ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे.

उत्तर :

i) ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 8,515,770 चौरस किमी आहे. याउलट भारताचे एकूण क्षेत्रभेट केवळ सुमारे 32,87,263 चौरस किमी आहे.

ii) ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे 20 कोटी आहे. याउलट, भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे.

iii) म्हणजेच, भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

भारतात काटेरी व झुडपी वने कोठे आढळतात ? का ?

उत्तर :

i) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

ii) भारतात राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यवर्ती भागात पर्जन्यछायेचा प्रदेश होतो.

iii) भारतातील या भागांत दीर्घकाळ कोरडा उन्हाळा असतो. या भागांत 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो.

iv) दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. त्यामुळे भारतातील राज्यस्थान राज्यात व द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात काटेरी व झुडपी वने आढळतात.

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे ?

उत्तर :

i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवानाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनांतील वनस्पतींची पाने गळतात.

ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.

iii) 1000 मिमी ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.

iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण 1000 मिमी ते 2000 मिमी आहे. त्यामुळे, भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?

उत्तर :

ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

i) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.

ii) निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.

iii) ब्राझीलमध्ये ‘रोका’ आणि भारतात ‘झूम’ यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते.

iv) लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात.

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ?

उत्तर :

भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यक आहे –

i) लोकशाही निर्णयप्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे.

ii) राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत.

iii) केवळ शासकीयच नव्हे; तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

iv) शासनव्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांना सहभाग वाढला पाहिजे.

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का

लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका होतात का ?

उत्तर :

i) लोकशाही पद्धतीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेणे बंधनकारक असते.

ii) पक्षाचा अध्यक्ष, खनिजदार, सचिव या पदांच्या दर तीन वर्षानी निवडणूक प्रक्रियेचे नियम पाळून निवडणुका घ्याव्या लागतात. अन्यथा त्या पक्षाची मान्यता निवडणूक आयोग रद्द करतो.

iii) या निवडणुकांमुळे पक्षावर एकाच व्यक्तीचे नियंत्रण राहत नाही.

iv) त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही टिकून राहते. भारतीय लोकशाहीत राजकीय पक्षांच्या अंतर्गत निवडणुका नियमितपणे होत असतात.

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

उत्तर :

i) ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

ii) या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिमी आहे. त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो.

iii) पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही. परिणामी, या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात. म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत.

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या मागे आहे.

उत्तर :

i) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या 8 तस 30 मिनिटे मागे आहे.

ii) भारत आंतरराष्ट्रीय वररेषेच्या पूर्वेकडे आहे व भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.

iii) ब्राझील आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे आहे व ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेच्या 3 तास मागे आहे.

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते

ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते.

उत्तर :

i) सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या.

ii) ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो.

iii) परिणामी, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे. परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

उत्तर :

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ 2.41 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

iii) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.