भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत ?
उत्तर :
भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले –
i) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत कॉग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता.
ii) 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी कॉग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.
iii) 1989 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.
iv) प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.