आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय

आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय

आम्ल, आम्लारी ओळख स्वाध्याय इयत्ता आठवी 

प्रश्न. 1. खालील दिलेली द्रावणे आम्ल आणि आम्लारी ओळखा.  

 द्रावण 

दर्शकात झालेला बदल  

आम्ल/आम्लारी 

 लिटमस 

फिनाॅल्फ्थॅलिन  

मिथिल ऑरेंज  

 i) 

 

बदल नाही 

 

 

 ii) 

 

 

 नारंगी बदलून लाल झाला. 

 

 iii)

लाल लिटमस निळा झाला. 

 

 

 

उत्तर 

 द्रावण 

दर्शकात झालेला बदल  

आम्ल/आम्लारी 

 लिटमस 

फिनाॅल्फ्थॅलिन  

मिथिल ऑरेंज  

 i) 

निळा लिटमस लाल झाला. 

बदल नाही 

नारंगी गुलाबी झाला. 

आम्ल

 ii) 

निळा लिटमस लाल झाला. 

बदल नाही

नारंगी बदलून लाल झाला. 

आम्ल

 iii) 

लाल लिटमस निळा झाला. 

रंगहीन गुलाबी होतो. 

नारंगी बदलून पिवळा झाला

आम्लारी

प्रश्न. 2. सूत्रावरून नावे लिहा.

H2SO4, Ca(OH)2, HCI, NaOH, KOH, NH4OH

उत्तर :

i) H2SO4 – सल्फ्युरिक आम्ल

ii) Ca(OH)2 – कॅल्शिअम हायड्रॉक्साइड

iii) HCl – हायड्रोक्लोरिक आम्ल

iv) NaOH – सोडिअम हायड्राऑक्साइड

v) KOH – पोटॅशिअम हायड्राऑक्साइड

vi) NH4OH – अमोनिअम हायड्राऑक्साइड

प्रश्न. 3. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उदयोगधंदयात सर्वांत जास्त महत्त्व का आहे ?

उत्तर :

H2SO4 ला रासायनिक उद्योगामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण हे आम्ल बहुतेक सर्व अभिक्रिया घडवून आणण्यासाठी इतर आम्लापेक्षा जास्त वापरात येते. उदा. विदयुत घटामध्ये, रासायनिक खतांच्या उत्पादनात. 

प्रश्न. 4. उत्तरे द्या.

1) क्लोराइड क्षार मिळवण्यास कोणते आम्ल वापरले पाहिजे ? 

उत्तर :

क्लोराइड क्षार मिळवण्यासाठी हायड्रोक्लोरीक आम्ल HCl हे आम्ल वापरले पाहिजे. 

2) एका खडकाच्या नमुन्यावर लिंबाचा रस पिळताच तो फसफसतो आणि त्यात निर्माण होणाऱ्या वायूने चुन्याची निवळी पांढरी बनते. खडकात कोणत्या प्रकारचे संयुग आहे ?

उत्तर :

खडकात कार्बोनेट (CO3) हे संयुग आहे. 

3) प्रयोगशाळेतील एका अभिक्रियाकारकाच्या बाटलीवरची चिठ्ठी खराब झाली. त्या बाटलीतील द्रव्य आम्ल आहे की नाही हे तुम्ही कसे शोधून काढाल.

उत्तर :

ओलसर निळा लिटमस पेपर त्या द्रवात बुडवावा. पेपर लाल झाल्यास ते द्रव्य आम्ल आहे असे समजावे.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) आम्ल व आम्लारीतील फरक स्पष्ट करा.

उत्तर :

 आम्ल 

आम्लारी 


i) हायड्रोजन आयन Hहा मुख्य घटक असतो. 

ii) चव आंबट असते. 

iii) सामान्यत: अधातू ऑक्साइडपासून आम्ल पासून तयार होते. 


i) हायड्राक्साइड हा OH मुख्य घटक असतो. 

ii) चव कडवट असते. 

iii) सामान्यत: धातू ऑक्साइडपासून आम्लारी तयार होते. 

2) दर्शकावर मिठाचा परिणाम का होत नाही ? 

उत्तर :

दर्शकाचा रंग आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो. मीठ उदासीन क्षार आहे म्हणून दर्शकावर मीठाचा परिणाम होत 

3) उदासिनीकरणातून कोणते पदार्थ निर्माण होतात.

उत्तर :

आम्ल आणि आम्लारीच्या उदासिनीकरणातून क्षार व पाणी हे पदार्थ निर्माण होतात. 

आम्ल + आम्लारी ➝  क्षार + पाणी

HCl + NaOH ➝  NaCl + H2O

4) आम्लाचे औद्योगिक उपयोग कोणते ?

उत्तर :

आम्लाचे औद्योगिक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. 

i) रासायनिक खतांचे उत्पादन 

ii) तेलाच्या शुद्धिकरण प्रक्रियेत औषधी द्रव्ये, रंग, स्फोटक द्रव्ये इत्यादीच्या प्रक्रियेत आम्लाचा उपयोग होतो. 

iii) क्षार बनविण्यासाठी.

iv) H2SO4 बॅटरीमध्ये वापरतात. 

v) HCI पाणी जंतुरहित करण्यासाठी..

vi) लाकडाचा रंग पांढरा बनविण्यासाठी आम्लाचा वापर होतो. 

प्रश्न. 6. रिकाम्या जागा भरा.

1) आम्लातील प्रमुख घटक …………………… आहे. 

उत्तर :

आम्लातील प्रमुख घटक H+ आहे. 

2) आम्लारीतील प्रमुख घटक …………………… आहे. 

उत्तर :

आम्लारीतील प्रमुख घटक OH  आहे. 

3) टार्टरिक हे ………………… आम्ल आहे. 

उत्तर :

टार्टरिक हे सेंद्रिय आम्ल आहे. 

प्रश्न. 7. जोड्या लावा.

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) चिंच

2) दही 

3) लिंबू 

4) व्हिनेगर

अ) अँसेटिक आम्ल

आ) सायट्रिक आम्ल 

इ) टार्टोरिक आम्ल

ई) लॅक्टिक आम्ल

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) चिंच

2) दही 

3) लिंबू 

4) व्हिनेगर

इ) टार्टोरिक आम्ल

ई) लॅक्टिक आम्ल

आ) सायट्रिक आम्ल  

अ) अँसेटिक आम्ल

प्रश्न. 8. चूक की बरोबर. 

1) धातूंची ऑक्साइडस् आम्लारीधर्मी असतात. 

उत्तर :

चूक

2) मीठ आम्लधर्मी आहे.

उत्तर :

चूक

3) क्षारांमुळे धातूचे क्षरण होते.

उत्तर :

चूक

4) क्षार उदासीन असतात.

उत्तर :

बरोबर

प्रश्न. 9. पुढील पदार्थाचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन या गटात वर्गीकरण करा.

HCI, NaCl, MgO, KCI, CaO, H2SO4, HNO3, H2O, Na2CO3 

उत्तर :

आम्लधर्मी – HCI, H2SO4, HNO3

आम्लारीधर्मी – MgO, CaO

उदासीन – NaCl, KCl, H2O, Na2CO3

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय

मानवी शरीर व इंद्रिय संस्था स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. माझा जोडीदार शोधा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

अ) 350 मिली

आ) 7.4 

इ) 37°C

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) ह्रदयाचे ठोके

2) RBC

3) WBC

4) रक्तदान

5) निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान

6) ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 

ई) 72 

उ) 50 ते 60 लक्ष प्रति घ. मिली

ऊ) 5000 ते 10,000 प्रति घ. मिली

अ) 350 मिली 

इ) 37°C 

आ) 7.4  

प्रश्न. 2. खालील तक्ता पूर्ण करा. 

 इंद्रिय संस्था

इंद्रिये 

कार्ये 

 1) श्वसनसंस्था

 

 

 2) रक्तभिसरण संस्था

 

 

उत्तर :

 इंद्रिय संस्था

 इंद्रिये

 कार्ये 


1) श्वसनसंस्था

 नाक 

हवा आत गाळून घेणे.  

 घसा

हवा श्वासनलिकेपर्यंत पोहचवणे. 

 श्वासनलिका

हवा फुफ्फुसापर्यंत पोहचवणे.  

 फुफ्फुसे

हवेची देवाण घेवाण होते.  

 श्वासपटल 

श्वासोच्छ्वास घडवून आणतो.  

 2) रक्तभिसरण संस्था

 ह्रदय 

रक्त पंप करण्याचे वहन करणे.  

 रक्तवाहिन्या

शरीरात रक्ताचे वहन करणे.  

 केशवाहिन्या

शरीरातील सर्व पेशींना रक्तपुरवठा करणे.  

प्रश्न. 3. नामनिर्देशित सुबक आकृती काढा. 

1) श्वसनसंस्था

उत्तर :


2) ह्रदयची आंतररचना

उत्तर :

प्रश्न. 4. सकारण स्पष्ट करा.

1) मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते. 

उत्तर :

कारण i) मानवी रक्त लोहित रक्तपेशींनी बनलेले असते. 

ii) लोहित रक्तपेशीत हिमोग्लोबिन घटक असतो. हिमोग्लोबिन या घटकामुळे मानवाचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

2) श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

उत्तर :

कारण i) बरगड्यावर जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकाच वेळी घडून आल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो व बाहेरील हवा नाकाद्वारे फुफ्फुसांमध्ये जाते. 

ii) बरगड्या मूळ जागी परत आले व श्वासपटल वर गेला की फुफ्फुसावर दाब पडून त्यातील हवा नाकाद्वारे बाहेर ढकलली जाते. 

iii) त्यामुळे श्वाच्छोच्छ्वास घडून येतो व श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते. 

3) रक्तदानास सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

उत्तर :

कारण i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) एका रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान संबोधले जाते.

4) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.

उत्तर :

कारण i) ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतर रक्तगट असलेल्या व्यक्तीस देता येते. 

ii) याकारणाने ‘O’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘सार्वत्रिक दाता’ म्हणतात.

5) आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे. 

उत्तर :

कारण i) मीठामधील सोडिअम हे रक्तदाब आणि हृदयविकारांना कारणीभूत आहे. 

ii) याकारणाने आहारात मीठाचे प्रमाण कमी असावे.

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. 

1) रक्तभिसरण संस्थेचा श्वसन, पचन व उत्सर्जन संस्थेशी असणारा संबंध कार्याच्या स्वरूपात लिहा.

उत्तर :

i) रक्ताभिसरण संस्था व श्वसन संस्था दोन्हीच्या मदतीने शरीरात पेशीतील वायूची देवाण घेवाण होते. जर वायूची देवाण घेवाण झाली नाही तर सर्व पेशी मृत होतील. त्याचबरोबर श्वसनसंस्थेमुळेच शरीरात ऑक्सिजन प्रवेश करते ते रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते.

ii) पचनसंस्थेमार्फत विविध पोषकद्रव्य तयार केले जातात जे रक्ताभिसरण संस्थेमार्फत शरीरभर पोहचवले जाते. तसेच पचन न झालेले घातक पदार्थ सुद्धा रक्ताभिसरण संस्थेद्वारे वृक्कापर्यंत पोहचवले जाते.

iii) वृक्कापर्यंत आलेल्या रक्तातून युरीआ, युरीक आम्ल, पाणी रक्तातून वेगळे काढून पुन्हा संस्थेला पोहचवले जाते.

अशाप्रकारे रक्ताभिसरण संस्थेचा श्वसन पचन व उत्सर्जन संस्थेशी संबंध येतो.

2) मानवी रक्ताची संरचना व कार्ये लिहा.

उत्तर :

मानवी रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते. 

मानवी रक्ताची कार्ये – i) उतींना प्राणवायू पुरवणे. 

ii) यकृताकडून ग्लुकोज, अमिनो आम्ले आणि मेदाम्ले या घटकांचा पुरवठा. यातील मेदाम्ले प्लाझमा प्रथिनाबरोबर वाहून नेली जातात. ग्लुकोज आणि अमोनिया आम्ले मात्र रक्तरसामध्ये विरघळलेली असतात. 

iii) कार्बन डायऑक्साइड, युरिया आणि लॅक्टिक आम्ल अशी अवशिष्टे काढून टाकते. 

iv) श्वेतपेशींच्या साहाय्याने शरीरातील आगंतुक घटकांचा शोध आणि त्याविरुद्ध प्रतिकार यंत्रणा उभी करते. प्रतिपिंड निर्मिती करते. 

v) रक्त कलयन – शरीरातील स्वयं दुरुस्ती यंत्रणा. शरीरातील रक्त वाहिन्यामधून बाहेर पडले म्हणजे रक्तकलयन यंत्रणा कार्यान्वित होते. प्लेटलेट्स रक्तातील थ्रॉबिनच्या तंतूमध्ये अडकून रक्त गोठते. उदा. जखमेमधून वाहणारे रक्त थांबते. 

vi) संप्रेरकाचे वहन-ही शरीराची उतींना संदेश पाठवण्याची प्रभावी यंत्रणा आहे. 

vii) रक्ताचे सामू नियंत्रण. 

viii) शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण. 

ix) द्रवीय कार्य इत्यादी. 

3) रक्तदानाचे महत्त्व व गरज स्पष्ट करा.

उत्तर :

महत्त्व व गरज – i) मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. 

ii) कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. 

iii) रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते. 

iv) ॲलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. 

v) कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. 

vi) आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात. अशाच प्रकारे एका व्यक्तीच्या रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात. 

प्रश्न. 6. फरक स्पष्ट करा. 

1) धमन्या व शिरा

उत्तर :

 धमन्या 

शिरा

 i) ह्रदयापासून उतकाकडे ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीस धमन्या/रोहिण्या म्हणतात. 

अपवाद – फुफ्फुस धमनी

ii) धमन्यांच्या भित्तिका जाड असून लवचिक असतात. 

iii) धमन्या शरीरात खोलवर स्थित असतात व त्यांना झडपा नसतात. 

iv) धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो. (100mm Hg) 

v) आकारांनुसार उतरता क्रम महाधमनी – धमन्या-धमनिका.

 i) उर्तीकडून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करणाऱ्या रक्तवाहिणीस शिरा म्हणतात.

अपवाद – फुफ्फुस शिरा

ii) शिरांच्या भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात. 

iii) शिरा त्वचेखाली स्थिर असतात व त्यांना झडपा असतात. 

iv) शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. 

(2 mm Hg)

v) आकारानुसार उतरता क्रम महाशिरा – शिरा – शिरिका.

2) बर्हिःश्वसन व अंत: श्वसन

उत्तर :

 बर्हिश्वसन

अंत:श्वसन

 i) बर्हिश्वसन ही भौतिक प्रक्रिया आहे.

ii) ऑक्सिजनयुक्त हवा फुफ्फुसात प्रवेश करणे तसेच कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा फुफ्फुसाबाहेर टाकली जाणे या क्रियेला बर्हिः श्वसन म्हणतात. 

iii) बर्हिः श्वसनाची क्रिया श्वास आणि उच्छ्वास या दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते.

iv) या क्रियेत रक्तातील ऑक्सिजन उतींमध्ये सोडल्या जातो. 

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 100mmHg पासून 40 mm Hg पर्यंत कमी होतो. 

 i) अंतःश्वसन ही जैव रासायनिक प्रक्रिया आहे.

ii) ज्या प्रक्रियेमध्ये पेशीत ग्लुकोजचे संपूर्ण ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यास पेशीश्वसन किंवा अंतःश्वसन म्हणतात.

iii) अंत: श्वसनाची क्रिया विविध सजीवांमध्ये वेगवेगळी असते परंतु पहिली पायरी सर्व सजीवात समान असते.

iv) या क्रियेत वायुकोशिकेतील ऑक्सिजन रक्तामध्ये सोडल्या जातो. (2mm Hg)

v) रक्तातील ऑक्सिजनचा दाब 40mm Hg पासून 100mm Hg पर्यंत वाढतो. 

प्रश्न. 7. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्याल ?

उत्तर :

रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे पुढील निकष लक्षात घेतात.

• रक्तदान करणारा व्यक्ती 18 वर्षांवरील असावा.

• वजन 45 कि.ग्र वर असावे.

• रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रॅम असावे.

• मागील 3 दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतले नसावे..

• मागील 3 महिन्यात मलेरिया झाला नसावा.

• मागील 1 वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश होऊन रेबीजची लस घेतली नसावी.

• 6 महिन्यापूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली नसावी.

• गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षांखालील मूल नसल्यास किंवा तिचा 6 महिन्यात गर्भपात झाला नसावा.

प्रश्न. 8. कंसात दिलेल्या पर्यायांचा योग्य ठिकाणी वापर करा व रिकाम्या जागा भरा.

(हिमोग्लोबीन, आम्लारीधर्मी, श्वासपटल, अस्थिमज्जा, ऐच्छिक, अनैच्छिक, आम्लधर्मी)

1) रक्तातील तांबड्या पेशीमध्ये ………………… हे लोहाचे संयुग असते. 

उत्तर :

रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबीन हे लोहाचे संयुग असते. 

2) ………………… हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 

उत्तर :

श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. 

3) हृदय स्नायू …………….. असतात.

उत्तर :

हृदय स्नायू अनैच्छिक असतात.

4) ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH ……………. असते.

उत्तर :

ऑक्सिजनमुक्त रक्ताचा सामू pH आम्लारीधर्मी असते.

5) RBC ची निर्मिती ……………… मध्ये होते. 

उत्तर :

RBC ची निर्मिती अस्थिमज्जा मध्ये होते. 

प्रश्न. 9. आमच्यातील वेगळे कोण ते ओळखा.

1) A, O, K, AB, B

उत्तर :

K इतर सर्व रक्तगट आहेत.

2) रक्तद्रव्य, रक्तपट्टीका, रक्तपराधान, रक्तकणिका 

उत्तर :

रक्तपराधान इतर सर्व रक्ताचे घटक आहेत.

3) श्वासनलिका, वायुकोश, श्वासपटल, केशिका

उत्तर :

केशिका इतर सर्व श्वसन संस्थेतील आवश्यक अवयव आहेत. 

4) न्युटोफिल, ग्लोब्युलिन्स, अँल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बीन

उत्तर :
प्रोथ्रोम्बीन इतर सर्व रक्तद्रव्याचे घटक आहेत. 

प्रश्न 10- खालील उतारा वाचा व रोग/विकार ओळखा.

आज तिचे बाळ दीड वर्षाचे झाले, पण ते निरोगी, हसरे नाही. ते सारखे किरकिर करते, दिवसेंदिवस अशक्त दिसत आहे. त्याला धाप लागते. त्याचा श्वास फार जलद आहे. त्याची नखे निळसर दिसू लागली आहेत.

उत्तर :

अस्थमा. 

प्रश्न. 11. तुमच्या शेजारच्या काकांचे रक्तदाबाच्या विकाराचे निदान डॉक्टरांनी केले आहे. त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी त्यांनी काय करावे बरे ? 

उत्तर :

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी काकांनी पुढील मदतदायी उपाय करावेत :

• पोटॅशिअमची अधिक मात्रा असलेले अन्न सेवन करावे.

• मद्यसेवन टाळावे.

• नियमित व्यायाम करावा.

• अतिरिक्त प्रमाणात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम संपुरके घ्यावी.

• तंतुमय पदार्थ अधिक असलेला शाकाहारी आहार घ्यावा.

• ताण-तणाव घालवण्यासाठी उपचार करावा.

• धूम्रपान टाळावे.

• कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.

• मधुमेहावर नियंत्रण ठेवावे.

• रक्तदाब वाढवणारी औषधे टाळावी. 

• वजन कमी करणे. 

• आहारात मीठाचे प्रमाण कमी करणे. 

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय

पेशी व पेशीअंगके स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. मला ओळखा.

1) ATP तयार करण्याचा कारखाना आहे. 

उत्तर :

तंतुकणिका.

2) एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो. 

उत्तर :

रिक्तिका.

3) पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.

उत्तर :

आंतर्द्रव्यजालिका

4) पेशींचा जणू रसायन कारखाना

उत्तर :

तंतुकणिका.

5) माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी

उत्तर :

हरितलवक.

प्रश्न. 2. तर काय झाले असते ?

1) लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या. 

उत्तर :

i) लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर लोहितपेशीद्वारे वाहून नेला जाणारा ऑक्सिजन हा इतर पेशींना मिळाला नसता तर, तंतुकणिकेद्वारा तो वापरल्या गेला असता. 

ii) यामुळे इतर पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसता व पेशीश्वसन घडून आले नसते. 

2) तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.

उत्तर :

i) तंतुकणिका पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण करून साठवते तर लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. 

ii) यामुळे जर तंतुकणिका व लवके यात फरक नसता तर दोन्हीपैकी एकाच प्रकारे ऊर्जा निर्मिती झाली असती. 

iii) तसेच प्राण्यांमध्ये सर्व प्राणी हे लवकामुळे वेगवेगळ्या रंगाची दिसू लागले असते. 

3) गुणसूत्रावर जनुके नसती.

उत्तर :

i) गुणसूत्रांवरील जनुकांद्वारे सजीवांमधील जनुकीय घटक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेली जातात. 

ii) गुणसूत्रावर जनुके नसती तर एका पिढीची लक्षणे दुसऱ्या पिढीमध्ये दिसून आली नसती. 

4) पारपटल निवडक्षम नसते.

उत्तर :

i) पारपटल काही ठराविक आवश्यक पदार्थांना ये-जा करू देते व काही ठराविक अशा पदार्थांना आत प्रवेश करू देत नाही. 

ii) पारपटल निवडक्षम नसते तर पाणी, क्षार व ऑक्सिजन यांसारख्या उपयुक्त पदार्थांबरोबर कॉर्बनडाय ऑक्साइडसारखे पदार्थ पेशीतच राहिले असते. 

5) वनस्पतीत अँन्थोसायनिन नसते.

उत्तर :

i) अँन्थोसायनिन हे एक वर्णलवक आहे. ज्यामुळे वनस्पतीच्या ठराविक भागांचा रंग जांभळा किंवा निळा दिसतो. 

ii) वनस्पतीत अँन्थोसायनिन। नसते तर आपल्याला कृष्णकमळ, जांभूळ, ब्लू बेरी, लिलि यांसारखे रंगीत वनस्पती दिसल्या नसत्या.

प्रश्न. 3. आमच्यामध्ये वेगळा कोण ? कारण दया. 

1) केंद्रकी, तंतुकणिका, लवके, आंतर्द्रव्यजालिका.

उत्तर :

लवके – इतर सर्व पेशीअंगके प्राणी पेशींमध्ये आढळतात. 

2) डी.एम.ए. रायबोझोम्स, हरितलवके.

उत्तर :

डी. एन. ए. – इतर सर्व पेशीअंगके वनस्पती पेशींमध्ये आढळतात. 

प्रश्न. 4. कार्ये लिहा.

1) पेशीपटल 

उत्तर :

i) पेशीपटल निवडक्षम पारपटल असून काही ठराविक पदार्थांना पेशीत आत-बाहेर करू देते व काहींना अटकाव करते. 

ii) पेशीपटलामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन हे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश देते. 

iii) कार्बन डाय ऑक्साइडसारखे टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकले जाते. 

iv) पेशीतील पर्यावरण कायम राखते.

2) पेशीद्रव्य

उत्तर :

पेशीमधील अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इ. महत्त्वाचे पदार्थ साठविण्याचे ठिकाण. 

3) लयकारिका

उत्तर :

i) रोगप्रतिकार यंत्रणा – पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करते. 

ii) उद्धवस्त करणारे पथक – जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. 

iii) आत्मघाती पिशव्या – पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. 

iv) उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. 

4) रिक्तिका

उत्तर :

i) पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. 

ii) चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते (ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी) साठवणे. 

iii) प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते. 

iv) वनस्पतीपेशीतील रिक्तिका पेशीद्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात.

5) केंद्रक

उत्तर :

i) पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण ठेवणे. 

ii) जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे.

प्रश्न. 5. माझा रंग कोणामुळे ?

1) लाल टोमॅटो

2) हिरवे पान

3) गाजर

4) जांभूळ

अ) क्लोरोफिल 

आ) कॅरोटीन 

इ) अँन्थोसायनिन 

ई) लायकोपीन

उत्तर :

1) लाल टोमॅटो

2) हिरवे पान

3) गाजर

4) जांभूळ

ई) लायकोपीन

अ) क्लोरोफिल  

आ) कॅरोटीन 

इ) अँन्थोसायनिन

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते

प्रश्न

 एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

उत्तर

 

 

i) मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते. 
ii) गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा- इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते

प्रश्न

गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

उत्तर

 

 

i) अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो.
ii) गणात वरून खाली जाताना नव्या कवचाची भर पडून अणुकेंद्रक व संयुजा इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षणबल कमी होते, म्हणून गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते व आकारमानही वाढते.

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

प्रश्न

 ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही

उत्तर

 

 

i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.

ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे. 

iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत

प्रश्न

 ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत

उत्तर

 

 

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. 

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

हवामान स्वाध्याय

हवामान स्वाध्याय

इयत्ता दहावी भूगोल हवामान स्वाध्याय


प्रश्न १. खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. 

बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्राॅडे दो नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझाॅनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा.

 प्रदेश

 भारत

 ब्राझील

 जास्त पावसाचे

 मध्यम पावसाचे

 कमी पावसाचे

उत्तर :

 प्रदेश

 भारत

 ब्राझील

 जास्त पावसाचे

 पश्चिम घाट, गोवा, पूर्व हिमालय, पूर्व महाराष्ट्र

 ॲमेझाॅनास, रिओ ग्रांडे दो सुल

 मध्यम पावसाचे

 पश्चिम बंगाल, पश्चिम आंध्रप्रदेश

 सांता कॅटरिना, रोराईमा

 कमी पावसाचे

 गुजरात, राजस्थानचा पश्चिम भाग

 पराईबा, टोकॅटींन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, रिओ ग्राॅडे दो नॉर्ते

प्रश्न २. चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 

अ ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो. 

उत्तर : हे विधान बरोबर आहे.

आ ) ब्राझील व भारत या दोनही देशांत एका वेळी समान ऋतू असतात. 

उत्तर : हे विधान चूक आहे.

कारण – ब्राझील व भारत या दोन्ही देशांत एका वेळी समान ऋतू नसतात. जसे ब्राझीलमध्ये जानेवारी महिन्यात उन्हाळा असतो तर भारतात जानेवारी महिन्यात हिवाळा ऋतू असतो.

इ ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात. 

उत्तर : हे विधान बरोबर आहे.

ई ) ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. 

उत्तर : हे विधान चूक आहे.

कारण – ब्राझील देशात आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

प्रश्न ३. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो. 

उत्तर :

i) दक्षिण महासागराकडून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे बाष्पयुक्त व्यापारी वारे ब्राझीलच्या उच्चभूमीद्वारे अडवले जातात.

ii) हे वारे ब्राझीलच्या उच्चभूमीला अनुसरून उंचावर वाहत जातात. अधिक उंचीवरील थंड हवेमुळे सांद्रीभवन क्रिया घडून येते व ब्राझीलच्या उच्चभूमीच्या प्रदेशात प्रतिरोध पर्जन्य पडते..

iii) ब्राझील उच्चभूमीच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पर्जन्य पडते; परंतु, विरुद्ध बाजूस पोहोचणाऱ्या ढगांमध्ये बाष्पाचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी होते व पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होतो. अशा प्रकारे, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.

आ ) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. 

उत्तर :

i) सर्वसाधारणपणे शीत कटिबंधातील देशांत ध्रुवीय वाऱ्यांमुळे नियमित बर्फवृष्टी होते, त्याचप्रमाणे एखादया देशातील समुद्रसपाटीपासून अतिउंच असणाऱ्या पर्वतीय अतिथंड प्रदेशात हिमवर्षाव होतो.

ii) ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून, ते उष्ण कटिबंधात आहे.

iii) याशिवाय ब्राझील देशात अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

इ ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो. 

उत्तर :

i) ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते ते क्षितिज समांतर दिशेत ही हालचाल फारशी होत नाही, अशा प्रदेशात अभिसरण पाऊस पडतो.

ii) परंतु भारतात अशी स्थिती नाही. भारतात अतिउंच पर्वत, पठारे आहेत. भारतात येणारे बाष्पयुक्त वारे समुद्रावरून येतात. व मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे ते वारे अडवले जातात. उंचवट्याच्या अडथळ्यामुळे भारतात प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. अशाप्रकारे भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.

ई ) ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. 

उत्तर :

i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानत फारसा फरक पडत नाही.

ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊध्र्व दिशेने वहन होते.

iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधिय वादळे कमी प्रमाणात होतात.

उ ) मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही. 

उत्तर :

i) मॅनाॅस शहर हे ब्राझील देशात उत्तर दिशेला आहे. शहर विषुववृत्ताजवळ असल्यामुळे येथील तापमान उष्ण आहे.

ii) विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. तसेच येथे लंबरूप सूर्यकिरणे पडतात. म्हणून मॅनाॅस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.

ऊ ) ईशान्य मान्सून वाऱ्यामुळेही भारतात पाऊस पडतो. 

उत्तर :

i) भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मौसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे वाहत जातात.

ii) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे मागे फिरतात.

iii) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो. अशा प्रकारे, ईशान्य मान्न वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

प्रश्न ४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा. 

उत्तर :

दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल पुढीलप्रमाणे आहेत :

i) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होत जाते.

ii) उदा., दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान २५° से ते ३०° से असते. याउलट उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशातील बहुतांश भागात सरासरी तापमान ५० से ते १०० से असते.

iii) भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पर्जन्यमानातही घट होत जाते.

iv) उदा., दक्षिणेकडील चेन्नई या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४१० मिमी असते. याउलट, उत्तरेकडील दिल्ली या ठिकाणी ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५० मिमी असते.

आ ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. 

उत्तर :

i) हिंदी महासागराचा व हिमालय पर्वताचा भारतीय हवामान व मान्सून (पर्जन्य) निर्मितीवर मोठा प्रभाव पडतो.

ii) पंजाबच्या मैदानी प्रदेशात व राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्ण हवामान असते. त्यामुळे या प्रदेशांत उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.

iii) हिंदी महासागरावर तुलनेने अधिक दाबाची हवा असल्यामुळे हिंदी महासागरातील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून भारताच्या मुख्य भूमीकडे नैर्ऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात.

iv) नैर्ऋत्य मोसमी वारे बाष्पयुक्त असतात व या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो,

v) हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अतिथंड वारे अडवले जातात. त्यामुळे भारतातील उत्तरेकडील भागाचा अतिथंड वाऱ्यांपासून बचाव होतो.

vi) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैर्ऋत्य मोसमी वारेही हिमालयाच्या शिवालिक व हिमाचल रांगांद्वारे अडवले जातात.

vii) नैर्ऋत्य दिशेकडून वाहणारे वारे शिवालिक व हिमाचल रांगांच्या ठिकाणी दिशा बदलतात व तेथून हे वारे परत हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेकडून मागे फिरतात.

viii) ईशान्य दिशेकडून वाहणा-या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा मान्सून परतीचा पाऊस पडतो.

इ ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा. 

उत्तर :

i) ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजख कडा इत्यादी घटक परिणाम करतात.

ii) विषुववृत्ताच्या सान्निध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक आढळते. याउलट, ब्राझोलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

iii) ब्राझीलमधील उत्तरेकडील ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान सुमारे २५° से ते २८° से आढळते. या भागात उष्ण, दमट व रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.

iv) ब्राझीलमधील अँमेझॉनच्या खोऱ्यात सुमारे वार्षिक सरासरी २००० मिमी, तर पूर्व किनारपट्टीवर वार्षिक सरासरी १००० ते १२०० मिमी पर्जन्य पडते.

v) ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुलनेने कमी तापमान आढळते. उच्चभूमीच्या भागात पर्जन्याचे प्रमाणही मध्यम स्वरूपाचे असते.

vi) अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेने येणारे व्यापारी वारे अजस कड्यामुळे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या अजस कड्याजवळील किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.

vii) ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो.

viii) ब्राझीलच्या ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो व तेथे तापमानही तुलनेने अधिक असते. हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश’ किंवा ‘अवर्षण चतुष्कोन’ म्हणून ओळखला जातो.

ई ) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. 

उत्तर :

भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.

ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.

iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.

iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सोेम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय

अर्थव्यवस्था आणि व्यवसाय इयत्ता दहावी स्वाध्याय 

प्रश्न १ गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. 

अ ) भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण ……….. 

उत्तर : भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. कारण प्रचंड लोकसंख्या 

आ ) ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने …………….. व्यवसायावर अवलंबून आहे. 

उत्तर : ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. 

इ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ……………. प्रकारची आहे. 

उत्तर : भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसिनशील प्रकारची आहे. 

प्रश्न २. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ ) ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे. 

उत्तर :

i) ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजांचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. 

ii) ब्राझीलच्या पश्चिम भागात अँमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यांवर नैसर्गिकरीत्या बंधने पडली आहेत.

iii) या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी, येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही.

iv) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे.

आ ) भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते ?

उत्तर :

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य –

i) भारताला एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरकिनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशालाही ७४०० किमी लांबीचा सागरकिनार लाभला आहे. 

ii) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ब्राझीलमध्येही मत्स्यव्यवसाय महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशात रोजगारनिर्मिती व परकीय चलन प्राप्त कर लाठी मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो.

iii) भारतामध्ये मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येही मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. 

भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक – 

 भारत

 ब्राझील

 

i) भारताला ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे ७५०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

ii) भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे.

iii) भारतामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो.

iv) भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागांना सागरी किनारा लाभला आहे.

 

i) ब्राझीलला भारतापेक्षा कमी म्हणजे ७४०० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ii) ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे.

iii) ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते.

iv) ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे.

प्रश्न ३. कारणे सांगा. 

अ ) ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. 

उत्तर :

i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,५१५,७७० चौरस किमी आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे ३२,८७, २६३ चौरस किमी आहे. 

ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे २० कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे.

iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

आ ) भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. 

उत्तर :

i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते. 

ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. 

iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे.

प्रश्न ४. पुढील आलेखच अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा. 

उत्तर :

विश्लेषण – 

i) भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. परंतु भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. 

ii) एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे योगदान – भारतात प्राथमिक व्यवसाय हे साधारणत: सारखेच आहेत. तर तृतीयक व्यवसायातून भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त उत्पन्न प्राप्त होते. 

iii) विभागात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी – भारतात प्राथमिक व्यवसायावर जास्त प्रमाणात लोक अवलंबून आहेत. त्यामानाने ब्र झीलमध्ये प्रमाण कमी आहे. द्वितीय व्यवसाय करणारे लोक दोन्ही देशात सारखेच आहे. तर तृतीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे.  

मानवी वस्ती स्वाध्याय

मानवी वस्ती स्वाध्याय

मानवी वस्ती स्वाध्याय इयत्ता दहावी

प्रश्न १. अचूक पर्यायांस समोरील चोेकटीत ✓ अशी खूण करा. 

अ ) वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते. 

i) समुद्रसान्निध्य 

ii) मैदानी प्रदेश

iii) पाण्याची उपलब्धता   ✓

iv) हवामान 

आ) ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते ?

i) केंद्रित     ✓

ii) रेषाकृती

iii) विखुरलेली

iv) ताराकृती 

इ ) भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो. 

i) नदीकाठी 

ii) वाहतूक मार्गाच्या लगत

iii) डोंगराळ प्रदेश    ✓

iv) ओेेदयोगिक क्षेत्रात

 

ई ) नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. 

i) वनाच्छादन 

ii) शेतीयोग्य जमीन   ✓

iii) उंचसखल जमीन 

iv) उद्योगधंदे

उ ) ब्राझीलमधील कमी नागरीकरण असणारे राज्य कोणते ?

i) पारा    ✓

ii) आमापा

iii) एस्पिरितो सांन्तो

iv) पॅराना 

प्रश्न २. भोेगोलिक कारणे लिहा. 

अ ) पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. 

उत्तर :

i) मानवास दैनंदिन जीवनात पिण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. शेती व इतर अनेक उद्योगांसाठी पाणी अत्यावश्यक असते.

ii) पाण्याची उपलब्धता नसल्यास शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होत नाही. अशा प्रदेशात मानवी वस्तीचा विकास होत नाही.

iii) पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतीचा व परिणामी इतर व्यवसायांचा विकास होतो व मानवी वस्तीचा विकास होतो. अशा प्रकारे, पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे.

आ ) ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. 

उत्तर :

i) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.

ii) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.

iii) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

इ )  भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. 

उत्तर :

i) भारत देश विकसनशील आहे. परंतु नवनवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केल्याने अनेक नवीन उद्योगधंदे भारतात विकसित झाले आहे. 

ii) ज्या ज्या भागात उद्योगधंदे स्थापन झाले तिथे रोजगाराच्या निमित्ताने लोकांचे स्थलांतर झाले. तो भाग दाट लोकवस्त्याचा झाला. 

iii) नगराचे रूपांतर महानगरात झाले. लोकांच्या सुखसुविधा वाढल्या, त्यांचे राहणीमान उच्च दर्जाचे झाले. त्याचा प्रभाव ग्रामीण भागावर पडल्याने ग्रामीण लोकचेही राहणीमान सुधारले, त्याच्याही सुख – सुविधेच्या मागणीत वाढ झाली. तसेच ग्रामीण भागात उद्योगधंदे, कॉलेजेस, नवनवीन फ्लॅट सिस्टीम सुरू झाल्याने ते शहरांशी जोडल्या जाऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागाचे शहरात रूपांतर होण्यास सुरुवात झाली. म्हणजेच नागरीकरणाला सुरुवात झाली. अशाप्रकारे भारतात नागरीकरण वाढत आहे.  

ई ) ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. 

उत्तर :

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ ६०० मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. 

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

उ ) उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले आहे. 

उत्तर :

i) उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उदयोगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे. 

ii) याउलट, दिल्ली आणि चंदीगढ ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगढ पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. 

iii) दिल्ली व चंदीगढ या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगढ इथे नागरीकरण जास्त झाले. 

प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा 

अ ) भारत आणि ब्राझील या देशांत नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या. 

उत्तर :

 भारतातील नागरीकरण 

 ब्राझीलमधील नागरीकरण

 

i) भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. 

iii) भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दखिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. 

iv) गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.  

 

i) ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. 

iii) ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. 

iv) सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 

आ ) गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझाॅन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. 

उत्तर :

 गंगा नदीचे खोरे

 ॲमेझाॅन नदीचे खोरे

 

1. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. 

2. गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे. 

3. गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे. 

4. यमुना, चंबल, बेटवा, केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत.   

 

1. ॲमेझाॅन नदी पेरू देशातील ॲडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर उगम पावते. 

2. ॲमेझाॅन नदीची एकूण लांबी ६४०० किमी आहे. 

3. ॲमेझाॅन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 200000 क्युसेक एवढा आहे. 

4. निग्रो, जापुरा, झिंग इत्यादी ॲमेझाॅन नदीच्या उपनद्या आहेत.  

इ ) मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते ?

उत्तर :

i) मानवी वस्ती म्हणजे एखाद्या भूप्रदेशात मानवाने तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वस्तिस्थान होय. निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. 

ii) पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. दैनंदिन वापराबरोबर शेती, उद्योग, प्राणी यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच पूर्वी मानवी संस्कृतीचा उदय व विकास नद्यांकाठी झाला. आजही नदी, तलाव, सरोवर, धरणांच्या परिसरात मानवी वस्ती विकसित झालेली दिसून येते. 

iii) मासेमारी करणारे मानवी समूह संगरकिनाऱ्यावर, नदीकाठी स्थायिक झाले. खाणकाम करणाऱ्यांना खाणीजवळ व कारखान्यातील कामगारांना ओेेदयोगिक क्षेत्राजवळ कायमचे वास्तव्य करणे आवश्यक असते. त्यामुळे जगात सर्वत्र स्थायी वस्त्या निर्माण झाल्या. 

iv) सुपीक जमीन व सपाट मैदानी प्रदेशात शेती, उद्योगधंदे वाहतूक यांचा चांगला विकास होतो त्यामुळे अशा ठिकाणी लोकसंख्येत वाढ होईल. लोकसंख्येत वाढ होणे म्हणजे वस्त्यांची वाढ होणे. 

वरील सर्व कारणांमुळे मानवी वस्त्यांची वाढ अशा विशिष्ट स्थानीच झालेली आढळते.