चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

चळवळी ची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर :

i) चळवळ ही सामूहिक कृती असून, त्यात लोकांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असतो.

ii) चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते.

iii) चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारकता अधिक वाढते.

iv) चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करतात.

v) संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले, तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीला निश्चित कार्यक्रम असला पाहिजे.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या

स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या ?

उत्तर :

स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री-चळवळी लढत होत्या –

i) स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा.

ii) स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी.

iii) सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाचे जगता यावे.

iv) सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाहपद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात.

राजकीय पक्ष कोणती कामे करतात

राजकीय पक्ष कोणती कामे करतात ?

उत्तर :

राजकीय पक्ष पुढील कामे करतात –

i) आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात.

ii) सत्ता मिळाल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न करतात.

iii) जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे आणि योजना जनतेपर्यंत नेतात.

iv) शासनाच्या अकार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची धोरणे स्पष्ट करा ?

उत्तर :

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची पुढील धोरणे आहेत –

i) धर्मनिरपेक्षता आणि सर्वागीण विकास साधणे.

ii) दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क आणि व्यापक समाजकल्याण हे उद्दिष्ट गाठणे.

iii) लोकशाही समाजवाद अस्तित्वात आणणे.

iv) आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास.

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत ?

उत्तर :

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले –

i) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत कॉग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता.

ii) 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी कॉग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.

iii) 1989 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली.

iv) प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते

खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते.

उत्तर :

i) जर खाद्यतेल दीर्घकाळ ठेवले तर त्याचे ऑक्सिडीकरण होते व त्यास खवटपणा येतो. त्याची चव व वास बदलतो.

ii) हा खवटपणा टाळण्यासाठी ऑक्सिडीकरण विरोधकाचा (Antioxident) वापर करतात किंवा दीर्घकाळासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात साठवले तर योग्य ठरते, कारण त्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात

शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात

उत्तर :

i) शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा कमी असते.

ii) त्यामुळे हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात.

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो.

किंवा

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.

उत्तर :

i) सूर्याकडून आलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत गेले असता सूर्य दिसतो. पृथ्वीभोवती सुमारे 300 km जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते.

ii) अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो. म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणांस क्षितिजावर दिसतो.

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते

पाण्याशी अभिक्रिया होताना कॅल्शिअम पाण्यावर तरंगते.

उत्तर :

i) कॅल्शिअमची पाण्यावर कमी तीव्रतेने अभिक्रिया होते, म्हणून बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायू पेट घेण्यास पुरेशी नसते.

ii) अभिक्रियामुळे तयार झालेल्या हायड्रोजन वायूचे बुडबुडे धातूचे पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शिअम धातू तरंगतो.

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ?

उत्तर :

राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पुढील प्रयत्न केले जातात –

i) निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात.

iii) राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये; म्हणून कायदेनिर्मिती केली जाते.

iv) भ्रष्टाचारी, गुन्हेगार अशांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांनी बंदी घातली आहे.