कण पिवळा प्रकाश फेकतात, त्यामुळे ज्योत पिवळी दिसते.

तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत

प्रश्न

 तारे लुकलुकतात, पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत.

उत्तर

 

 

i) तारे पृथ्वीपासून खूप दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाशम्रोतासारखे असते. हवेची होणारी सततची हालचाल, तसेच घनता व तापमान यांमधील बदल यामुळे वातावरण स्थिर नसते. परिणामी त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो. म्हणून ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. त्यामुळे आपणास तारे लुकलुकताना दिसतात.

ii) ताऱ्यांच्या तुलनेत ग्रह बरेच जवळ असतात व ते एक बिंदूस्रोत नसून बिंदूस्रोतांचा समूह असतो. परिणामी, वातावरण स्थिर नसले तरी, ग्रहांची सरासरी प्रखरता स्थिर राहते. तसेच त्यांचे सरासरी स्थानही स्थिर राहते. म्हणून आपणास ग्रह लुकलुकताना दिसत नाहीत.

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो

प्रश्न

जलाशयातील पाण्याची खोली असते, त्यापेक्षा ती कमी भासते. 

किंवा  

जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो. 

किंवा 

पाण्याने भरलेल्या डबक्याचा तळ वर उचलल्यासारखा दिसतो. 

उत्तर

 

 

i) जलाशयाच्या तळाकडून निघालेले प्रकाशकिरण पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमामध्ये प्रवेश करीत असता, ते स्तंभिकेपासून दूर जातात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) त्यामुळे अपवर्तित किरण जलाशयाच्या तळाकडून न येता वरून आल्याचा भास होतो. म्हणून पाण्याची खोली कमी भासते किंवा जलाशयाचा तळ वर उचलल्यासारखा भासतो.

वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

वर्णपंक्ती कशी तयार होते ? स्पष्ट करा

उत्तर : 

प्रकाशझोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्गपंक्ती म्हणतात. लोलकम्मधून पांढरा प्रकाशकिरण गेल्यावर अपवर्तन होऊन आपाती किरणाच्या मानाने वेगवेगळ्या रंगांचे किरण वेगवेगळ्या कोनांतून वळतात. तांबड्या रंगाचा किरण सर्वात कमी वळतो, तर जांभळ्या रंगाचा किरण सर्वात जास्त वळतो. प्रत्येक रंगाचे किरण लोलकामधून वेगवेगळ्या मागांनी बाहेर पडतात. बाहेर पडताना वेगवेगळ्या रंगांचे किरण विभक्त होतात. त्यामुळे सप्तरंगांची वर्णपंक्ती मिळते.

भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते

 

 एका वाक्यात उत्तरे लिहा 

प्रश्न

 भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते ?

उत्तर

 

गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य होय.

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. A) माझी जोडी कोणाशी ?

 ‘अ’ स्तंभ 

‘ब’ स्तंभ 

1) निरोगी मानवी शरीराचे तापमान

2) पाण्याचा उत्कलन बिंदू

3) कक्ष तापमान

4) पाण्याचा गोठन बिंदू

अ) 296 K

आ) 98.6°F

इ) 0°C

ई) 212°F

उत्तर :

 ‘अ’ स्तंभ 

‘ब’ स्तंभ 

1) निरोगी मानवी शरीराचे तापमान

2) पाण्याचा उत्कलन बिंदू

3) कक्ष तापमान

4) पाण्याचा गोठन बिंदू

आ) 98.6°F

ई) 212°F

अ) 296 K

इ) 0°C 

B) कोण खर बोलतोय ?

1) पदार्थाचे तापमान ज्यूलमध्ये मोजतात.

उत्तर :

खोटे

2) उष्णता उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते.

उत्तर :

खरे

3) उष्णतेचे एकक ज्यूल आहे.

उत्तर :

खोटे

4) उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात. 

उत्तर :

खोटे

5) स्थायुचे अणू स्वतंत्र असतात.

उत्तर :

खोटे

6) उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतिज ऊर्जा थंड वस्तूच्या सरासरी गतिज ऊर्जेपेक्षा कमी असते.

उत्तर :

खोटे

C) शोधाल तर सापडेल.

1) तापमापी हे उपकरण ………………… मोजण्यास वापरतात.

उत्तर :

तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात.

2) उष्णता मोजण्यास ……………….. हे उपकरण वापरतात.

उत्तर :

उष्णता मोजण्यास कॅलरीमापी हे उपकरण वापरतात.

3) तापमान हे वस्तूतील अणूंच्या ……………….. गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

उत्तर :

तापमान हे वस्तूतील अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

4) एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या ………………… गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

उत्तर :

एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या एकूण गतिज ऊर्जेचे प्रमाण असते.

प्रश्न. 2. निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौरचुलीत ठेवले. शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले. कोणाचा चहा लवकर तयार होईल व का ?

 उत्तर :

शिवानीचा चहा लवकर होईल.  कारण चहाने ग्रहण केलेली उष्णता दोन्ही बाबतीत समान आहे. पण उष्णता पुरविण्याचा वेग गॅसच्या बाबतीत जास्त आहे. त्यामुळे आवश्यक ती उष्णता गॅस कमी वेळात पुरवितो.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा. त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो ?

उत्तर :

वैद्यकीय तापमापीचा उपयोग माणसाच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी होतो.

या तापमापीत एक अरुंद काचेची नळी असते. तिच्या एकाटोकाकडे फुगा असतो. त्यात अल्कोहोल भरतात. नळीतील उरलेली जागा निर्वात केलेली असते. हे टोक बंद असते. ह्या तापमापीवर 35°C ते 42°C पर्यंत खुणा केलेल्या असतात. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 37°C असते. रोग्याच्या शरीराचे तापमान मोजताना तापमापीचा फुगा रोग्याच्या तोंडात किंवा काखेत ठेवतात. एका मिनिटात तापमापी काढून त्याचे वाचन घेतात. सध्या डिजिटल तापमापी सुद्धा वापरतात.

प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापी – 

ही तापमापी वैद्यकीय तापमापी सारखीच असते पण त्यावरील खूणा वेगळ्या असतात. याच्या साहाय्याने मोजलेल्या तापमानाचा आवाका मोठा असतो. प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या तापमापी वापरतात. त्यापैकी कमाल व किमान तापमापीने विशिष्ट कालावधीतील कमाल व किमान तापमानाची नोंद करता येते.

2) उष्णता व तापमान काय फरक आहे ? त्यांची एकके कोणती ? 

उत्तर :

पदार्थांतील अणू रेणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थांतील उष्णतेचे मापक असते. तर तापमान अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते.

दोन वस्तूचे तापमान समान समान असते. असेल तर त्यातील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असते. 

तापमानाचे एकक अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाईट किंवा केल्वीन आहे. उष्णतेचे एकक कॅलरी किंवा किलोकॅलरी आहे.

3) कॅलरीमापीची रचना आकृतीसह समजवा. 

उत्तर :

कॅलरीमापीचा उपयोग वस्तूतील उष्णता ऊर्जा मोजण्यासाठी होतो.

कॅलरीमापीची आकृती पहा. यात एखाद्या थर्मासफ्लास्कप्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. या मांडणीमुळे भांड्यात ठेवलेल्या वस्तूची उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरील उष्णता आत प्रवेश करू शकत नाही. अर्थात आतील भांडे व त्यातील वस्तू औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. त्यामुळे कॅलरीमापीत ठेवलेल्या वस्तूपैकी उष्ण वस्तू थंड वस्तूला उष्णता देते. ही देवाणघेवाण होऊन दोन्ही वस्तूचे तापमान समान होते. 

येथे उष्ण वस्तूने दिलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता हे उष्णता विनिमयाचे तत्त्व गृहीत धरण्यात येते.  

4) रेल्वेच्या रूळांत ठरावीक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा. 

उत्तर :

तापमानाच्या बदलानुसार रेल्वेचे रूळ आकुंचन किंवा प्रसरण पावतात. मुळे त्यांची लांबी कमी जास्त होते. दोन रूळामध्ये फट ठेवली नाहीतर रण होण्यास वाव नसल्यामुळे रेल्वेचे रूळ वाकडे होतील त्यामुळे अपघात ऊ शकतो. हे टाळण्यासाठी रेल्वे रूळात फट ठेवली असते.

5) वायूचा व द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्रांद्वारे स्पष्ट करा. 

उत्तर :

द्रवाचा प्रसरणांक – समजा द्रवाचे सुरुवातीचे आकारमान V1 आहे व ∆T एवढ्या तापमान बदलामुळे त्याचे आकारमान V2 होते.

यावरून

V2 = V1 (1+β∆T)

यात B ला द्रवाचा प्रसरणांक म्हणतात.

वायूचा प्रसरणांक – वायूला ठरावीक आकार व आकारमान नसते. तापमान वाढल्यास आकारमान वाढते. त्याच वेळेस त्याचा दाब बदलतो. वायुचा दाब कायम ठेऊन, तापमानातील बदलामुळे त्याच्या आकारमानातील बदल -अभ्यासण्यासाठी सरकणारा दट्ट्या (Piston) असलेली बाटली वापरतात.

पिस्टनच्या साहाय्याने वायूवरील दाब कायम ठेऊन तापमान वाढीमुळे आकारमानातील वाढ किती होते ते मोजतात.

समजा ∆T एवढ्या तापमान फरकामुळे वायूचे आकारमान V, पासून V, पर्यंत बदलते.

यावरून

V2 = V1 (1 + β∆T)

यातला β वायुचा प्रसरणांक म्हणतात.

प्रश्न. 4. खालील उदाहरणे सोडवा. 

1) फॅरेनहाईट एकाकातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एकाकातील तापमानाच्या दुप्पट असेल ?

उत्तर :

 

2) एक पूल 20m लांबीच्या लोखंडाच्या सळईने तयार केला आहे. तापमान  18°C असताना दोन सळ्यांत 4cm अंतर आहे. किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील ?

उत्तर :

3) आयफेल टॉवरची उंची 15°C वर 324m असल्यास व तो टॉवर लोखंडाचा असल्यास, 30°C ला त्याची उंची किती cm ने वाढेल ?

उत्तर :

 

4) अ व ब पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमश: c व 2c आहे. अ ला Q व ब ला 4Q एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो. जर अ चे वस्तुमान m असेल तर ब चे वस्तुमान किती असेल ?

उत्तर :


5) एक 3kg वस्तुमानाची वस्तु 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान 10°C पासून 70°C पर्यंत वाढते.  वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे ?

उत्तर :

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय

रासायनिक बदल व रासायनिक बंध स्वाध्याय इयत्ता आठवी 

प्रश्न. 1. कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागी भरून वाक्य पूर्ण करा.

(सावकाश, रंगीत, बाण, जलद, वास, दुधाळ, भौतिक, उत्पादित, रासायनिक, अभिकारक, सहसंयुज, आयनिक, अष्टक, द्विक, आदान-प्रदान, संदान, बरोबरचे चिन्ह)

1) रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ………………. काढतात.

उत्तर :

रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये बरोबर चे चिन्ह काढतात.

2) लोखंडाचे गंजणे हा ………………… होणारा रासायनिक बदल आहे. 

उत्तर :

लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. 

3) अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट …………………… निर्माण होतो त्यावरून ओळखता येते.

उत्तर :

अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्यात विशिष्ट वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते.

4) परीक्षानळीतील कॅल्शिअम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण ………………………. होते.

उत्तर :

परीक्षानळीतील कॅल्शिअम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण दुधाळ होते.

5) लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा ……………………. बदल आहे.

उत्तर :

लिंबूरसात थोडे खाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात, म्हणजेच हा रासायनिक बदल आहे.

6) श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक ……………………. आहे.

उत्तर :

श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक अभिकारक आहे.

7) सोडिअम क्लोराइड हे ……………………. संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे …………………….. संयुग आहे.

उत्तर :

सोडिअम क्लोराइड हे आयनिक संयुग आहे, तर हायड्रोजन क्लोराइड हे सहसंयुज संयुग आहे.

8) हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन ………………………. पूर्ण असते.

उत्तर :

हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण असते.

9) क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे ……………………. होऊन Cl हा रेणू तयार होतो.

उत्तर :

क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संदान होऊन Cl हा रेणू तयार होतो.

प्रश्न. 2. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा.

1) श्वसन हा एक रासायनिक बदल आहे.

उत्तर :

ग्लुकोज + ऑक्सिजन  →/श्वसन  कार्बन डायऑक्साइड + पाणी 

श्वासावाटे आत घेतलेल्या ऑक्सिजनची पेशीतील ग्लुकोजबरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते.

2) धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्फेन पाणी सुफेन होते. 

उत्तर :

कॅल्शिअम क्लोराइड + सोडिअम कार्बोनेट → कॅल्शियम कार्बोनेट + सोडियम क्लोराइड

दुष्फेन पाण्यामध्ये कॅल्शिअम क्लोराइड विरघळलेले असते. त्यात सोडिअम कार्बोनेट टाकल्यास अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडिअम क्लोराइड तयार होतात. त्यामुळे पाणी सुफेन बनते.

3) विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते.

उत्तर :

विरल हायड्रोक्लोरिक आम्ल + चुनखडी → कॅल्शिअम क्लोराइड + कार्बन डाय ऑक्साइड + पाणी 

विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची चुनखडीवर अभिक्रिया होऊन कॅल्शिअम क्लोराईड व कार्बन डायऑक्साइड आणि पाणी तयार होते. कॅल्शिअम क्लोराइड पाण्यात विरघळते व कार्बन डायऑक्साइड हवेतून निघून जातो. त्यामुळे चुनखडी दिसेनाशी होते.

4) खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबूरस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. 

उत्तर :
सायट्रिक आम्ल + सोडियमबाय कार्बोनेट → कार्बन डायआक्साईड + सोडिअम सायट्रेट 

खाण्याचा सोडा म्हणजे सोडिअम बायकार्बोनेट, लिंबू रस म्हणजे सायट्रिक आम्ल, निघणारे बुडबुडे कार्बन डायऑक्साइडचे असतात.

प्रश्न. 3. जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट  

‘ब’ गट

1) प्रकाशसंश्लेषण

2) पाणी

3) सोडिअम क्लोराइड

4) पाण्यात मीठ विरघळणे

5) कार्बन

6) फ्लुओरिन

7) मॅग्नेशिअम

अ) इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती 

आ) ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक

इ) रासायनिक बदल

ई) सहसंयुज बंध

उ) आयनिक संयुग

ऊ) भौतिक बदल

ए) ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती

उत्तर :

 ‘अ’ गट  

‘ब’ गट

1) प्रकाशसंश्लेषण

2) पाणी

3) सोडिअम क्लोराइड

4) पाण्यात मीठ विरघळणे

5) कार्बन

6) फ्लुओरिन

7) मॅग्नेशिअम

इ) रासायनिक बदल

ई) सहसंयुज बंध

उ) आयनिक संयुग

ऊ) भौतिक बदल

आ) ज्वलनप्रक्रियेतील अभिकारक 

अ) इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती  

ए) ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती

प्रश्न. 4. घटक अणूंपासून पुढील संयुगांची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन संरुपणाच्या रेखाटनाने दर्शवा. 

1) सोडिअम क्लोराइड

उत्तर :

2) पोटॅशिअम फ्लुओराइड

उत्तर :

3) पाणी (H2O) 

उत्तर :

4) हायड्रोजन क्लोराइड

उत्तर :