नोकरशाही स्वाध्याय

नोकरशाही स्वाध्याय

नोकरशाही स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. पुढील विधाने चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधाने दुरुस्त करा. 

1) संसदीय लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि मंत्री यांच्यावर प्रशासनाची जबाबदारी असते. 

उत्तर :

बरोबर

2) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 

उत्तर :

चूक 

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) देशातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे उमेदवार निवडतात. 

प्रश्न. 2. पुढील विधाने स्पष्ट करा. 

1) सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण आहे. 

उत्तर :

अनेक दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत. निर्णयप्रक्रियेत त्याचा सहभाग वाढावा, या हेतूने सनदी सेवांमध्येही राखीव जागांचे धोरण राबवले जाते. कारण समाजाचे लोकशाहीकरण होण्यासाठी जसे प्रगतिशील कायदे व धोरण यांची आवश्यकता असते, तसेच नोकरशाहीच्या कार्यक्षम सहभागाचीही असते. 

2) सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 

उत्तर :

दर पाच वर्षानी निवडणुका होतात. निवडणुकांनंतर सरकार बदलू शकते; पण सरकार बदलले तरी नोकरशाही मात्र कायमस्वरूपी असते. नोकरशाहीला प्रत्येक सरकारच्या काळात काम करावे लागते. प्रत्येक सरकारची ध्येयधोरणे राबवावी लागतात. ही सर्व कामे कोणत्याही एका राजकीय हेतूने प्रेरित झालेल्या लोकांकडून होत नाहीत; म्हणून सनदी सेवकांनी राजकीयदृष्ट्या तटस्थ असणे गरजेचे आहे. 

प्रश्न. 3. खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दांत लिहा. 

1) खात्याचा कारभार कार्यक्षमतेने चालण्यामागे मंत्री व सनदी सेवकांची भूमिका स्पष्ट करा. 

उत्तर :

मंत्री व त्या खात्याचे सनदी सेवक किंवा सचिव, उपसचिव पदावरील व्यक्ती यांच्यातील संबंध कशा प्रकारचे असतात, यावरही त्या त्या खात्याची कार्यक्षमता अवलंबून असते. निर्णय मंत्री घेतात, पण निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती सनदी सेवक देतात. एखाद्या योजनेसाठी किती आर्थिक तरतूद उपलब्ध आहे, हे सनदी सेवकच सांगू शकतात. धोरणांच्या यशापयशाचा इतिहास त्यांना माहिती असतो. त्यामुळे मंत्री मोठ्या प्रमाणावर सनदी सेवकांवर अवलंबून असतात. मंत्र्यांनीही सनदी सेवकांशी संवाद साधल्यास खात्याचा कारभार कार्यक्षम रीतीने होतो. 

2) नोकरशाहीमुळे राज्यव्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीने धोरणांच्या अंमलबजावणीतून अनेक बदल सामान्य नागरिपर्यंत आणले आहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्याने विनाखंड मिळत असतात. 

स्त्रियांचे सक्षमीकरण, बालकाचे संरक्षण, दुर्बल घटकांसाठी योजना इ. बाबत शासन जे कायदे करते ते प्रत्यक्षात आणण्याचे काम नोकरशाही करते; म्हणून नोकरशाहीमुळे राजकीय व्यवस्थेला स्थैर्य लाभते. 

प्रश्न. 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

प्रश्न. 5. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर :

नोकरशाहीचे स्वरूप पुढीलप्रमाणे – 

कायमस्वरूपी यंत्रणा : कर गोळा करणारी, पर्यावरणरक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, समाजाला सुरक्षा देणारी नोकरशाही सातत्याने काम करत असते. दर निवडणुकीनंतर नवे प्रधानमंत्री, नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येते, पण नोकरशाही बदलत नाही. 

राजकीयदृष्ट्या तटस्थ : कोणत्याही पक्षाचे सरकार येवो; त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीने तटस्थपणे, कार्यक्षमतेने व निष्ठेने केली पाहिजे. सनदी सेवकांनी राजकीय भूमिका घेऊ नयेत. सरकार बदलल्यास पहिल्या सरकारची धोरणे नंतरचे सरकार बदलू शकते. अशा परिस्थितीत नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. 

अनामिकता : एखाद्या धोरणाच्या यश किंवा अपयशाला नोकरशाही थेटपणे जबाबदार नसते, तर ती जबाबदारी त्या खात्याच्या मंत्र्याची असते. सनदी सेवकावर जाहीरपणे टीका होत नाही. खात्याच्या गैरकारभारासाठी संसद मंत्र्यांला जबाबदार धरते. याची पूर्ण जबाबदारी मंत्री घेतात व नोकरशाहीला संरक्षण देतात.      

राज्यशासन स्वाध्याय

राज्यशासन स्वाध्याय 

राज्यशासन स्वाध्याय इयत्ता आठवी

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ……………….. येथे होते. 

अ) मुंबई

ब) नागपूर 

क) पुणे 

ड) औरंगाबाद

उत्तर :

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. 

2) राज्यपालाची नियुक्ती ………………… कडून होते. 

अ) मुख्यमंत्री 

ब) प्रधानमंत्री

क) राष्ट्रपती 

ड) सरन्यायाधीश

उत्तर :

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती कडून होते. 

3) राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार ……………… यांना असतो. 

अ) मुख्यमंत्री

ब) राज्यपाल

क) राष्ट्रपती 

ड) सभापती

उत्तर :

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा आधिकार राज्यपाल यांना असतो. 

प्रश्न. 2. तक्ता पूर्ण करा. 

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 

 

 

 

 2. 

विधान परिषद

 

 

 

 

उत्तर :

अ.क्र. 

सभागृहे

कार्यकाल 

सदस्य संख्या 

निवडणुकीचे स्वरूप 

प्रमुख 

 1. 

विधानसभा

 5 वर्षे

288  

प्रत्यक्ष लोकातून निवडणुकीद्वारे 

विधानसभा अध्यक्ष 

 2. 

विधान परिषद

कायमस्वरूपी

78  

निर्वाचित  

सभापती 

प्रश्न. 3. टिपा लिहा. 

1) राज्यपाल 

उत्तर :

घटकराज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहतात. 

विधानपरिषदेने व विधानसभेने संमत केलेला विधेयकाचे राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते. 

विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. 

 2) मुख्यमंत्र्यांची कार्य 

उत्तर :

मुख्यमंत्र्यांची कार्ये खालीलप्रमाणे –

मंत्रिमंडळाची निर्मिती : बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री आपले मंत्रिमंडळ तयार करतात. 

खातेवाटप : विधानसभा सदस्याचे राजकीय अनुभव, प्रशासकीय कौशल्य, लोकमताची जाणीव, नेतृत्व इ. बाबींचा विचार करून खातेवाटप केले जाते. 

खात्यामध्ये समन्वय : सरकार चालवताना वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय साधून कारभाराची एक दिशा ठरवावी लागते. हे काम मुख्यमंत्री करतात. 

राज्याचे नेतृत्व : मुख्यमंत्री राज्याचे नेतृत्व करतात. आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्यांच्या समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्री करतात. 

प्रश्न. 4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) विधानसभेच्या अध्यक्षाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

विधानसभेच्या सभेचे अक्षयक्षपद भूषवणे, सभेचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडणे, कामकाजाची कार्यक्रमपत्रीका तयार करणे, बेशिस्त वर्तन करणाऱ्या सभासदांना निलंबीत करणे. 

2) संविधानाने भारतासाठी संघराज्यव्यवस्था का स्वीकारली ?

उत्तर :

भारताचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिनसी आहे. भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूपात यात विविधता आहे. अशा वेळेस एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही, हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे. 

3) खातेवाटप करताना मुख्यमंत्र्यांना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. 

उत्तर :

मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्याचे वाटप करावे लागते. खातेवाटप करतानाही मंत्र्यांना राजकीय अनुभव, प्रशासकीय अनुभव, कौशल्य, लोकमताची जाण, नेतृत्व इ. बाबींचा विचार करावा लागतो. 

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय

भारतातील न्यायव्यवस्था स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) कायद्याची निर्मिती ……………… करते. 

अ) कायदेमंडळ 

ब) मंत्रिमंडळ 

क) न्यायमंडळ

ड) कार्यकारी मंडळ

उत्तर :

कायद्याची निर्मिती कायदेमंडळ करते. 

2) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक ……………. करतात. 

अ) प्रधानमंत्री 

ब) राष्ट्रपती 

क) गृहमंत्री 

ड) सरन्यायाधीश 

उत्तर :

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. 

2. संकल्पना स्पष्ट करा. 

1) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :

कार्यकारी मंडळाने किंवा संसदेने संविधानाचा भंग होईल असं एखादा कायदा किंवा कृती केल्यास न्यायालय ती कृती बेकायदेशीर ठरवते व रद्द ठरवते. 

न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात. 

2) जनाहितार्थ याचिका 

उत्तर : 

सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे नागरिक, सामाजिक संघटना, बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला जनहितार्थ याचिका असे म्हणतात. 

3. टिपा लिहा. 

1) दिवाणी व फौजदारी कायदा

उत्तर :

व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणाऱ्या गोष्टी. उदा. जमिनीचे वाद, भाडेकरार, घटस्फोट इ. दिवाणी कायद्यात येतात, तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे. उदा. चोरी, हुंड्यासाठी छळ, घरफोडी, हत्या इ. फौजदारी कायद्यात येतात. 

2) न्यायालयीन सक्रियता 

उत्तर :

संविधानातील न्याय व समतेची उद्दिष्टे न्यायालय पूर्ण करते. समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके यांना न्यायालय कायद्याने संरक्षण देते. यालाच न्याया लयीन सक्रियता म्हणतात. 

4. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) समाजात कायद्याची गरज का असते ?

उत्तर :

व्यक्ति-व्यक्तींची मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती याबाबत भिन्नता असते. ही मतभिन्नता टोकाची झाल्यास संघर्ष निर्माण होतात. त्याचे निराकरण नि:पक्षपातीपणे कायद्याच्या आधाराने करण्यासाठी समाजात कायद्याची गरज असते. 

2) सर्वोच्च न्यायालयाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर :

i) केंद्रशासन व घटकराज्ये, घटकराज्ये व घटकराज्ये यांच्यातील तंटे सोडवणे. 

ii) नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे.

iii) कनिष्ठ न्यायालयाचा व आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे.

iv) सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नावरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे. 

3) भारतात न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत ?

उत्तर :

i) न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामुळे राजकीय दबाव दूर ठेवता येतो. 

ii) न्यायाधीशांना सेवा-शाश्वती असते. क्षुल्लक कारणामुळे त्यांना पदावरून दूर करता येत नाही. 

iii) न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. त्यावर संसदेत चर्चा होत नाही. 

iv) न्यायाधीशाच्या कृती व निर्णयावर व्यक्तींगत टीका करता येत नाही. 

v) न्यायालयाचा अवमान करणे हा गुन्हा आहे. 

vi) संसदेत न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही.        

प्रश्न. 5. पुढील तक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय

सशस्त्र क्रांतिकारी चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(पं. श्यामजी कृष्ण वर्मा, मित्रमेळा, रामसिंह कुका)

1) स्वा. सावरकर यांनी ………….. ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापना केली. 

उत्तर :

स्वा. सावरकर यांनी मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापना केली. 

2) पंजाबमध्ये ……………. यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. 

उत्तर :

पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले. 

3) इंडिया हाऊसची स्थापना ……………….. यांनी केली. 

उत्तर :

इंडिया हाऊसची स्थापना पं. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. 

2. पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्रांतिकारक 

संघटना 

 ………………..

 अभिनव भारत 

 बारींद्रकुमार घोष

………………… 

 चंद्रशेखर आझाद

 ………………..

उत्तर :

 क्रांतिकारक 

संघटना 

विनायक दामोदर सावरकर 

 अभिनव भारत 

 बारींद्रकुमार घोष

अभिनव समिती

 चंद्रशेखर आझाद

हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. 

उत्तर :

सन १८९७ साली पुण्यात प्लेगच्या साथीचा बंदोबस्त करताना प्लेग कमिशनर रँड याने जुलूम-जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ रोजी  रँडचा वध केला. 

2) खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आली. 

उत्तर :

१९०८ साली खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉब टाकला ती गाडी किंग्जफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीतील दोन इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. या कारणामुळे खुदीराम बोस यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 

3) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉब फेकले. 

उत्तर :

नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके या वेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांना निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बाब फेकले. 

4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) चितगाव शस्त्रागारावरील हल्ल्याचा वृत्तान्त लिहा. 

उत्तर :

सूर्य सेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार अशांसारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची फौज गोळा केली. त्यांच्या साहाय्याने चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्य सेन यांनी आखली. योजनेप्रमाणे १८ एप्रिल १९३० रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील दोन शस्त्रागारांतील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलीफोन व टेलीग्राफ यंत्रणा त्यांनी तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 

2) स्वा. सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. 

उत्तर :

सन १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे ‘मित्रमेळा’ ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली याच संघटनेला ‘अभिनव भारत’ असे नाव देण्यात आले. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना वाड्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी जोसेफ मॅझिनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. १८५७ चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्ययुद्ध होते. असे प्रतिपादन करणारा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.  

11. समतेचा लढा स्वाध्यायासाठी येथे क्लिक करा

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय

स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व स्वाध्याय इयत्ता आठवी


1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(अंदमान व निकोबार, ऑगस्ट क्रांती, विनोबा भावे)

1) वैयक्तिक सत्याग्रहाचे ………………… हे पहिले सत्याग्रही होते. 

उत्तर :

वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. 

2) १९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ………………… असे म्हटले जाते. 

उत्तर :

१९४२ च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते. 

3) नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने …………… बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. 

उत्तर :

 नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. 

2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. 

उत्तर :

१९३९ मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाॅईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल, तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय सभेत केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर १९३९ मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. 

2) आझाद हिंद सिनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. 

उत्तर :

१९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिले. १९४४ मध्ये आझाद हिंद सनेने म्यानमारमधील आराकानचा प्रदेश मिळवला. आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढत होते; परंतु याच काळात जपानने शरणागती पत्करली. १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली. 

3) प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. 

उत्तर :

महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रतिसरकार स्थापना केली. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात. या सरकारमार्फत लोकन्यायालयाद्वारे केलेला न्यायनिवाडा लाक स्वीकारत असत. सावकारशाहीला विरोध, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातिभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली. त्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. 

3. पुढील तक्ता पूर्ण करा. 

 संघटना 

संस्थापक 

 1) फॉरवर्ड ब्लॉक

 

 2) इंडियन इंडिपेंडन्य लीग

 

 3) तुफान सेना

 

उत्तर :

 संघटना 

संस्थापक 

 1) फॉरवर्ड ब्लॉक

 सुभाषचंद्र बोस

 2) इंडियन इंडिपेंडन्य लीग

 रासबिहारी बोस

 3) तुफान सेना

 बापू लाड

4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) शिरीषकुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे ?

उत्तर :

शिरीषकुमार हा एक बालवीर. त्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. शिरीषकुमारने तिरंगा हातात घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत मिरवणूक काढली. वंदेमातरमची घोषणा दिली. पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला. या गोळीबारात शिरीषकुमार, लालदास, धनसुखलाल, शशिधर घनश्याम हे विद्यार्थी हुतात्मे झाले. शिरीषकुमार यांच्या कार्याने आम्हाला स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचाही विचार न करता, देशाचा विचार प्रथम करावा ही शिकवण मिळावी. मी या देशाचा नागरिक आहे, हे जितके महत्त्वाचे तितकेच मी देशासाठी काय करतो हे विचारही महत्त्वाचे आहे. 

2) इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात क पाठवले ?

उत्तर :

दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. जपानने भारतावर आक्रमण केल्यावर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्फॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. 

3) राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली ?

उत्तर :

राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने वृत्त देशभर पसरले. संतप्त जनतेचे जागोजागी मिरवणुका काढल्या. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला, तरी लोक घाबरले नाहीत. काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचे प्रतीक असणारे तरुंग, पोलिस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी इ. अनेक गावांतून आबालवृद्धांनी नेटाने आणि असीम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरले.   

सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय

सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय

सविनय कायदेभंग चळवळ स्वाध्याय इयत्ता आठवी

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

(महात्मा गांधी, खुदा-ई-खिदमतगार, रॅम्ये मॅक्डोनाल्ड, सरोजिनी नायडू)

1) लंडनमध्ये ………………. यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 

उत्तर :

लंडनमध्ये रॅम्ये मॅक्डोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 

2. खान अब्दुल गफारखान यांनी …………… या संघटनेची स्थापना केली. 

उत्तर :

खान अब्दुल गफारखान यांनी खुदा-ई-खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 

3. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ………………. यांनी केले. 

उत्तर :

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. 

4. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून ………………. उपस्थित होते. 

उत्तर :

दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. 

2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. 

उत्तर :

पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले; परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला; म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली. 

2) सोलापुरात सरकारने ‘मार्शल लॉ’ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. 

उत्तर :

सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. ६ मे १९३० रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेचे पोलिस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले. यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. 

3) पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 

उत्तर :

पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 

4) गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. 

उत्तर :

गोलमेज परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्या नुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले.

3. खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले ?

उत्तर :

लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी, ही प्रमुख मागणी होती; परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. 

2) राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली ?

उत्तर :

गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने अटक केली. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले. सर्वत्र नागरी हक्कांची गळचेपी केलि. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेर एप्रिल १९३४ मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली.    

प्रश्न. 4. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा. 

उत्तर :

इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने स्वाध्याय

इतिहासाची साधने इयत्ता नववी

इतिहासाची साधने स्वाध्याय इयत्ता नववी

प्रश्न 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ………….. येथे आहे. 

उत्तर :

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.  

2. दृक – श्राव्य साधनांमध्ये ………… या साधनाचा समावेश होतो. 

उत्तर :

दृक – श्राव्य साधनांमध्ये दूरदर्शन या साधनाचा समावेश होतो. 

3. भोेतिक साधनांमध्ये ………….. चा समावेश होत नाही. 

उत्तर :

भोेतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही. 

ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

 व्यक्ती 

 विशेष

1. जाल कूपर 

2. कुसुसाग्रज

3. अण्णाभाऊ साठे 

4. अमर शेख 

टपाल तिकीट अभ्यासक 

कवी

लोकशाहीर 

चित्रसंग्राहक

उत्तर :

अमर शेख – चित्रसंग्राहक

प्रश्न 2. टिपा लिहा 

1.  लिखित साधने

उत्तर :

i) वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय या साधनांना लिखित साधने असे म्हणतात. 

ii) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात, त्या ठिकाणास ‘अभिलेखागार’ असे म्हणतात. 

iii) आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. 

iv) १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. 

v) टपाल तिकिटावरून इतिहासकार इतिहास सांगू शकतात. तसेच टपालखाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखादया घटनेवर, एखादया घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.

2. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

उत्तर :

i) १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही महत्त्वाचा स्रोत आहे. 

ii) प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेख, छायचित्रे, आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. 

iii) १९९० च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्य पाठवायला सुरुवात केली. तसेच पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे 

iv) आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.

प्रश्न 3. कारणे लिहा. 

1. टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते

उत्तर :

कारण – i) टपाल तिकिटे ही लिखित साधनांपैकी एक साधन आहे. 

ii) टपाल तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती व्यांमुळे टपाल तिकिटे बदलत्या काळाविषयी माहिती देतात. 

iii) टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखादया घटनेवर, एखादया घटनेच्या मौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. म्हणून टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते.

2. आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात

उत्तर :

कारण – i) दृक-श्राव्य माध्यमांमध्ये दूरदर्शन, चित्रपट, वृत्तपट, अनुबोधपट यांचा समावेश होतो. 

ii) इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले. 

iii) समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट (डॉक्युमेंटरीज) या विभागाने तयार केले आहे. त्यातून आपल्याला चालू घडामोडी कळतात. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक्-श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. 

भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला

भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर : 

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले.

इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने

2. युरोप आणि भारत 

3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम 

4. 1857 चा स्वातंत्र्यलढा

5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

7. असहकार चळवळ

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय

ब्रिटिश सत्तेचे परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी

british satteche parinam swadhyay

प्रश्न. 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) पोर्तुगीज, ……………, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. 

अ) ऑस्टियन

ब) डच

क) जर्मन

ड) स्वीडिश

उत्तर :

पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

2) १८०२ मध्ये ……………….. पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. 

अ) थोरले बाजीराव

ब) सवाई माधवराव

क) पेशवे नानासाहेब

ड) दुसरा बाजीराव

उत्तर :

१८०२ मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.

3) जमशेदजी टाटा यांनी …………………… येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. 

अ) मुंबई

ब) कोलकाता

क) जमशेदपूर

ड) दिल्ली

उत्तर :

जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला.

प्रश्न. 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) मुलकी नोकरशाही

उत्तर :

भारतात स्थापन केलेली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये, असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्यांचे पगार वाढवले.

प्रशासनाच्या सोईसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्याची भरती ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस’ (आय.सी.एस.) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.

2) शेतीचे व्यापारीकरण

उत्तर :

इंग्रजी सत्तेच्या पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. मात्र इंग्रज सरकारने कापूस, नीळ व तंबाखू यांसारख्या नगदी पिकांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोकांनी अन्नधान्यांऐवजी जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर दिला. या प्रक्रियेला ‘शेतीचे व्यापारीकरण’ असे म्हणतात.

3) इंग्रजांची आर्थिक धोरणे

उत्तर :

इंग्लंड हे आधुनिक व विकसित राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. इंग्रजांनी इंग्लंडमधील भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले

उत्तर :

जमीन महसूल हे इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते; परंतु इंग्रजांनी मात्र शेतसारा हा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार आकारण्यास सुरुवात केली. तसेच शेतसारा रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा, अशी सक्ती केली. जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला पीक विकू लागला. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकरी शेतसारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घेऊ लागले. त्यामुळे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले.

2) भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर :

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले.

प्रश्न. 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. 

 व्यक्ती

कार्ये

 लॉर्ड कॉर्नवालिस

…………………..

 ………………….

सतीबंदीचा कायदा केला

 लॉर्ड डलहौसी

 …………………

 …………………..

 ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

उत्तर :

 व्यक्ती

कार्ये

 लॉर्ड कॉर्नवालिस

नोकरशाहीची निर्मिती

 लॉर्ड बेंटिंक

सतीबंदीचा कायदा केला

 लॉर्ड डलहौसी

 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा

 विल्यम जोन्स

 ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ ची स्थापना

इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने

2. युरोप आणि भारत 

3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम 

4. 1857 चा स्वातंत्र्यलढा

5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

7. असहकार चळवळ

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा

उत्तर :

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात – 

i) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखगारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. 

ii) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. 

iii) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. 

iv) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना करणारे इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते.  

v) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला-क्षेत्रातील जाणकारांची गरज असते. 

vi) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

इयत्ता दहावी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा

2. इतिहासलेखन : भारतीय परंपरा

3. उपयोजित इतिहास

4. भारतीय कलांचा इतिहास

5. प्रसारमाध्यमे आणि इतिहास

6. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

7. खेळ आणि इतिहास

8. पर्यटन आणि इतिहास

9. ऐतिहासिक ठेव्यांचे जतन