भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे ?
उत्तर :
i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवानाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनांतील वनस्पतींची पाने गळतात.
ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.
iii) 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.
iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. त्यामुळे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.