प्रश्न |
पर्यटनस्थळे ही काही लोकांच्या उपजीविकेची साधने ठरतात. |
उत्तर
|
ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य अशा ठिकाणांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या गरजांतून विविध रोजगारांची निर्मिती होते. जसे – i) त्या स्थळांची माहिती सांगण्यासाठी मार्गदर्शक हवे असतात. ii) वैशिष्ट्यपूर्ण फोटो, स्थानिक पोशाखातील फोटो काढून घेण्यासाठी फोटोग्राफर, कपडेवाले हवे असतात. iii) घोडागाडी, रिक्षावाले किंवा अन्य वाहतुकीचे व्यवसाय निर्माण होतात. iv) पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे हस्तोदयोग, कुटीरोद्योगांना चालना मिळते. हॉटेल व्यवसाय बहरतो. |
मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे
प्रश्न |
मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्त्व म्हटले आहे. |
उत्तर
|
i) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली. ii) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते. iii) भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो. iv) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हटले आहे. |
भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे
प्रश्न |
भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे |
उत्तर
|
i) मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सह-अस्तित्व असते. ii) भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युतनिर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी साधनांची मालकी व व्यवस्थापन यांवर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. iii) भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रांतील साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी उद्योजक व शासन यांत विभागलेले आहे. अशा प्रकारे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. |
ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात
प्रश्न |
ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुप्फुसे असे संबोधतात |
उत्तर
|
i) ब्राझील देशात उत्तरेकडील अँमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित वर्षावने आढळतात. ii) या वर्षावनांतील वनस्पती मोठ्या प्रमाणावर वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे शोषण करतात व वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे (प्राणवायूचे) उत्सर्जन करतात. iii) या वर्षावनांमळे कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वनांना ‘जगाची फुप्फुसे’ असे संबोधतात. |
वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा
प्रश्न |
वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. |
उत्तर
|
पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात – i) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात. ii) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो. iii) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते. iv) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते. v) हस्तोदयोग, कुटीरोदयोग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते. vi) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात. vii) विविध प्रकारचे भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते. viii) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते.. ix) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते. x) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांधिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो. |
लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे
प्रश्न |
लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे |
उत्तर
|
i) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. ii) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणपेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. iii) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीचे होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन आहे. |
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत
प्रश्न |
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत |
उत्तर
|
भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पढील उपाययोजना केल्या जात आहेत : i) विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. ii) कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. iii) नदीकिनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. iv) नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नदयांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी. |
ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते
प्रश्न |
ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते |
उत्तर
|
i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो. ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते. iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते. |
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा
प्रश्न |
भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. |
उत्तर
|
i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.
ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बाली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान समेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.
iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
|
मॅनॉस या शहराजवळ कोणत्या नद्यांचा संगम होतो
|
|
प्रश्न |
|
उत्तर |
|