वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते

प्रश्न

 वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते. 

उत्तर

 

 

i) एखादया वस्तूचे वस्तुमान (m) म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप होय. परिणामी वस्तूचे वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते.
ii) एखादया वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वजन, W=mg. या सूत्रानुसार, गुरुत्वीय त्वरण (g) चे  मूल्य सगळीकडे सारखे नसल्याने, वस्तूचे वजन स्थलपरत्वे बदलते.

आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो

प्रश्न

 आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो.

उत्तर

 

 

चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण हे पृथ्वीवरील गुरुत्वीय त्वरणाच्या सुमारे 1/6 असते.  त्यामुळे आपण ठरावीक आरंभ वेगाने पृथ्वीपेक्षा चंद्रावर जास्त उंच उडी मारू शकतो. h = u2/2g या सूत्रावरून हे दिसून येते.

निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा

प्रश्न

 निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. 

उत्तर

 

 

निवडणूक आयोग पुढील कार्ये करतो –

i) मतदार यादया तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे.

ii) निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे.

iii) उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे.  

iv) निवडणुका घेणे व त्यासंबंधीची सर्व कामे करणे.

v) राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे.

vi) निवडणुकीसंबंधातील सर्व वाद वा तक्रारींचे निवारण करणे.

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते

प्रश्न 

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते

 उत्तर 

 

हे विधान चूक आहे; कारण –

i) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.

ii) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.

iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.

भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा

प्रश्न

 भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.

उत्तर

 

 

i) स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता. 
ii) महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बाली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान समेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
iii) स्वातंत्र्योत्तर काळात कूळ कायदयासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. 

iv) शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती करावी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.

लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या दोन पद्धती लिहा

प्रश्न

 लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या दोन पद्धती लिहा

उत्तर

 

 i) लोखंडावर रंग, तेल किंवा ग्रीस यांचा थर लावला असता गंज रोखता येतो. 

ii) लोखंडाचा गंज किंवा क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला आहे.

आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे

प्रश्न

 आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे.

उत्तर

 

 

i) जहाज, रेल्वे आणि विमान या वाहतूक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीमुळे आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन सोपे झाले आहे.

ii) विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगती व आर्थिक उदारीकरण यांमुळे जग अधिक जवळ आले आहे.

iii) अभ्यास, व्यवसाय, चित्रपटांचे चित्रीकरण यांसारख्या विविध कारणांसाठी लोक विविध ठिकाणी जात असतात.

iv) खेळ, आंतरराष्ट्रीय परिषदा, संमेलने, ऐतिहासिक धार्मिक स्थळे पाहणे या उद्देशानेही लोक जगभर हिंडत असतात. 

त्यामुळे आजच्या काळात लोकांचे परदेशात जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत आहे.

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा

प्रश्न

 कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. 

उत्तर

 

 

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत’ मांडला. त्याच्या मते – 

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. 

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो. 

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.

तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते

प्रश्न

 तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

उत्तर

 

 

i) कालप्रवाहात विविध विचारसरणींचा उगम होत असतो.

ii) या विविध विचारसरणींचा समाजावर विविध काळात कमी-जास्त प्रभाव पडलेला असतो.

iii) या विविध विचारसरणींचा उगम कसा झाला, त्यामागील वैचारिक परंपरा कोणत्या होत्या, यांचा शोध घेण्याची गरज असते.

iv) या विचारसरणींच्या वाटचालींचा, त्यांच्या विकास-विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा

प्रश्न

 कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा

उत्तर

 

 

कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली :

i) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 

ii) कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते ?

iii) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती ? 

iv) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते ? 

v) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो?

vi) कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो? 

vii) कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतो खबरदारी घेतली जाते ? 

viii) पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?