ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?
उत्तर :
ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
i) भारत व ब्राझील या दोन्ही देशांत वाढत्या लोकसंख्येला निवासासाठी जागा अपुरी पडत आहे.
ii) निवासासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात.
iii) ब्राझीलमध्ये ‘रोका’ आणि भारतात ‘झूम’ यांसारख्या स्थलांतरित शेतीसाठी वनांखाली असलेली जमीन वृक्षतोड करून किंवा जाळून शेतीसाठी व अधिवासासाठी मोकळी केली जाते.
iv) लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनांतील झाडे तोडली जातात.