पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा

प्रश्न

 पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

उत्तर

 

 

i) पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताचीच नव्हे, तर जागतिक समस्या बनली आहे. 

ii) पर्यावरणाचा न्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी बासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या,

iii) भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत.

iv) ‘चिपको’ सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, ‘नमामि गंगे’ सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, जैवविविधतेचे संरक्षण यासारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.

समजातीय श्रेणी म्हणजे काय

समजातीय श्रेणी म्हणजे काय

उत्तर : 

कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. 

समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा

समजातीय श्रेणी म्हणजे काय ? समजातीय श्रेणीची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर : 

समजातीय श्रेणी : कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. लगतच्या दोन संयुगांमध्ये (वरच्या व खालच्या) एक – CH2 – गटाचा फरक असतो.

उदाहरणे :

अल्केन : अल्केन कुल हे समजातीय श्रेणीचे आहे आणि त्याचे सामान्य सूत्र CnH2n+2 असे आहे. 

समजातीय श्रेणीची वैशिष्ट्ये : 

i) समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमाने जाताना – (अ) एका मेथिलिन (CH2) घटकाची भर पडते. (आ) रेणुवस्तुमान 14u ने वाढते. (इ) कार्बन अणूंची संख्या 1 ने वाढते. 

ii) समजातीय श्रेणीतील संयुगात समान क्रियात्मक गट असल्याने रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य असते.

iii) समजातीय श्रेणीच्या सर्व संयुगांसाठी एकच सामान्य रेणुसूत्र असते. 

iv) समजातीय श्रेणीत चढत्या क्रमाने जाताना संयुगांच्या उत्कलनांक, द्रवणांक यांसारख्या भौतिक गुणधर्मांमध्ये प्रवणता दिसून येते..

शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे

 

 समस्येवर उपाय सुचवा

प्रश्न

शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे

उत्तर

 

उपाय – i) ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात शहरामध्ये निवासव्यवस्था शासनामार्फत वाढवावी. 

ii) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारनिमित्त शहरात येतात. या स्थलांतरित लोकांसाठी ते जेथे राहतात तेथे रोजगार निर्मिती व्हावी. तेथे लघुउद्योग, कुटिरोदयोग सुरू करून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पर्यायाने ते स्थलांतरित होणार नाही व झोपडपट्ट्यांच संख्या वाढणार नाही. 

ii) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना शासनांचा योजनेमार्फत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दयावी.

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो

प्रश्न

प्रत्यक्ष सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो. 

किंवा 

सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो. 

उत्तर

 

 

i) सूर्याकडून आलेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांत गेले असता सूर्य दिसतो. पृथ्वीभोवती सुमारे 300km जाडीचे वातावरण आहे. त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात त्यांचे अपवर्तन होते. प्रवेश करतात, तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात, म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. 

ii) अशा वेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा भास होतो. म्हणून सूर्योदयापूर्वी काही काळ व सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणांस क्षितिजावर दिसतो.

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला

भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला

उत्तर :

कारण i) भारताने शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग या धोरणास अनुसरून भारताने १८ में १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी केली. 

ii) चीनची अण्वस्त्रसज्ज आणि पाकिस्तानची चीनच्या मदतीने अण्वस्त्रसज्ज होण्यास चाललेली धडपड सुरू होती. त्यामुळे भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला.

पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा

प्रश्न

 पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

उत्तर

 

 

पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार –

i) ऐतिहासिक पर्यटन : पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.

ii) भौगोलिक पर्यटन : अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.

iii) आंतरराष्ट्रीय पर्यटन : आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोर्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते.

हिवाळ्यात कधी कधी रात्री दव पडते

प्रश्न

  हिवाळ्यात कधी कधी रात्री दव पडते. 

उत्तर

 

 

i) हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचे तापमान दवबिंदू तापमानइतके कमी किंवा त्याहूनही कमी होऊ शकते. 

ii) तापमान दवबिंदू तापमानापेक्षा खाली गेल्यास हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होते आणि ती थंड पृष्ठभागावर जमा होते. थंड पृष्ठभागावर जमा झालेले हे पाणी म्हणजेच दव होय. 

संविधानाची वाटचाल स्वाध्याय

संविधानाची वाटचाल स्वाध्याय

संविधानाची वाटचाल स्वाध्याय इयत्ता दहावी

 

१. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 

1. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ………….. जागा राखीव ठेवण्यास आलेल्या आहेत.

उत्तर : महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी 50 % जागा राखीव ठेवण्यास आलेल्या आहेत.

2. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वत:चा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे ?

उत्तर : हुंडाप्रतिबंधक कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वत:चा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे.

3. लोकशाहीचा गाभा म्हणजे ……………….

उत्तर : लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण.

२. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण

i) भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.

ii) संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

iii) सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट १८ वर्ष पूर्ण अशी केल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही; म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.

2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. 

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण

i) लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परांवरील विश्वास वाढण्यासाठी शासन काय करीत आहे, हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक असते.

ii) पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची वैशिष्ट्ये या अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात.

iii) शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली; म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे.

3. संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण

i) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते.

ii) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.

iii) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

३. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1. हक्काधारित दृष्टिकोन

उत्तर :

i) स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकधिक रुजावी प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.

ii) लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नगरिकांकडे केवळ ‘लाभार्थी’ म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारांचा दृष्टिकोन होता.

iii) मात्र इ.स. 2000 नंतरच्या काळात मात्र ‘नागरिकांचा हक्क’ ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या.

iv) म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा; म्हणून कायदे केले गेले नाहीत; तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच ‘हक्काधारित दृष्टिकोन’ असे म्हणतात.

2. माहितीचा अधिकार

उत्तर :

i) शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी, शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्परांविषयी विश्वास वाढावा यासाठी २००५ साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला.

ii) गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत.

iii) शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि आपण जनतेला उत्तरदायी आहोत, याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते.

iv) माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली आहे.

3. लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

उत्तर :

i) संविधानकारांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे धोरण स्वीकारून दोहोंनाही समान राजकीय अधिकार प्रदान केले.

ii) त्यामुळे १९५२ च्या पहिल्या लोकसभेत २२ महिला निवडून आल्या होत्या. ही संख्या वाढत जाऊन २०१९ च्या निवडणुकीत ही संख्या ७८ वर जाऊन पोहोचली आहे.

iii) लोकसभेच्या एकूण जागांच्या ५०% जागा स्त्रियांसाठी राखून ठेवाव्यात, असे विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले आहे.

iv) स्त्रियांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व वाढल्यास स्त्रियांवरील अन्याय दूर होईल आणि देशाच्या निर्णयप्रक्रियेतील स्त्रियांचा सहभाग वाढेल.

४. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1. मतदारांचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?

उत्तर :

भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने –

i) युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले.

ii) आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.

iii) यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.

iv) या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.

2. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ?

उत्तर :

सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे –

i) ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.

ii) व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.

iii) जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठकनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.

iv) सर्वांना विकासाची समान संधी देणे.

3. न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे. 

उत्तर :

न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.

i) घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायदयांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

ii) वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.

iii) प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.

iv) खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.

द्विविभाजन म्हणजे काय

द्विविभाजन म्हणजे काय 

बऱ्याच आदिकेंद्रकी पेशी, काही आदिजीव व दृश्यकेंद्रकीपेशीतील काही पेशी अंगके या पद्धतीने प्रजनन करतात. यापद्धतीत जनक पेशीचे दोन समान किंवा जवळजवळ समान भागांत विभाजन होते. या प्रत्येक नवजात पेशीत मूळ (जनक) पेशीच्या आकाराइतके वाढण्याची क्षमता असते. 

अमिबात पेशीद्रव्याचे विभाजन कोणत्याही अक्षातून (साधे विभाजन) होते. तर काही सजीवांमध्ये पेशी विभाजन विशिष्ट अक्षातून होते. (आडवे किंवा उभे द्विभाजन) 

अमिबातील_द्विविभाजन
अमिबातील द्विविभाजन