विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी

विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ……………….  यांची नेमणूक झाली. 

अ) डॉ. होमी भाभा

ब) डॉ. होमी सेठना

क) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

ड) डॉ. राजा रामण्णा

उत्तर :

अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली. 

2) इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला …………………. हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. 

अ) आर्यभट्ट

ब) इन्सॅट १ बी

क) रोहिणी-७५

ड) ॲपल

उत्तर :

इस्त्रोने पूर्णत: भारतात तयार केलेला ॲपल हा पहिला दूरसंचार उपग्रह होय. 

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) पृथ्वी – जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र

2) अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

3) आकाश – जमिनीवरून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र

4) नाग – शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे क्षेपणास्त्र

उत्तर :

चुकीची जोडी : अग्नी – जमिनीवरून पाण्याखाली मारा करणारे क्षेपणास्त्र

प्रश्न. 2. अ. भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान प्रगतीची कालरेषा दशकानुसार तयार करा. 

उत्तर :

ब) पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) अवकाश संशोधन

उत्तर :

i) केरळ राज्यातील थंबा येथील ‘थुबा इक्विटोरियल लाँच सेंटर’ वरून ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाणाचे १९६१ मध्ये यशस्वी प्रक्षेपण केले. 

ii) १९६९ मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या ‘रोहिणी – ७५’ अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण केले गेले. 

iii) या यशामुळे अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहाची संरचना व निर्मिती देशात होऊ शकते हे सिद्ध झाले. 

iv) भूकेंद्राकडून उपग्रहाकडे संदेश पाठवणे, उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व उपग्रहाच्या कार्यशैलीचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान अवगत होऊ शकते असा आत्मविश्वास भारतीय शास्त्रज्ञांना आला.

2) टलेक्स सेवा

उत्तर :

i) देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलदगतीने टंकमुद्रित स्वरूपात संदेशाचे वहन करणारी टेलेक्स सेवा १९६३ मध्ये केंद्रीय दळणवळण खात्याने सुरू केली. 

ii) १९६९ मध्ये देवनागरी लिपीतून टेलेक्स सेवा प्रथम दिल्लीत सुरू झाली. पुढे तिचा विस्तार भारतभर झाला. 

iii) या सेवेचा उपयोग सर्वच क्षेत्रांत सुरू झाला. १९९० नंतर इंटरनेटच्या उदयानंतर या सेवेचे महत्त्व संपुष्टात आले.

प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली

उत्तर :

कारण i) अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. 

ii) भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून राष्ट्राची प्रगती साधायची होती. म्हणून पं. नेहरूंनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली.

2) भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला

उत्तर :

कारण i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ में १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली. 

ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

3) अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले

उत्तर :
कारण  i) १९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केल्यावर अमेरिकेने अंतराळ संशोधन संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र विकास अशा संररक्षण विषयाशी संबंधित तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. यामुळे अमेरिकेवर विसंबून राहता स्वबळावर क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम आखण्याचे धोरण भारताने स्वीकारले. 

ii) त्यानंतर ११ मे १९९८ रोजी भारताने अण्वस्त्रसज्जता सिद्ध करण्यासाठी पोखरण येथे दुसरी अणुस्फोट चाचणी केली. या दिवशी तीन अणुचाचण्या घेण्यात आल्या. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची होती. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही’ अशी ग्वाही दिली म्हणून अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले.

प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) पोखरण अणुचाचणीची माहिती लिहा

उत्तर :

i) शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. 

ii) प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ‘अणुस्फोट’ चाचणीचा निर्णय घेतला. त्यासाठी मानवी वस्तीपासून दूर व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही अशा निकषांवर राजस्थानमधील पोखरण भागाची निवड करण्यात आली. 

iii) अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना व भाभा आष्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांचा या चाचणील महत्त्वाचा वाटा होता. 

iv) पोखरण येथे १९७४ मध्ये भारताने पहिली अणुचाचणी केली. आणि ११ मे १९९८ रोजी दुसरी अणुस्फोट चाचणी केली.

2. भास्कर-१ हा उपग्रह कोणत्या क्षेत्रासाठी उपयोगी आहे

उत्तर

भास्कर-१ हा उपग्रह पुढील क्षेत्रासाठी उपयोगी आहे.

i) देशातील पाण्याचे साठे, खनिजांचे साठे. हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी दूरसंवेदन तंत्र उपयोगी पडणारे होते. 

ii) या तंत्राच्या मदतीने भूगर्भविषयक, पर्यावरणविषयक, जंगलविषयक काढलेली छायाचित्रे महत्त्वाची होती. 

iii) या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग समुद्रविज्ञान (ओशनॉग्राफी) मध्ये झाला.

प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. तुमच्या वापरात असणाऱ्या कोणकोणत्या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो

उत्तर :

आमच्या वापरात असणाऱ्या मोबाईल, टिव्ही, इंटरनेट, रेडिओ या सुविधांमध्ये उपग्रह तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आढळतो.

2. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ असे का संबोधल जाते

उत्तर :

i) भारत सरकारच्या संरक्षण विभागांतर्गत १९५८ साली ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’ (DRDO) स्थापना झाली. 

ii) संरक्षणाची साधने, उपकरणे आणि शस्त्रास्त्रे या बाबतींत देशाला स्वावलंबी बनवणे हा य संस्थेचा उद्देश होता. 

iii) १९८३ नंतर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेने अनेक क्षेपणास्त्रे विकसित केली. 

iv) क्षेपणास्त्र निर्मितीत डॉ. कलाम यांनी मोठे योगदान दिले आहे. यांना डॉ. कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच ‘मिसाईल मॅन’ असे संबोधले जाते.

3. संगणकीकृत रेल्वे आरक्षण कसे करता येते

उत्तर 

संगणकीकृत रेल्वे आरक्षण करण्यासाठी संगणकीकृत प्रवास आरक्षण प्रणाली केंद्रावर आणि www.irctc.co.in वेबसाइट वर जाऊन तिकीट आरक्षित केल्या जाऊ शकते. प्रवासी सामान्य किंवा अनारक्षित तिकीट संगणकीकृत अनआरक्षित तिकिट प्रणाली केंद्रावरून खरेदी करू शकतात. तसेच रेल्वेस्टेशनवर लावलेल्या स्वयंचलित तिकिट वेंडिग मशीनद्वारे तिकिट प्राप्त केले जाऊ शकते.

4. कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा

उत्तर :
कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 

i) १९९८ मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. 

ii) सुमारे ७६० किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या चार राज्यांत पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर तंत्रज्ञानाचे अनेक विक्रम आहेत. 

iii) या मार्गावर एकूण १२ बोगदे आहेत. या मार्गावरील कारबुडे येथील ६.५ किमी लांबीचा बोगदा सर्वांत मोठा बोगदा आहे. 

iv) येथे ७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल या मार्गावर आहेत. त्यांपैकी होनावरजवळील रावती नदीवरील २०६५.८ मीटर लांबीचा पूल सर्वांत मोठा आहे. 

v) रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील ६४ मीटर उंचीचा पूल सर्वांत उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी 

उद्योग व व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी इतिहास

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) १९४८ मध्ये ………………… या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. 

अ) औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा

ब) औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे.

क) रोजगार निर्मिती व्हावी

ड) तयार मालाची गुणवत्ता निश्चिती व्हावी

उत्तर :

१९४८ मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली.

2) भारतातील …………………. उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते. 

अ) ताग

ब) वाहन

क) सिमेंट

ड) खादी व ग्रामोद्योग

उत्तर :

भारतातील वाहन उद्योगाला ‘सनराईज क्षेत्र’ म्हटले जाते.

3) वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम ………………. हे आहे. 

अ) कापड उत्पादन करणे

ब) वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे

क) कापड निर्यात करणे

ड) लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे

उत्तर :

वस्त्रोद्योग समितीने प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे.

4) सायकल उत्पादनात ……………… हे भारतातील प्रमुख शहर आहे. 

अ) मुंबई

ब) लुधियाना

क) कोचीन

ड) कोलकाता

उत्तर :

सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे.

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 

1) भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ – औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे उपलब्ध कर्ज करून देणे

2) औद्योगिक विकास महामंडळ – औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे

3) वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

4) खादी फ ग्रामोद्योग आयोग – ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणासचालना देणे

उत्तर :

चुकीची जोडी : वस्त्रोद्योग समिती – विणकरांचे कल्याण करणे

प्रश्न. 2. अ) दिलेल्या सुचनेप्रमाणे कृती करा. 

चौकट पूर्ण करा. 

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

उत्तर :

 भारतात आयात होणाऱ्या वस्तू

 यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषध.

 भारतात निर्यात होणाऱ्या वस्तू

 चहा, कॉफी मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे

ब) टीपा लिहा. 

1) भारताची आयात-निर्यात

उत्तर :

i) १९५१ मध्ये नियोजनाची सुरुवात झाल्यानंतर औद्योगिक वस्तू व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली. भारताच्या आयतीत यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

ii) भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर परकीय चलन मिळवण्याच्या उद्देशाने निर्यातीला चालना दिली. भारताच्या निर्यातीत चहा, कॉपी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चामडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

2) भारताचे अंतर्गत व्यापार 

उत्तर :

i) एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये अंतर्गत व्यापार होतो. देशाचा आकार, साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने अंतर्गत व्यापारावर होतो.

ii) भारतात भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्ती लोकसंख्या, या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो.

iii) भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, रस्ते, हवाई वाहतूक इत्यादी मार्गांनी चालतो.

iv) मुंबई, कोलकता, कोचीन, चेन्नई ही बंदरे अंतर्गत व्यापारासाठी महत्त्वाची बंदरे आहेत.

v) अंतर्गत व्यापारात कोळसा कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखड, पोलाद, तेलबिया, मीठ, साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो.

3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1) भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

उत्तर :

कारण – i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

2) भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

उत्तर :

कारण – i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे.

ii) तसेच भारतातील उदयोगधंदयाच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा. 

1) शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते

उत्तर :

शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन पुढील प्रयत्न करते.

i) ग्रामीण क्षेत्रात बँका आणि सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

ii) पंचायत समितीमार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण भेट योजना, शेती सहली आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात. तसेच शेती अवजारे, बी-बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो.

iii) कृषी विद्यापीठाच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई-म्हशीचे संगोपन, दुग्धव्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते.

iv) जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून त्यांचे मार्गदर्शन होते.

v) उत्पादित माल साठवणुकीसाठी गोदाम (वेअर हाऊस) बांधणीसाठी अर्थसाहाय्य दिले जाते.

2) पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो

उत्तर :

i) भारतात देशा-परदेशांतील लोक पर्यटनासाठी वर्षभर येत असतात.

ii) पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा पुरविल्या जातात. तसेच या ठिकाणी वस्तू विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.

iii) पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात. काही दुर्गम ठिकाणी तेथील स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात. या माध्यमांतून लोकांना रोजगार निर्माण होतो.

3) भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात

उत्तर :

भारतात वनसंपत्तीर वर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र कापड, रेशीम, काडेपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणा कच्चा माल हे व्यवसाय चालतात.

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी

भारताची सुरक्षा व्यवस्था स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) भारताचे …………….. हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 

अ) प्रधानमंत्री

ब) राष्ट्रपती

क) संरक्षण मंत्री

ड) राज्यपाल

उत्तर :

भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात. 

2) भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल –

अ) भूदल

ब) तटरक्षक दल

क) सीमा सुरक्षा दल 

ड) जलद कृतिदल

उत्तर :

भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल – तटरक्षक दल

3) विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी …………….. ची स्थापना करण्यात आली. 

अ) बी. एस. एफ. 

ब) सी. आर. पी. एफ. 

क) एन. सी. सी. 

ड) आर. ए. एफ. 

उत्तर :

विद्यार्थामध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी एन. सी. सी. ची स्थापना करण्यात आली. 

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. 

कारण – i) मानवी सुरक्षेला असणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय. 

ii) दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. 

iii) या माणसांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.

2) प्रत्येक राष्ट्र स्वत:साठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. 

उत्तर : 

हे विधान बरोबर आहे. 

कारण – i) परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे. हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात. 

ii) त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते.

3) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणते वादग्रस्त प्रश्न नाहीत. 

उत्तर : 

हे विधान चूक आहे. 

कारण – i) स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

ii) जसे काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी प्रश्नांवरून पाकिस्तानने भारतासोबत युद्ध केले आहे. यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) जलद कृतिदलाचे कार्य

उत्तर : 

i) भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासांठी निमलष्कर दले असतात. 

ii) संरक्षण दलांना साहाय्य करणे हे या दलांचे प्रमुख काम असते. 

iii) निमलष्करी दलात जलद कृतिदलाचा समावेश होतो. या जलद कृतिदलाचे कार्य म्हणजे बाँबस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे असते.

2)  मानवी सुरक्षा

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाशी सुरक्षा ही अंतिमत: माणसांसाठीच असते. 

ii) म्हणूनच मानवी सूरक्षा म्हणजे माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार होय. 

iii) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. 

iv) निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

3) गृहरक्षक दल

उत्तर : 

i) स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल (होमगार्ड) ही संघटना स्थापन करण्यात आली. 

ii) गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात. या दलात वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकांस भरती होता येते. 

iii) पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.

4. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो ? 

उत्तर :

i) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद, पाणी वाटपावरून वाद होऊन संघर्ष निर्माण होतात. 

ii) आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची कारणे निर्माण होतात. 

iii) राष्ट्रांमध्ये अशाप्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते, परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. 

iv) एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे. या सर्व बाबींमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो.

2) सीमा सुरक्षा दलाची कार्ये लिहा. 

उत्तर :

भारतातील निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलाचा समावेश होतो. सीमा सुरक्षा दलाची कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.

i) सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. 

ii) सीमेजवळच्या भागातील विस्फोटक वस्तूंची तस्करी रोखणे. 

iii) सीमेवर गस्त घालणे. 

3) मानवी सुरक्षा म्हणजे काय ?

उत्तर : 

i) राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. 

ii) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. 

iii) माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. 

iv) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.

5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा. 

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

………………. 

 ………………. 

 ………………. 

 ………………. 

 ………………. 

 अँडमिरल

 ………………. 

 ………………. 

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 ………………. 

 ………………. 

उत्तर :

 सुरक्षा दलाचे नाव

कार्य  

प्रमुख  

सध्या कार्यरत प्रमुखात नावे 

 भूदल 

भौगोलिक सीमांचे संरक्षण करणे.   

 जनरल

बिपिन रावत 

 नौदल 

सागरी सीमांचे रक्षण करणे.  

 अँडमिरल

सुनिल लांबा

 वायुदल

 भारताच्या हवाई सीमा व अवकाश रक्षण करणे.  

 एअर चीफ मार्शल

बी. एस. धनोआ. 

2) भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साहाय्याने दाखवा. 

उत्तर :

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी

संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही. 

अ) अमेरिका

ब) रशिया

क) जर्मनी

ड) चीन

उत्तर :

जर्मनी

2) भारतात बाल-कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था. 

अ) युनिसेफ

ब) युनेस्को

क) विश्वस्त मंडळ

ड) रेडक्राॅस

उत्तर :

युनिसेफ

3) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आज सभासद असणाऱ्या राष्ट्रांची संख्या – 

अ) १९०

ब) १९३

क) १९८

ड) १९९

उत्तर :

१९३

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) आमसभेत पर्यावरण, निःशस्त्रीकरण अशा महत्त्वपूर्ण जागतिक विषयांवर चर्चा होते. या सभेतील निर्णय बहुमताने घेतले जातात. हे निर्णय ठरावांच्या स्वरूपात असतात आमसभा फक्त ठराव करते, कायदे करत नाही.

ii) आमसभेत सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन चर्चा करता येते, महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविता येते. म्हणून आमसभा जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे.

2) संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान असतो. 

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. प्रत्येक राष्ट्राला एक मत असते. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो.

3) चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकतो

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) चीन हा सुरक्षा समितीचा कायम सदस्य आहेत.

ii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक आहे.

iii) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही. म्हणून चीनने सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा वापर करूनही ठराव संमत होऊ शकत नाही.

4) संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपूर्वी झालेल्या परिषदांमध्ये भारत सहभागी झाला होतात.

ii) निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे अनेक प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर मांडण्यात भारताचा सहभाग होता.

iii) संयुक्त राष्ट्रांमध्ये वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित करणारा भारत हा पहिला देश होता. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या समोर अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांवरील चर्चेमध्ये भारताने कायम पुढाकार घेतला आहे.

iv) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताने नेहमीच आपले सैन्य पाठवले आहे. त्यासोबतच स्त्री सैनिकांची शांतिसेना पाठवली आहे. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात भारताने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) नकाराधिकार

उत्तर :

i) सुरक्षा परिषदेत एकूण १५ सदस्य असतात. त्यांपैकी ५ सदस्य कायम तर १० सदस्य अस्थायी स्वरूपाचे असतात.

ii) अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे.

iii) कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ५ कायम सदस्य आणि किमान ४ अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते.

iv) कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजे जर विरोधी मत दिले तरी निर्णय घेता येत नाही.

v) अर्थात सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सभासदांना नकाराधिकार असतो. आणि स्थायी सभासद राष्ट्रांच्या संमती नाकारण्याच्या धाराला नकाराधिकार म्हणतात.

2) युनिसेफ 

i) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजे युनिसेफ होय.

ii) यूनिसेफ (UNICEF) ही संयुक्त राष्ट्रांची संलग्न संस्था आहे.

iii) लहान मुलांना सकस आहार व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते.

iv) युनिसेफच्या मदतीने भारतामध्ये बाल कुपोषणाच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

4. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे लिहा.

उत्तर :

संयुक्त राष्ट्र संघटना स्थापनेची कारणे पुढीलप्रमाणे आहे

i) विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दोन महायुद्धे झाली. या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे. या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आतंरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली.

ii) पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाला फारसे यश मिळाले नाही पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झाल्यानंतर अशा प्रकारची विनाशकारी युद्धे थांबली पाहिजेत आणि ही सर्वच राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी आहे. हा विचार पुढे आला अशी जाणीव सर्व राष्ट्रांमध्ये निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना करण्यात आली.

2) संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना कोणती भूमिका बजावते ?

उत्तर :

i) संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेना या संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये कायमस्वरूपी शांतता निर्माण व्हावी म्हणून पोषक परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका बजावते.

ii) तसेच संयुक्त राष्ट्रांचे शांततारक्षक संघर्षग्रस्त प्रदेशांना शांततेकडे वाटचाल करण्यासाठी मदत करतात.

iii) संघर्षग्रस्त प्रदेशांना सुरक्षेबरोबरच राजकीय आणि शांतता बांधणीसाठी साहाय्य केले जाते. संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना याप्रकारची भूमिका बजावते.

3) संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा. 

उत्तर :

संयुक्त राष्ट्रांचे पुढील उद्दिष्ट आहेत.

i) राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे.

ii) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मार्गानि सोडवून आंतरराष्ट्रीय सुरक्षा वृद्धिंगत करणे.

iii) मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे जतन व संवर्धन करणे.

iv) याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक सहकार्य चाढवणे हे संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट आहे.

5. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) संयुक्त राष्ट्रांच्या घटकशांखाविषयी माहिती देणारा पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्र.

 शाखा

सदस्य संख्या

कार्ये

 1.

आमसभा

 2.

सुरक्षा समिती

 3.

आंतरराष्ट्रीय न्यायालय

 4.

आर्थिक व समाजिक परिषद

उत्तर :

 क्र.

 शाखा

सदस्य संख्या

कार्ये

 1.

आमसभा

१९३

1) सुरक्षा समितीवरील अस्थायी सदस्यांची निवड करणे,

2) संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे.

 2.

सुरक्षा समिती

१५ सदस्य

1) जागतिक शांतता व सुरक्षिततेची जोपासना करणे.

2) वादग्रस्त आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चौकशी करणे.

3) आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्याच्या दृष्टीने उपाय सुचवणे.

4) गरज भासल्यास आक्रमक देशांविरुद्ध आर्थिक किंवा लष्करी कारवाई करणे.

 3.

आंतरराष्ट्रीय न्यायालय

१५ न्यायाधिश

1) संयुक्त राष्ट्रांचा सदस्य देश असलेल्या दोन किंवा अधिक राष्ट्रांमधील तंटे सोडवणे.

2) आंतरराष्ट्रीय कायद्याचा योग्य अर्थ लावणे.

3) संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध शाखा किंवा संलग्न कायद्याशी संबंधित प्रश्नांवर सल्ला देणे.

 4.

आर्थिक व समाजिक परिषद

५४ परिषद

1) दारिद्रय आर्थिक व सामाजिक विषमता, वर्णभेद अशा प्रश्नांची जागतिक पातळीवर चर्चा करणे.

2) मानवी स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संदर्भात जागृती करणे.

2) संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेचा कालक्रम पुढील कालरेषेवर दाखवा. 

उत्तर :

3) संयुक्त राष्ट्रांच्या संदर्भातील पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा. 

उत्तर :

भारत व अन्य देश स्वाध्याय

भारत व अन्य देश स्वाध्याय

भारत व अन्य देश स्वाध्याय इयत्ता नववी

भारत व अन्य देश स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1) भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश – 

अ) पाकिस्तान

ब) बांग्लादेश

क) नेपाळ

ड) म्यानमार

उत्तर :

नेपाळ

2) भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश – 

अ) पाकिस्तान व चीन

ब) नेपाळ व भूटान

क) म्यानमार व मालदीव 

ड) अफगाणिस्तान व अमेरिका

उत्तर :

पाकिस्तान व चीन

3) भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधावर प्रभाव असणाऱ्या बाबी – 

अ) दोन्ही राष्ट्रांच्या जागतिक दृष्टिकोनातील फरक

ब) काश्मीर समस्या

क) अण्वस्त्रविषयक संघर्ष 

ड) वरील सर्व समस्या

उत्तर :

वरील सर्व समस्या

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे

उत्तर – हे विधान बरोबर आहे. कारण – i) भारतीय उपखंडात भारत हा आकाराने सर्वांत मोठा देश आहे. 

ii) तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने देखील भारत अधिक विकसित आहे. त्यामुळे दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे.

2) भारत-चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष सीमाप्रश्न व तिबेटचा दर्जा या दोन प्रश्नांशी निगडित आहे. 

ii) तसेच भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो ॲक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे. या सीमावादामुळे भारत-चीन संबंध फारसे मैत्रीपूर्ण नाहीत.

3) श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण – i) श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. 

ii) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.

3. दिलेल्या सुचनेनुसार कृती करा. 

1) पुढील तक्ता पूर्ण करा. 

 क्र. 

 झालेल करार/देवाणघेवाण

 संबंधित देश

 1)

 …………………….

भारत – पाकिस्तान  

 2) 

 मॅकमोहन रेषा 

……………………. 

 3) 

……………………. 

भारत – बांग्लादेश 

 4)

नैसर्गिक वायूची आयात 

……………………. 

 5) 

……………………. 

भारत – अमेरिका 

 6) 

पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य.  

…………………….

 7) 

…………………….  

भारत – आफ्रिका 

उत्तर :

 क्र. 

 झालेल करार/देवाणघेवाण

 संबंधित देश

 1)

 ताश्कंद करार/ सिमला करार

भारत – पाकिस्तान  

 2) 

 मॅकमोहन रेषा 

भारत – चीन  

 3) 

पाणीवाटपासंबंधी व सीमारेषेसंबंधी करार 

भारत – बांग्लादेश 

 4)

नैसर्गिक वायूची आयात 

भारत – म्यानमार 

 5) 

आण्विक सहकार्याचा करार 

भारत – अमेरिका 

 6) 

पायाभूत, क्षेत्रविकास, दळणवळण, आरोग्य.  

भारत – मालदीव 

 7) 

शिक्षण, कौशल्य, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, शेती, पर्यटन क्षेत्र.  

भारत – आफ्रिका 

4. टिपा लिहा. 

1) सिमला करार

उत्तर :

i) १९७२ साली भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये सिमला ह करार झाला. 

ii) सिमला करार हा दोन्ही राष्ट्रांत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होते. कारण यात दोन्ही देशांचा सन्मान कायम ठेवून शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला होता. 

iii) त्यावेळी भारत विजयी राष्ट्र होते. सिमला करारानुसार भारत दबावाबाहेर परस्पर विचार विनिमयाने, वाटाघाटीने प्रश्न सोडवण्यावर भर देतो आणि स्थिर शांततेसाठीं प्रयत्न करतो हे दिसून येते. 

iv) या करारात व नंतरच्या काळातही भारताने पाकिस्तानबाबत उदारतेचे धोरण अवलंबले आहे. परंतु आजही पाकिस्तान सिमला कराराचे पालन करत नाही.

2) भारत-नेपाळ मैत्री करार

उत्तर :

i) भारत व नेपाळ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचा पाया १९५२ साली भारत-नेपाळ मैत्री कराराने घातला गेला. 

ii) या कराराने नेपाळमधील नागरिकांना भारतामध्ये सहज प्रवेशच नव्हे तर सरकारी नोकरी आणि उद्योग करायचा परवाना मिळाला आहे. 

iii) तसेच भारत आणि नेपाळ यांच्यातील हा करार लष्करी स्वरूपाचा नसला तरी नेपाळवर कोणत्याही दिशेने आक्रमण झाल तरी भारताने नेपाळला साह्य करावे हे गृहीत या करारातून स्पष्ट होते.

3) मॅकमोहन रेषा

उत्तर :

i) भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून जो वाद आहे तो अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषा या क्षेत्रांशी संबंधित आहे.

ii) चीनचा दावा आहे की, अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश (अरुणाचल प्रदेश) हा चीनचा भूप्रदेश आहे. 

iii) मॅकमोहन रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. 

iv) हा सीमावाद संवादाच्या मार्गाने सुटावा म्हणून भारताने अनेक वेळा प्रयत्न केले. परंतु त्यास फारसे यश आले नाही. 

4) भारत-अफगाणिस्तान संबंध

उत्तर :

i) अफगाणिस्तानामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणावर आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेचे तेथील वर्चस्व हे त्याला कारणीभूत आहे. 

ii) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे, लोकशाही सरकार स्थापन करण्यास मदत करणे बांसाठी भारताने अफगाणिस्तानला मदत देऊ केली आहे. 

iii) तसेच युद्धामुळे नष्ट झालेल्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रस्तेबांधणी, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, शाळा, आरोग्य सुविधा, सिंचन प्रकल्प यांची उभारणी अशा सर्वच क्षेत्रांत भारत अफगाणिस्तानला मदत करत आहे.

5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा

उत्तर :

भारत-अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील –

i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन राष्टे आहेत. सुरुवातीपासूनच अमेरिका भारताचा सर्वांत महत्त्वाचा व्यापारी भागीदार होता. 

ii) अनेक भारतीय शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने अमेरिकेत जात असल्याने अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक संबंध वाढत गेले आहे. 

iii) शीतयुद्धानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरक्षाविषयक संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. तसेच भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला. 

iv) त्याचप्रमाणे २००५ मध्ये झालेला संरक्षणविषयक सहकार्याचा करार आणि २००८ मध्ये झालेला आण्विक सहकार्याचा करार हे भारत-अमेरिका संबंधातील महत्त्वाचे टप्पे आहे. गेल्या ५ वर्षात भारत आणि ५ अमेरिका यांच्या दरम्यान सर्वच क्षेत्रांत सहकार्याचे संबंध निर्माण झाले आहेत. 

2) शेजारच्या राष्ट्रांमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांविषयी उदाहरणासह माहिती लिहा

उत्तर :

i) अफगाणिस्तानमध्ये शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य आणणे, तेथील हिंसाचाराला आळा घालणे आणि लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. 

ii) बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारताने बांग्लादेशीयांना मदत केली. या राष्ट्रांमध्ये लोकशाही आहे. 

iii) नेपाळमध्ये राजेशाही होती. १९९० साली नेपाळची लोकशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. यासाठी भारताने नेपाळशी मैत्री करार केला. 

3) दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना कोणते कार्य करत आहे

उत्तर :

दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना पुढील कार्य करत आहे

i) दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये आर्थिक सहकार्य निर्माण करणे व त्याद्वारे संपूर्ण दक्षिण आशियाचा विकास साधणे. 

ii) दक्षिण आशियातील लोकांसाठी कल्याणकारी योजना आखून त्यांचे जीवनमान वाढवणे. 

iii) दक्षिण आशियातील प्रदेशात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती आणि विकासाची गती वाढवणे. 

iv) परस्परांबद्दल विश्वास निर्माण करणे, परस्परांना समजून घेणे. 

v) परस्परातील सहयोग गतिशील करून सांस्कृतिक, आर्थिक, औदयोगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहयोग वाढवणे. 

vi) समान उद्देश असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि क्षेत्रीय सघटना यांच्याबरोबर सहकार्य करणे.

6. तुमचे मत लिहा. 

1) भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ?

उत्तर :

भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी पुढील उपाय सुचवता येईल. 

i) भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी शांततामय मार्गाने आणि परस्पर वाटाघाटीतून आपले प्रश्न सोडवावेत. 

ii) दोन देशांच्या दरम्यान दळण-वळणाची साधने उपलब्ध करावी. त्यातून आपापसांत विचारविनिमय करता येईल. 

iii) दोन्ही देशांनी मिळून सांस्कृतिक आदान-प्रदानाचे कार्यक्रम करावे.

iv) कोणतेही वादग्रस्त प्रश्न उद्भवणार नाही असे कृत्य करणे टाळावे.

v) दहशतवादी संघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करावा. 

vi) दोन्ही देशांनी मिळून आंतकवाद या समस्येचे शांततामय मार्गाने निराकरण करावे. 

vii) दोन्ही देशांनी आपापसातील सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा.

2) ‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? सकारण स्पष्ट करा.

उत्तर :

‘भारताचे शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतात’ या विधानाशी मी सहमत आहे. कारण – i) भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्राचे आपल्या राष्ट्राशी असणारे संबंध, त्या राष्ट्राची सैनिकी शक्ती, युद्धसाहित्य, शस्त्रास्त्रे या सर्वांचा प्रभाव अंतर्गत विकासात होतो. 

ii) शेजारच्या राष्ट्रांशी तणावपूर्ण संबंध असल्याने कधीकधी युद्धाचे प्रसंग ओढवतात. त्यातून जीवित हानी व वित्तहानी निर्माण होते. त्यामुळे अंतर्गत विकास होऊ शकत नाही. 

iii) सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. जर त्यांमध्ये तणावपूर्ण संबंध असेल तर अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होतील. त्यातून देशाच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवेल. याकडे शासनाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. आणि अंतर्गत विकास साधण्यात अडथळे निर्माण होईल.

3) भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे तुम्हांस वाटते का ? सकारण स्पष्ट करा

उत्तर :

भारताचे अमेरिकेशी असणारे दृढसंबंध भारताच्या आर्थिक विकासाला पोषक ठरतात असे मला वाटते.  कारण – i) भारत आणि अमेरिका ही लोकशाही व्यवस्था असलेली दोन बलाढ्य राष्टे आहेत. 

ii) भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यानंतर हळूहळू भारताचा आर्थिक प्रगतीचा वेग वाढू लागला आहे. त्याचा परिणाम भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यात झाला. 

iii) भारतीय लोक शिक्षण नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. तेथे लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे भारताचा आर्थिक विकास होतो.

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी

आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय इयत्ता नववी राज्यशास्त्र

1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1) पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. 

अ) महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद

ब) कावेरी पाणीवाटप

क) निर्वासितांचे प्रश्न

ड) आंध्र प्रदेशातील नक्षलवाद

उत्तर :

निर्वासितांचे प्रश्न

2) पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. 

अ) रोजगाराचा अधिकार

ब) माहितीचा आधिकार

क) बालकांचे अधिकार

ड) समान कामासाठी समान वेतन

उत्तर :

माहितीचा आधिकार

3) पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो ?

अ) शिक्षक दिन

ब) बालदिन

क) वसुंधरा दिन

ड) ध्वजदिन

उत्तर :

वसुंधरा दिन

2. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1) पर्यावरणीय  ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे

उत्तर -:

हे विधान बरोबर आहे. कारण – i) वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायुगळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही. 

ii) तसेच त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात. त्यामुळे पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

2) निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण – i) निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. 

ii) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते. 

iii) स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही.

3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1) मानवी हक्क

उत्तर :

i) मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क होय. 

ii) अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातं  ,समता, बंधुता, न्याय या मानवी हक्कांचा पुरस्कार करण्यात आला होता. या हक्कांची पूर्तता करण्यासाठी लोकशाही शासन असणे गरजेचे आहे, या विचारला बळ मिळाले. 

iii) मानवी हक्कांमध्ये जीविताचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो. हे हक्क मूलभूत असतात. हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते. 

iv) मानवी हक्कांना आता जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

2) पर्यावरणीय ऱ्हास

उत्तर :

i) वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे, मातीचा कस कमी होणे, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी-जास्त होणे, तापमान वाढ, नद्या, तलाव आटणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, नवीन रोगांची निर्मिती, आम्लपर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे यासर्वांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. 

ii) पर्यावरणीय ऱ्हासाचे दुषपरिणाम हे विशिष्ट राष्ट्रापुरते मर्यादित असले ता त्यांच्या दीर्घकालीन परिणामांमुळे त्या प्रश्नांना जागतिक स्वरूप प्राप्त होते.

3) दहशतवाद

उत्तर :

i) राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला ‘दहशतवाद’ असे म्हणतात. 

ii) दहशतवाद म्हणजे संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. 

iii) वाढत्या दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबर अंतर्गत सुरक्षेलादेखील धोका निर्माण होतो. 

iv) दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते.

4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 

उत्तर :

5. तुमचे मत नोंदवा. 

1) मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा

उत्तर :

मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका –

i) भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्कांचे स्थान देण्यात आले आहे 

ii) भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्य यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे. 

iii) १९१३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला. या कायद्यांतर्गत ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग’ व ‘राज्य मानवी हक्क आयोग’ स्थापन करण्यात आले आहे. 

iv) मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधात तक्रारींची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे.

2) दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा

उत्तर : 

दहशतवादामुळे झालेले परिणाम – 

i) दहशतवादामुळे समाजात अशांतता पसरते आणि विकासकार्यांना खीळ बसते. 

ii) दहशतवादामुळे मोठ्या संख्येने जीवितहानी व वित्तहानी होते. 

iii) दहशतवादामुळे अनेक सामाजिक व नैतिक समस्या निर्माण होतात. 

iv) दहशतवादामुळे जातिवाद, प्रदेशवाद भाषावाद, जमातवाद यांसारख्या समस्या बळावतात. 

v) दहशतवादामुळे सर्व प्रकारच्या गुन्हेगारीत वाढ होते. प्रामुख्याने लहान मुले व तरुण पिढीचे योग्य सामाजिकरण न झाल्यामुळे ते असामाजिक कृत्यांकडे आकृष्ट होतात. 

vi) देशाची जास्तीत जास्त शक्ती दहशतवादी कारवायांत खर्च होत असल्यामुळे नवीन उद्योग, नवीन विकास योजना व आर्थिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या मार्गांत अडथळे निर्माण होतात. 

vii) दहशतवादामुळे महागाई वाढते. तसेच चोऱ्या, दरोडे, लुटमार, भ्रष्टाचार इत्यादी अनेक असामाजिक प्रकारांना प्रोत्साहन मिळते. 

viii) दहशतवादामुळे समाजाचे व राष्ट्राचे ऐक्य धोक्यात येते. 

ix) दहशतवादामुळे लोकशाही प्रणालीवर आघात होतो. 

x) दहशतवादामुळे देशाची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो.

दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय – 

i) सामाजिक व आर्थिक विषमतेला आळा घालण्यासाठी ठोस उपाय अमलात आणले पाहिजे. त्यासाठी घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे झाली पाहिजे. 

ii) दहशतवादाची कारणे शोधून ती समुळ नष्ट करण्यासाठी सामाजिक व शासकीय स्तरावर आंदोलने केली पाहिजे. 

iii) दहशतवाद्यांना कठोर शिक्षा मिळेल अशी कायदेशीर व न्यायीक प्रक्रिया केली जावी. 

iv) प्रत्येक देशाच्या सीमेबाहरचा दहशवाद रोखण्यासाठी सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व कार्यक्षम केली जावी. 

v) विविध प्रसार माध्यमांच्या साहाय्याने दहशतवाद विरोधी प्रचार अभियान राबविले पाहिजे. 

vi) दहशतवादविरोधी मानसिकता निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणावेत. 

vii) भाषिक व प्रादेशिक समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाय केले पाहिजे. 

viii) देशाची एकता व अखंडता यांना बाधा येईल अशा कृत्यांना खंबीरपणे आळा घातला जावा. 

ix) गरिबी व बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न केले जावेत. तसेच रोजगार निर्माण केला जावा. 

x) प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करून भ्रष्टाचारमुक्त अशी नि:पक्षपाती प्रशासन यंत्रणा निर्माण करावी. 

पर्यटन स्वाध्याय

पर्यटन स्वाध्याय

पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी

पर्यटन स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. पुढील विधानांवरून पर्यटनाचे प्रकार ओळखा. 

1) मायासंस्कृतीमधील वास्तुरचना कौशल्याची वैशिष्ट्ये जाणण्यासाठी हेमंतकुमार मेक्सिकोला जाऊन आले. 

उत्तर :

परदेशी पर्यटन

2) गोवा कार्निवल पाहण्यासाठी पोर्तुगाली पर्यटन गोव्यात आले होते. 

उत्तर :

परदेशी पर्यटन 

3) नैसर्गिक चिकित्सा केंद्रात उपचारांसाठी जॉन व अमरला केरळात जावे लागले. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

4) पुंडलिकरावांनी सहपरिवार चारधाम यात्रा केली. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

5) पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी गावाल जाऊन आली. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

6) सय्यद कुटुंब अजमेर यात्रेसाठी गेले. 

उत्तर :

स्वदेशी पर्यटन

प्रश्न. 2. ‘अ’ गटातील स्थळांची माहिती मिळवा व साखळी पूर्ण करा. 

 ‘अ’ गट

‘ब’ गट  

‘क’ गट  

 1) ताडोबा 

1) मध्यप्रदेश 

1) सरोवर 

 2) पक्षी अभयारण्य

2) आग्रा  

2) फुलपाखरे 

 3) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

3) मणिपूर  

3) कैलास लेणे 

 4) ताजमहाल 

4) नान्नज 

4) चित्रनगरी 

 5) रामोजी फिल्म सिटी

5) वेरूळ 

5) जगप्रसिद्ध आश्चर्य 

 6) राधानगरी 

6) मुंबई 

6) प्राचीन गुंफाचित्रे 

 7) भिमबेटका 

7) हैदराबाद 

7) माळढोक

 8) प्राचीन लेणी 

8) कोल्हापूर 

8) कान्हेरी लेणी 

 9) ईशलनेस्ट वन्य जीव अभयारण्य

9) चंद्रपूर 

9) रानगवा 

 10) लोकटक 

10) अरुणाचल प्रदेश 

10) वाघ 

उत्तर :

 ‘अ’ गट

‘ब’ गट  

‘क’ गट  

 1) ताडोबा 

1) मध्यप्रदेश 

1) सरोवर 

 2) पक्षी अभयारण्य

2) आग्रा  

2) फुलपाखरे 

 3) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

3) मणिपूर  

3) कैलास लेणे 

 4) ताजमहाल 

4) नान्नज 

4) चित्रनगरी 

 5) रामोजी फिल्म सिटी

5) वेरूळ 

5) जगप्रसिद्ध आश्चर्य 

 6) राधानगरी 

6) मुंबई 

6) प्राचीन गुंफाचित्रे 

 7) भिमबेटका 

7) हैदराबाद 

7) माळढोक

 8) प्राचीन लेणी 

8) कोल्हापूर 

8) कान्हेरी लेणी 

 9) ईशलनेस्ट वन्य जीव अभयारण्य

9) चंद्रपूर 

9) रानगवा 

 10) लोकटक 

10) अरुणाचल प्रदेश 

10) वाघ 


प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा. 

उत्तर :

i) धार्मिक स्थळांच्या ठिकाणी देवीदेवतांची मंदिरे असतात. अशा ठिकाणांना भेट देणे म्हणजे धार्मिक पर्यटन होय. उदा. शिर्डी, शेगाव, तिरूपती, पंढरपूर, कोल्हापूर, अमरनाथ इ. 

ii) सांस्कृतिक स्थळांच्या ठिकाणी आपल्या संस्कृतिचा ठेवा जतन केलेला असतो. अशा ठिकाणांना सांस्कृतिक पर्यटन असे म्हणतात. उदा. वाघा बार्डर, वेरुळची लेणी, ताजमहल, अशोक स्तंभ इत्यादी.

2) पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ?

उत्तर :

पर्यटनाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

i) पर्यटनाचे मुख्य उद्देश मनोरंजन हा आहे. मानवाच्या तनमनाला विश्रांती मिळावी  म्हणून पर्यटने आयोजित केली जातात. 

ii) पर्यटनातून ज्ञानप्राप्ती होते. हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनाद्वारे जैवविविधतेची ओळख होते. जगभरातील महान संस्कृतीची हौशी पर्यटकांना ओळख झाली तर त्यांची ज्ञानवृद्धी होईल. 

iii) पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार प्राप्त होतो. व्यवसाय हा देखील पर्यटनाचा उद्देश आहे. पर्यटनातून उपाहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो.

3) पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा. 

उत्तर :

पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. 

i) पर्यटन पर्यावरणीय विकासासाठी उपयुक्त ठरते. 

ii) पर्यटन उद्योगाच्या गरजेतून नैसर्गिक ठिकाणे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचा विकास करण्यासाठी शासनाकडून आर्थिक गुंतवणूक केली जाते. 

iii) पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो. 

iv) निवासस्थाने, रिसॉर्ट्स, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची, रचना देखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते. या विकासात वीज, पाणी, यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.

4) पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात. 

उत्तर :

i) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.  

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. त्याबरो पायाभूत सुविधांचा विकास होतो व रोजगारनिर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. या संधी निर्माण होतात.

5) पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा. 

उत्तर :

पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या – i) बरीच अशी पर्यटन ठिकाणे भारतात आहेत. परंतु त्या ठिकाणाची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने र्यटकांना त्रास सहन करावा लागतो. 

ii) पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्या, पण्याच्या व्यवस्था नसतात. 

iii) पर्यटन ठिकाणांचे मार्ग नीट समजत नाही. याठिकाणी कुठेही चिन्हांचे संकेत नसल्याने पर्यटकांचा स्थळ शोधण्यात वेळ जातो. 

iv) पुरेशा सोयी सुविधांअभावी अनेक पर्यटन स्थळांमध्ये सुलभता नाही.

पर्यटनांतील समस्यांवरील उपाय – i) प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचे समान प्रमाणात वाटप केले पाहिजे. ज्यामुळे तेथील पर्यटक तिथे पोहोचण्यास मदत होईल. 

ii) जुन्या व पुरातन सांस्कृतिक वारसा संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे. आणि मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मूळ शैलीत नूतनीकरण करावे. 

iii) सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यक सुविधा तसेच सुरक्षा पुरविण्यात यायला हवी. 

iv) पर्यटन स्थळी प्रदूषित झालेल्या भागात स्वच्छता कार्यक्रम सुरू करावा. 

v) स्थानिक सामग्रीचा वापर करून पर्यटकांना आवश्यक असलेले सामान उत्पादन करावे. 

vi) बँकिंग सुविधा, विपणन आणि इतर पर्यटक केंद्र वाढविले पाहिजे. 

6) आपल्या जिल्ह्यात कोणकोणती पर्यटन स्थळे विकसित करता येतील ते सकारण सांगा. 

उत्तर :

नागपूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु ती दुर्लक्षित असल्यामुळे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचा विकास झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन स्थळात भर पडेल. उदा. नागपूरचा गोंडराजाचा किल्ला, आंभोरा तिर्थक्षेत्र, छोटा ताजबाग, गणेश टेकडी मंदिर इत्यादी.  

7) पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. 

उत्तर :

i) पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. 

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन स्थळाची संपूर्ण माहिती असणारे व्यक्ती पर्यटकांना तेथील सविस्तर माहिती सांगतात. त्या मोबदल्यात ते तेथील लोकांना पैसे देतात. हा एकप्रकारचा त्यांचा रोजगार आहे. 

iv) तसेच स्थानिक लोक आपल्या घरी पर्यटकांना पेइंगेस्ट म्हणून काही दिवसांसाठी ठेवतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. त्याचा मोबदला त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळतो. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.

प्रश्न. 4. पर्यटन स्थळी लावण्यासाठी पर्यटकांसाठी काही मार्गदर्शक सूचनाफलक तयार करा. 

उत्तर :

पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचनाफलक – i) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवा. 

ii) पर्यटन स्थळी असलेल्या प्राण्यांना, पक्षांना इजा होणार नाही याची दक्षता घ्या. 

iii) धूम्रपान, मद्यपान करू नये. 

iv) ध्वनी प्रदूषण करू नये. 

v) झाडांना, फुलांना हात लावू नये. 

प्रश्न. 5. पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवो भव’ ही भूमिका कितपत योग्य आहे, ते स्पष्ट करा. 

उत्तर :

i) ‘अतिथी देवो भव’ याचा अर्थ आपल्या घरी आलेले अतिथी हे देवासमान समजण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. 

ii) भारतात अनेक धार्मिक, ऐतिहासिक, निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. जी अतिशय विलोभनीय आहेत. त्याचा आस्वाद घेण्यासाठी, ती स्थळे बघण्यासाठी देशा परदेशातले पर्यटक भारतात येतात. 

iii) या देशा परदेशातील पर्यटन हे आपल्या भारतीयांसाठी अतिथी आहेत. त्यांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक आहे. 

iv) आपल्या संस्कृतीनुसार आपण बाहेरून येणाऱ्या लोकांचे आदरातिथ्य अगदी मनापासून करतो. त्या मोबदल्यात आपल्याला समाधान मिळते. 

v) भारतीय संस्कृतीतील विविधता, सन, उत्सव, परंपरा, पोशाख, भारतीय मसाल्यांपासून बनवलेले अन्नपदार्थ अनेक पर्यटकांना आवडते. तसेच भारतीयांचे सौजन्यपूर्ण आदरातिथ्य यांमुळे भारताची पर्यटनासंबंधी ‘अतिथी देवो भव’ ही भूमिका स्पष्ट होते. 

प्रश्न. 6. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा नकाशा दिला आहे. त्याच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 


1) गरम पाण्याचे झरे असलेल्या ठिकाणांची यादी करा. ही ठिकाणे येथे कारणे सांगा. 

उत्तर :

गरम पाण्याचे झरे असलेली ठिकाणे –

i) ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी

ii) जळगाव जिल्ह्यातील उपनदेव

iii) रायगड जिल्ह्यातील साव 

iv) अमरावती जिल्ह्यातील सलबर्डी

v) कापेश्वर, उनकेश्वर, उन्हवरे

कारण – पृथ्वीच्या अंतर्गत भागातील उष्णतेमुळे तसेच ज्या भागात चुनखडक, गंधक या खनिजाचे साठे असतात. त्या भागात गरम पाण्याचे झरे निर्माण झाले आहे. 

2) वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध कोणकोणत्या ठिकाणी दिसून येतो ?

उत्तर :

वाहतुकीचे मार्ग व पर्यटन स्थळाचा विकास यांचा सहसंबंध पश्चिम महाराष्ट्रांकडे आहे. कारण तेथे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे अधिक असल्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी म्हणून वाहतुकीचा विकास जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. 

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय 

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी

वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. फरक स्पष्ट करा. 

1) लोहमार्ग व रस्तेमार्ग

 लोहमार्ग 

 रस्तेमार्ग

 i) लोहमार्ग बांधणीसाठी रस्ते मार्ग बांधणीपेक्षा जास्त खर्च लागतो. 

ii) लोहमार्गावरील गाड्यांचा वेग रस्त्यांपेक्षा अधिक असल्याने दूरच्या अंतरावर ही वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडते. 

iii) एकाच वेळी जास्त माल व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असल्याने वाहतूक खर्च कमी येतो. 

 i) रस्ते बांधणीसाठी लोहमार्ग बांधणीपेक्षा कमी खर्च येतो. 

ii) लोहमार्गाची तुलना करता रस्ते वाहतूक ही दूरच्या अंतरावर वाहतूक करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 

iii) रस्त्यांवरील वाहनांची प्रवासी वा मालाच्या वाहतुकीची क्षमता कमी असते.  

2) वाहतूक व संदेशवहन

 वाहतूक

 संदेशवहन

 i) वस्तू किंवा व्यक्तीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थानांतर म्हणजे वाहतूक होय. 

ii) वाहतूक मार्गामुळे आपल्या देशातील लोक आणि परदेशीय लोक संपर्कात येतात. 

iii) दुष्काळ, भूकंप, महापूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तसेच राष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीचे मार्ग महत्वाचे ठरतात. 

 i) व्यक्ती-व्यक्ती किंवा समूह यांचा परस्परांशी साधला जाणारा संपर्क किंवा विचारांची देवाण-घेवाण ज्ञान, माहिती किंवा तंत्र यांचे संक्रमण म्हणजे संदेशवहन होय. 

ii) आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम तार विभाग करतात.  

3) पारंपरिक संदेशवहनाची साधने व आधुनिक संदेशवहनाची साधने

 पारंपरिक संदेशवहनाची साध

 आधुनिक संदेशवहनाची साधने

 i) पूर्वीच्या काळी संदेशवहनासाठी प्राणी, पक्षी, मानव यांच्या माध्यमांमार्फत संदेश वहन केल्या जात असे. त्यांना पारंपरिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) पारंपरिक संदेशवहनाच्या साधनांच्या वेगाला मर्यादा आहेत. 

iii) उदा. आरोळी किंवा दवंडी, आग किंवा संकेत वर हावभाव, वाद्ये वाजविणे किंवा ध्वज पताका फडकविणे, कबुतर, प्राणी, दूत, जहाज, रेल्वे, मोटारी ही पारंपरिक संदेशवहनाची साधने आहेत.   

 i) उपग्रह संदेशवहन यंत्रणेमुळे जी साधने विकसित झाली. या विकसित साधनांच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनास आधुनिक संदेशवहनाची साधने असे म्हणतात. 

ii) विज्ञानाच्या प्रगतीमुळे आधुनिक संदेशवहन साधनांच्या वेगळा मर्यादा नाहीत. 

iii) उदा. टपालसेवा, तार, दूरध्वनी, सागरी तारा, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, दुरचित्रवाणी, बिनतारी संदेश यंत्रणा, टेलिफोन, टेलिग्राफएलसिड, लॅपटॉप, व्हिडिओ-ऑडिओ टेप, सिनेमा, मोबाईल, टेलेक्स, उपग्रह, इंटरनेट इ. आधुनिक संदेशवहनाची साधने आहेत.       

  

प्रश्न. 2. सविस्तर उत्तरे लिहा. 

1) वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे विधान स्पष्ट करा. 

उत्तर :

वर्तमानपत्रांचा वापर संदेशवहनासाठी होतो. हे पुढील माहितीवरून पष्ट करता येते. 

i) वर्तमानपत्रांवरून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. यामुळे संदेशवहनाचे कार्य होते. 

ii) वर्तमानपत्रांमधून महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या निघतात. त्यातून आपणांस वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. हे एक प्रकारचे संदेशवहन आहे. 

iii) कोणी बेपत्ता झाले किंवा हरवले याची माहिती वृत्तपत्रातून मिळते.

2) टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा. 

उत्तर :

i) टीव्हीमुळे जग जवळ आल्यासारखे झाले आहे. 

ii) टीव्हीद्वारे घर बसल्या देशविदेशातील घडामोडी माहिती करून घेऊ शकतो. 

iii) कोणत्या ठिकाणी काय चालले आहे याची माहिती घरबसल्या मिळत असल्यामुळे आपण त्याविषयी जागृक असतो. 

iv) उदा. कुठे भुकंप आला असेल व आपल्या ओळखीची व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर आपण संदेशवहनाद्वारे तिच्याशी संपर्क साधू शकतो. या संदेशवहनाच्या साधनासाठी खर्च कमी लागतो. अशा प्रकारे टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे.

3) भ्रमणध्वनीचा उपयोग करून कोणकोणत्या प्रकारे संदेशवहन करता येते ?

उत्तर :

भ्रमणध्वनीचा वापर आज जवळपास ९९% लोक करतात. याद्वारे संदेशवहन करणे फार सोपे झाले आहे. संदेशवहनासाठी व्हॉटस्अप,फेसबुक, चॅट, कॉल इत्यादी अँप्सचा उपयोग करून आपण संदेशवहन करू शकतो.

प्रश्न. 3. खालील माहितीच्या आधारे नावे लिहा.

1) विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे. 

उत्तर :

विमानसेवा उपलब्ध असणारी महाराष्ट्रातील पाच शहरे – मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, सोलापूर, कोल्हापूर इत्यादी. 

2) टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा. 

उत्तर :

टपाल कार्यालयातून मिळणाऱ्या सेवा – i) पत्रे, पाकिटे, पार्सले, पैसे टपालमार्गे अल्प दरात पोहोचविण्याची सोय टपाल कार्यालयातून होते. 

ii) तसेच अत्यंत कमी वेळात पत्रे पोहोचण्यासाठी ‘स्पीड पोस्ट’ योजना मोठ्या शहरांत सुरू आहेत. 

iii) आपत्तीच्या वेळी, विशेष प्रसंगी जलद संदेशवहनाचे काम टपाल कार्यालयातून तार विभाग करते. 

3) तुमच्या परिसरातील राष्ट्रीय महामार्ग. 

उत्तर :

परिसरातील राष्ट्रीय महामार्ग – नागपूर – बैतूल, नागपूर-अमरावती, नागपूर-जबलपूर, नागपूर-रायपूर. 

4) महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे. 

उत्तर :

महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यावरील बंदरे – ठाणे जिल्ह्याच्या किनाऱ्यालगत डहाणू, चिंचणी, तारापूर, माहिम, दातिवरे, वसई, भाईदर, ठाणे व कल्याण. 

रायगड जिल्हा – मोरे, करंजे, रेवस, मांडवे, धरमतर, अलिबाग, रेवदंडा, मुरुड, राजपुरी, श्रीवर्धन. 

रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट, हर्णे, दाभोळ, गुहागर, जयगड, रत्नागिरी, पूर्णगड इत्यादी. 

सिंधुदुर्ग जिल्हा – विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ला व रेडी ही महत्वाची बंदरे आहेत.  

प्रश्न. 4. सहसंबंध ओळखून जुळणी करा व साखळी बनवा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

‘क’ गट 

 टपालसेवा

रस्तेमार्ग 

माहितीचे आदान-प्रदान 

 शिवनेरी

संगणक जोडणीचे जागतिक जाळे  

स्पीटपोस्ट

 आंतरजाल 

लोहमार्ग  

आरामदायी प्रवास 

 रो-रो वाहतूक 

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत  

इंधन, वेळ व श्रमाची बचत 

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट  

‘क’ गट 

 टपालसेवा

संदेशवहनाची पारंपरिक पद्धत 

स्पीटपोस्ट

 शिवनेरी

रस्तेमार्ग  

आरामदायी प्रवास

 आंतरजाल 

संगणक जोडणीचे जागतिक जाळे

माहितीचे आदान-प्रदान

 रो-रो वाहतूक 

लोहमार्ग

इंधन, वेळ व श्रमाची बचत 

नागरीकरण स्वाध्याय

नागरीकरण स्वाध्याय 

नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी

नागरीकरण स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. पुढील समस्येवर उपाय सुचवा. 

1) शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे. 

उत्तर :

उपाय – i) ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था शासनामार्फत वाढवावी. 

ii) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारनिमित्त शहरात येतात. या स्थलांतरित लोकांसाठी ते जेथे राहतात तेथे रोजगार निर्मिती व्हावी. तेथे लघुउद्योग, कुटिरोदयोग सुरू करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यायाने ते स्थलांतरित होणार नाही व झोपडपट्ट्यांच संख्या वाढणार नाही. 

ii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना शासनांचा योजनेमार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दयावी.

2) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. 

उत्तर :

उपाय – i) शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही याकडे रहदारी पोलिस खात्यांनी लक्ष केंद्रित करावे. त्यासोबत नागरिकांनी ही जागृक राहणे आवश्यक आहे. 

ii) बहुतांश लोक प्रवासासाठी खाजगी वाहने वापरतात. जेथे शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक बससेवा, रेल्वेसेवा वापरावी. त्यामुळे वाहतुक कोंडी होणार नाही. 

iii) सर्वांनी रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळले तर वाहतुकीची कोंडी होणार नाही. 

iv) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या आमाणात पुरेशा उपलब्ध व्हाव्यात.

3) नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

उत्तर :

उपाय – i) स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ते अवैध मार्गाने पैसे कमावतात. यासाठी तेथे शासानातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात. 

ii) मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून चोरी, मारामाऱ्या, खून यांसारख्या गुन्ह्यांपासून परावृत्त करावे. 

iii) पोलिस व न्याययंत्रणेमधील भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी. त्यामुळे गुन्हे घडण्यास आळा बसेल.

4) नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली. 

उत्तर :

उपाय – i) आपल्या घरातील टिव्ही, संगीत प्रणाली इत्यादीचा आवाज कमी ठेवावा, लग्न समारंभात बँड, फटाक्यांचा वापर टाळावा. 

ii) आपल्या परिसरातील घरे, कारखाने, वाहने इत्यादींतून होणारे धुराचे उत्सर्जन कमीत कमी ठेवावे. कचरा कचराकुंडीत टाकावा. तो जाळून त्याची विल्हेवाट लावू नये. 

iii) विहिरी, तलाव आणि सार्वजनिक कचरा नळ योजनेजवळ टाकू नये. निर्माल्य, मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव धरणात टाकू नये. 

iv) रासायनिक खतांऐवजी सेंद्रियखत वापरावे, पॉलिस्टरच्या कापडाऐवजी सुती कपड्यांचा वापर करावा, प्लॅस्टिक ऐवजी कागदाच्या पिशव्या वापराव्या.

v) अधिकाधिक वृक्ष लावून त्यांची जोपासना करावी. 

vi) प्रदूषणासंबंधित सर्व कायदे माहित करून त्यांचे पालन सर्वांनी करावे.

5) नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

उत्तर :

उपाय – i) नागरी भागात सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी सांडपाणी कचरा न अडकता वाहून जाईल अशी यंत्रणा तयार करावी. तसेच नागरिकांनीही यासंबंधी तत्पर असावे. 

ii) सांडपाणी व कचऱ्याच्या ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करावी. वेळोवेळी स्वच्छता करावी. 

iii) नागरी भागात कचऱ्याची समस्या ही गंभीर समस्या आहे कचरा हा घराबाहेर जमा न करता कचरापेटीतच टाकावा. यामुळे रोग उद्भवणार नाही. 

iv) प्रदूषण कमी करण्यासाठी झाडे लावावी. 

v) अशुद्ध पाण्यामुळे व अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची नागरिकांना माहिती करून दयावी. त्यावर उपचारासाठी निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावे.

प्रश्न. 2. योग्य जोड्या जुळवा. 

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

2) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. 

3) 75% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. 

4) कचऱ्याची समस्या

अ) नागरीप्रदेश

आ) नियोजनाचा अभाव

इ) स्थलांतर

ई) नागरीकरण

उत्तर :

 ‘अ’ गट 

‘ब’ गट 

1) तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण

2) मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. 

3) 75% पुरुष बिगरशेती व्यवसायात आहेत. 

4) कचऱ्याची समस्या

ई) नागरीकरण

इ) स्थलांतर

अ) नागरीप्रदेश

आ) नियोजनाचा अभाव

प्रश्न. 3. महत्त्व सांगा/ फायदे लिहा. 

1) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण

उत्तर :

i) गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. 

ii) ग्रामीण भागांतील शेतीही आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांच्या साहाय्याने केली जाते, त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. 

iii) तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणामुळे कामात सुसूत्रता व कमी वेळात जास्त काम होण्याची क्षमता वाढली.

2) व्यापार

उत्तर :

i) व्यापारामुळे व्यापार संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृह, इत्यादी सेवांची वाढ होते. 

ii) या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. 

iii) व्यापारामुळे देशांदेशांमधील राजनैतिक, आर्थिक संबंध सुधारतात. 

iv) तसेच राष्ट्रांचा आर्थिक विकास होतो. पर्यायाने लोकांचे जीवनमान सुधारते. 

3) औद्योगिकीकरण 

उत्तर :

i) औद्योगिकीकरणामुळे उद्योगांचा विकास व केंद्रीकरण झाले. 

ii) उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. 

iii) लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. 

iv) देशाचा आर्थिक विकास होत आहे. 

v) नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होत आहे. नागरिकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ झाली आहे.


4) शहरातील सोईसुविधा

उत्तर :

i) वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात. 

ii) चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोईमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो. 

iii) शिक्षणाच्या सेवादेखील नागरी भागांमध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. मुख्यतः उच्च शिक्षणाच्या सोईमुळे इतर ठिकाणांहून अनेक विद्यार्थी नागरी भागांत येतात. 

iv) तसेच वैद्यकीय सोईदेखील नागरी भागांत चांगल्या विकसित झालेल्या असतात.

5) शहरातील सामाजिक ऐक्य

उत्तर :

i) शहरात अनेक लोक रोजगारासाठी स्थलांतर करून येतात. हे लोक वेगवेगळ्या जाती, धर्माचे, पंथाचे असतात. हे सर्व लोक एकत्र राहतात. त्यांच्यात सर्वधर्म समभाव ही भावना निर्माण होते. 

ii) वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी-परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातून सामाजिक ऐक्य निर्माण होते. 

iii) शहरातील सण-उत्सवात सर्व धर्माचे, पंथांचे लोक एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात सामाजिक ऐक्य निर्माण होते. त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास मदत होते.

प्रश्न. 4. पुढील बाबींची तुलना करा व उदाहरणे लिहा. 

1) वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी

उत्तर :

 वाहतूक व्यवस्था

 वाहतुकीची कोंडी

 i) सर्वत्र वाहतुकीचे नियोजन व नियंत्रण करण्यासाठी जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला वाहतूक व्यवस्था असे म्हणतात. 

ii) चांगल्या वाहतूक व्यवस्थेमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. 

iii) वाहतूक व्यवस्था ही नागरीकरणातील सोईसुविधा आहे. 

iv) उदा. चेन्नईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था ही सुरळीत आहे.  

 i) वाहतुकीची नियोजनातील कमतरता आणि येणाऱ्या मर्यादेमुळे जी वाहतुकीची समस्या निर्माण होते तिला वाहतुकीची कोंडी असे म्हणतात. 

ii) सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खासगी वाहनांची गर्दी वाढते परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. 

iii) वाहतूक कोंडी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iv) उदा. कोल्हापूरमधील ट्रेझरी ऑफीस चौकातील गणेश मंदीर येथे वाहतुकीची कोंडी होते. 

2) औद्योगिकीकरण व वायूप्रदूषण

उत्तर :

 औद्योगिकीकरण

 वायूप्रदूषण

 i) एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे याला औद्योगिकीकरण असे म्हणतात. 

ii) औद्योगिकीकरणामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 

iii) उदा. मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे मुंबई महानगरचा भाग झाली आहे. 

 i) कारखान्यांतील मोठ्या प्रमाणात हानिकारक व दुषित वायू हवेत सोडले जाते. वाहनतून विषारी धूर हवेत सोडला जातो. या विषारी वायूंमुळे प्रदूषण निर्माण होते त्याला वायूप्रदूषण असे म्हणतात. 

ii) वायूप्रदूषण ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iii) उदा. दिल्ली, मुंबई, कोलकता, यांसारख्या महानगरांमध्ये वायूप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे तेथे श्वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.     

3) स्थलांतर व झोपडपट्टी

उत्तर :

 स्थलांतर

 झोपडपट्टी

 i) व्यक्ती किंवा समूह एका प्रदेशातून किंवा देशातून दुसऱ्या प्रदेशात किंवा देशामध्ये अल्पकाळ किंवा दीर्घकाळ वास्तवासाठी जाणे या हालचालीस स्थलांतर असे म्हणतात. 

ii) स्थलांतर ही नागरीकरणाची प्रक्रिया आहे. 

iii) उदा. भारताच्या विविध भागांतून पुणे, मुंबई या ठिकाणी होणारे स्थलांतर. 

 i) अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते, असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. त्यांना झोपडपट्टी असे म्हणतात. 

ii) झोपडपट्टी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

iii) उदा. मुंबई शहरातील धारावी झोपडपट्टी, सुरत शहरात तापीनदीच्या मुखाजवळील झोपडपट्टी.  

4) सोईसुविधा व वाढती गुन्हेगारी

उत्तर :

 सोईसुविधा

 वाढती गुन्हेगारी

 i) नागरी वस्तीमध्ये अनेक सोईसुविधा विकसित होतात. 

ii) वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशमन दल इत्यादी सोई अत्यंत महत्त्वाच्या असतात. 

iii) नागरीकरणाच्या प्रक्रियेत सोईसुविंधामुळे फायदे होतात. 

उदा. उच्च शिक्षणाच्या सोईमुळे तसेच नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक पुणे शहरात शिकायला येतात. 

 i) स्थलांतरित लोकांपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होता नाही, त्यामुळे अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात यांतून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढलेली दिसते. 

ii) चोरी, घरफोडी, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरात होताना आढळतात. 

iii) वाढती गुन्हेगारी ही नागरीकरणाची समस्या आहे. 

उदा. शहरात आज अधिक प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहे.   

प्रश्न. 5. खालील तक्ता पूर्ण करा. 

 नागरीकरण

 परिणाम

 झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोईसुविधा 

 

उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. 

 प्रदूषण

 

 

नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. 

ग्रामीण ते शहर – बदल

 

उत्तर :

 नागरीकरण

 परिणाम

 झोपडपट्ट्यांची निर्मिती

अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सोईसुविधा 

 स्थलांतरित लोक

उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. 

 प्रदूषण

नागरी जीवनावर विपरित परिणाम शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा व नियमांचे उल्लंघन. आरोग्यास धोका 

औद्योगिकीकरण

नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. 

ग्रामीण ते शहर – बदल

सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायती ऐवजी नगरपरिषद / नगरपालिकेचा उदय. नागरिकांच्या विविध मूलभूत सर्वजनिक सेवा उपलब्ध


प्रश्न. 6. स्पष्ट करा. 

1) शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. 

उत्तर :

i) शहरीकरण म्हणजे शहराच्या लोकसंख्येची व त्याच्या क्षेत्राचीवाढ होय. औद्योगिकीकरण व खेड्यातून शहराकडे होणारे लोकांचे स्थलांतर यांचा शहरीकरणात समावेश होतो. त्यामुळे शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. 

ii) एखादया प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iii) शहरे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. 

iv) उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे शहरांकडे लोकांचे स्थलांतरण होऊन विशिष्ट पद्धतीने शहरांची वाढ होते.

2) तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर

उत्तर :

माझ्या कल्पनेतील सुनियोजित शहर हे प्रदूषण मुक्त असेल. शहराची मांडणी अगदी साधी, सरळ असेल. मोजकी घरे, पाण्याच्या सुविधा (नळ, तलाव. विहिरी) असेल. शहरात बगीचा, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वेटेशन, बस सुविधा, विमान सुविधा असेल. रस्ते स्वच्छ व विजेरी दिव्यांची सोय असणारी असेल. जागो जागी कचरा पेटीची सुविधा तसेच सांडपाण्याची सोय केलेली असेल. करमणुकीची साधने, प्रेक्षणीय स्थळे असेल. माझ्या शहरात भ्रष्टाचार, चोरी याला स्थान मिळणार नाही.

3) औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो. 

उत्तर :

i) औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावरील उदयोगधंदे सुरू झाले. 

ii) एखाद्या प्रदेशांमध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला साहाय्यभूत ठरणारा घटक आहे. 

iii) औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंद्यात वृद्धी झाली. उद्योगधंदयांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात, त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 

4) प्रदूषण- एक समस्या

उत्तर :

i) प्रदूषण म्हणजे घातक दुषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरणात होणारा निचरा. सामान्यतः प्रदूषण हा मानवी क्रिया-प्रक्रियांचा परिणाम आहे. अशी कोणतीही मानवी क्रिया जिचे परिणाम नकारात्मक ठरतात, तिला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण ही शहरांमधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. 

ii) प्रदूषणामध्ये वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण यांचा समावेश होतो. 

iii) शहरांचा वाढता विकास, सोईसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यांमुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 

iv) शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणातदेखील वाढ होते. 

v) प्रदूषणामुळे अनेक आजार उद्भवतात जसे श्वसनाचे विकार, बहिरेपणा.

5) स्वच्छ भारत अभियान

उत्तर :

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५० व्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी ‘स्वच्छ भारत अभियानाची’ संकल्पना मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर २०१४ या दिवशी हातात झाडू घेऊन साफसफाई करत ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ उद्घाटन केले. मोंदीनी सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली. तर ‘एक कदम, स्वच्छता की ओर’ या घोष वाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील असा आशय व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदींनी इंडिया गेटमधून या राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. पण, गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न अजून अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहने मोदी यांनी केले आहे.

स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण भारतातील अस्वच्छता दूर करणे हा असून याद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात करून जनतेच्या मनोवृत्तीत बदल घडून आणण्याचा प्रयत्न या अभियानात केला जात आहे. 

प्रश्न. 7. खालील छायांचित्रांतील नागरीकरणाच्या समस्यांवर उपाय सुचवा. 

उतर :

1) वायूप्रदूषणावरील उपाय – i) घरे, फॅक्टरी, वाहने यांपासून निघणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमीत कमी ठेवा. 

ii) फटाक्यांचा वापर करून नका. 

iii) केरकचरा केराच्या कुंड्यांमध्ये टाका, जाळू नका. 

iv) सर्वाना वायूप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

2) ध्वनी प्रदूषणावरील उपाय – i) टिव्ही आणि म्युझिक सिस्टमचा आवाज कमी ठेवा. 

ii) गाडीचा हॉर्न क्वचितच वाजवा. 

iii) लाउडस्पीकरच्या वापरास प्रोत्साहन देऊ नका. 

iv) लग्नाच्या वरातीत बॅन्ड व फटाक्यांचा वापरू नका. 

v) सर्वाना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

3) मृदा प्रदूषणावरील उपाय – i) रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा वापर करावा. पॉलिथिनच्या ऐवजी कॉटन, ज्युटचा वापर करावा. 

ii) पॉलिथिनच्या पिशव्यांची विल्हेवाट योग्य त्या प्रकारे लावा. 

iii) जास्तीत जास्त झाडे लावा. 

iv) सर्वाना रासायनिक प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

v) सेंद्रीय शेतीचा वापर करणे, रासायनिक खते, किटकनाशके मर्यादित वापरावे. 

4) जल प्रदूषणावरील उपाय – i) सार्वजनिक नळ, विहिरी आणि इतर पाणीसाठ्यांजवळ केरकचरा टाकू नये. 

ii) पाण्याच्या सार्वजनिक पाइपांचा गैरवापर करू नका. 

iii) फक्त अधिकृत जागेवरच पवित्र मूर्तीचे विसर्जन करा. 

iv) सर्वाना जल प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्यास सांगा. 

v) शाडूमातीच्या मूर्ती आणि नैसर्गिक रंग वापरुन सात्विक आनंद घ्यावा.

vi) कारखान्यात दूषित पाणी प्रक्रिया करून नदीत सोडावे. 

व्यापार स्वाध्याय

व्यापार स्वाध्याय 

व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी

व्यापार स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा. 

अ) महाराष्ट्र व पंजाब

आ) भारत व जपान

इ) लासलगाव व पुणे

ई) चीन व कॅनडा

उ) भारत व युरोपीय संघ

उत्तर :

प्रश्न. 2. खालील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा. 

1) भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो. 

उत्तर :

आयात

2) कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो. 

उत्तर :

निर्यात

3) जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो. 

उत्तर :

निर्यात

प्रश्न. 3. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 

1) भारत हा देश स्वयंपूर्ण आहे. 

उत्तर :

भारत हा देश स्वयंपूर्ण नाही.

कारण – भारताला काही बाबींसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागते. उदा. पेट्रोल. 

2) ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

जय ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. 

3) स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापराची प्रक्रिया सहज व सोपी असते. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे. 

स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. 

4) आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते. 

उत्तर :

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते

प्रश्न. 4. पुढील उदाहरणांतील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा. 

1) सृष्टीने किरणा दुकानातून साखर आणली. 

उत्तर :

किरकोळ व्यापार

2) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. 

उत्तर :

घाऊक व्यापार

3) समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली. 

उत्तर :

आंतरराष्ट्रीय व्यापार

4) सदाभाऊंनी घाऊक मार्केटमध्ये दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 पोती तांदूळ विकत आणले. 

उत्तर :

घाऊक व्यापार

प्रश्न. 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा. 

2) व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा. 

उत्तर :

व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक पुढीलप्रमाणे आहे

१) प्रतिकूल व्यापार संतुलन- i) जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. 

ii) या व्यापार संतुलनाच्या प्रकारात आयातीचे मूल्य जास्त असते व निर्यातीचे मूल्य कमी असते.

२) अनुकूल व्यापार संतुलन- i) जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. 

ii) व्यापार संतुलनाच्या प्रकारात निर्यातीचे मूल्य जास्त असते व आयातीचे भूत कमी असते.

३) संतुलित व्यापार- i) जेव्हा आयात व निर्यातमूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.

ii) या व्यापार संतुलनाच्या प्रकारात आयातीचे व निर्यातीचे मूल्य समान असते.

3) जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. 

उत्तर :

जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत. i) आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. 

ii) व्यापारविषयक मतभेद हाताळणे. 

iii) राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे. 

iv) विकसनशील देशांसाठी तांत्रिक साहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.

4) ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा. 

ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक – 

 ओपेक व्यापार संघटना

 आपेक व्यापार संघटना

 i) खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे. हे कार्य ओपेक ही संघटना करते. 

ii) ही संघटना सदस्य देशांतील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करते. 

i) आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, हे कार्य आपेक ही संघटना करते. 

ii) ही संघटना सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याल प्रोत्साहन देते. 

5) आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा. 

उत्तर :

आशिया खंडातील सार्क या व्यापार संघटनेचे कार्य –

i) दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे.

ii) सदस्य देशांतील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे.

iii) दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. 

6) शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. 

उत्तर :

शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व –

i) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळण्यासाठी विपणनाची आवश्यकत असते.

ii) शेतकऱ्यांना आपल्या मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करण्यासाठी विपणन महत्त्वाचे असते.

iii) शेतमालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशाप्रकारे सादर केला जातो, यांवरून त्या मालाची किंमत ठरते. जर शेतमालाबाबत कमतरता असली तर बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही. म्हणून विपणन व्यवस्था महत्त्वाची असते.

iv) विपणनाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपरमार्केटमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे त्या शेतमालाला अधिक किंमत मिळते.

प्रश्न. 6. खालील तक्त्यात सन २०१४-२०१५ सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जोड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा. 

  उत्तर :

 देश 

निर्यात मूल्य  

आयात मूल्य 

 चीन 

२१४३  

१९६०  

 भारत

२७२  

३८०  

 ब्राझील 

१९०  

२४१  

 संयुक्त संस्थाने

१५१०  

२३८०