भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते

उत्तर :

i) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे.

ii) भारताच्या एकूण लोकसंख्येतील सुमारे ५१ टक्के लोकसंख्या ही कार्यशील आहे.

iii) भारतातील लोकसंख्येत अकार्यशील (ज्येष्ठ नागरिक व बालक) गटातील लोकांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. म्हणून भारताकडे तरुण देश म्हणून पाहिले जाते.

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो

उत्तर :

i) भारत देश सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले.

ii) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो.

iii) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणेमुळे भारतात आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारताची लोखसंख्या जास्त असून भारतात शेती-उद्योगधंद्याचा विकास झाला आहे. म्हणून भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते

उत्तर :

i) कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.

ii) जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.

iii) ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते. म्हणून, ब्राझील देशास जगाचा कॉफी पॉट’ असे संबोधले जाते.

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

1) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ………………….. 

i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

उत्तर : 

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी …………………… 

i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते. 

ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 

iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 

iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात. 

उत्तर :

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ………………

i) १५ मिनिटांचा फरक असतो. 

ii) ०४ मिनिटांचा फरक असतो. 

iii) ३० मिनिटांचा फरक असतो. 

iv) ६० मिनिटांचा फरक असतो. 

उत्तर :

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ०४ मिनिटांचा फरक असतो. 

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1. स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते

उत्तर :

कारण  i) पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते.. 

ii) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा २४ तासांचा कालावधी होय. 

iii) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जस जसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वांत कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वांत लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. 

iv) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. 

2. ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

उत्तर :

कारण  i) देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. 

ii) जागतिक व्यवहाराच्यादृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. 

iii) ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच ०° रेखावृत्त आहे म्हणून ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

3. भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे

उत्तर :

कारण  i) उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबादजवळील मिर्झापूर शहरावरून जाणारे ८२°३०’ पूर्व हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. 

ii) या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. म्हणून भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

4. कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

उत्तर :

कारण  i) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात. 

ii) कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोईचे होत नाही. म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा

उत्तर :

i) कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. 

ii) पूर्वेकडून पश्चिमेकडे अंतर कमी होत जाते. म्हणून ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर रात्रीचे ३ वाजले असतील.

2. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते

उत्तर :

i) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. 

ii) देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. 

iii) म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.

3. ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा

उत्तर :

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ ही आधीच्या दिवसाचे रात्रीचे ९.३० वाजले असतील.

प्रश्न. 4. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब,क, या ठिकाणाची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.   

 ठिकाण रेखावृत्त  दिनांक  वेळ  
 अ  १२०°  
 ब  १६०°  
 क ६०°  

उत्तर :

 ठिकाण रेखावृत्त  दिनांक  वेळ  
 अ  १२०° २२ जून संध्याकाळचे ६:००  
 ब  १६०° २० जून रात्रीचे १:००  
 क ६०° २२ जून दुपारचे २:००  

प्रश्न. 5. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतीखाली चोेकटीत लिहा.  

उत्तर :

why is dna replication called semi-conservative

why is dna replication called semi-conservative

Ans :

Because each newly synthesized DNA molecule contains one original (parental) strand and one newly synthesized (daughter) strand, DNA replication is known as being “semi-conservative”. In their 1953 paper outlining the structure of DNA, James Watson and Francis Crick introduced this phrase.

The double-stranded DNA molecule unwinds during DNA replication, and each strand acts as a model for the synthesis of a new complementary strand. The procedure goes like this:

The complementary bases of the two DNA strands are exposed when they are split apart.

DNA polymerases are enzymes that add complementary nucleotides to each template strand while adhering to the A with T and C with G base-pairing rules.

As a result, two new DNA molecules are created, each of which contains one strand from the original DNA molecule and one that was recently synthesized strand.

The process is correctly referred to as “semi-conservative” because each new DNA molecule contains one strand from the original DNA and one newly synthesized strand. Each newly formed DNA molecule contains a portion of the original DNA molecule.

The other two proposed models of DNA replication were “dispersive” (where the DNA molecule is broken up into fragments and mixed with newly synthesized DNA fragments) and “conservative” (where the original DNA molecule is preserved in its entirety and a completely new DNA molecule is produced). The semi-conservative model put forth by Watson and Crick, however, was firmly supported by experimental data, including the well-known Meselson-Stahl experiment from 1958.

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय इयत्ता आठवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. 

1) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील ………………….. 

i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.

iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

उत्तर : 

पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. 

2) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी …………………… 

i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते. 

ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो. 

iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो. 

iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात. 

उत्तर :

पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.

3) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ………………

i) १५ मिनिटांचा फरक असतो. 

ii) ०४ मिनिटांचा फरक असतो. 

iii) ३० मिनिटांचा फरक असतो. 

iv) ६० मिनिटांचा फरक असतो. 

उत्तर :

कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ०४ मिनिटांचा फरक असतो. 

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1. स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते

उत्तर :

कारण  i) पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते.. 

ii) पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशांनुसार त्यात बदल होतो. परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजे एक दिवसाचा किंवा २४ तासांचा कालावधी होय. 

iii) सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबवर पडते. जस जसा सूर्य आकाशात वरवर येईल तसतशी सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वांत कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. सावली ज्या वेळी सर्वांत लहान असते, ती त्या ठिकाणची मध्यान्हाची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे १२ वाजले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. 

iv) एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो, तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. यावरून हे स्पष्ट होते की स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते. 

2. ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते

उत्तर :

कारण  i) देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. 

ii) जागतिक व्यवहाराच्यादृष्टीने देखील निरनिराळ्या देशातील प्रमाणवेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजे शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे. 

iii) ग्रीनीच शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणजेच ०° रेखावृत्त आहे म्हणून ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.

3. भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे

उत्तर :

कारण  i) उत्तरप्रदेश राज्यातील अलाहाबादजवळील मिर्झापूर शहरावरून जाणारे ८२°३०’ पूर्व हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. 

ii) या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. म्हणून भारताची प्रमाण वेळ ८२°३०’ पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.

4. कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत

उत्तर :

कारण  i) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व-पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा ठिकाणी एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात. 

ii) कॅनडाचा पूर्व-पश्चिम रेखावृत्तीय विस्तार खूपच मोठा असल्याने एकच प्रमाण वेळ मानणे सोईचे होत नाही. म्हणून कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.

प्रश्न. 3. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा

उत्तर :

i) कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तांवरील वेळ पुढे असते, तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ मागे असते. 

ii) पूर्वेकडून पश्चिमेकडे अंतर कमी होत जाते. म्हणून ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर रात्रीचे ३ वाजले असतील.

2. एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते

उत्तर :

i) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. 

ii) देशात प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. 

iii) म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ निश्चित केली जाते.

3. ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा

उत्तर :

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ ही आधीच्या दिवसाचे रात्रीचे ९.३० वाजले असतील.

प्रश्न. 4. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब,क, या ठिकाणाची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.   

 ठिकाण 

रेखावृत्त  

दिनांक  

वेळ  

 अ 

 १२०°

 

 

 ब 

 १६०°

 

 

 क

 ६०°

 

 

उत्तर :

 ठिकाण 

रेखावृत्त  

दिनांक  

वेळ  

 अ 

 १२०°

 २२ जून 

संध्याकाळचे ६:००  

 ब 

 १६०°

 २० जून 

रात्रीचे १:००  

 क

 ६०°

 २२ जून 

दुपारचे २:००  


प्रश्न. 5. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती ‘क’ या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतीखाली चोेकटीत लिहा.  

उत्तर :

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इयत्ता नववी

भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय इतिहास 

प्रश्न. 1. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या

उत्तर :

‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने पुढील मागण्या केल्या. चंदीगढ पंजाबला दयावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. सैन्यामधील पंजाबचे संख्याप्रमाण वाढवावे, पंजाब राज्यासअधिक स्वायत्तता द्यावी.

2) जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे

उत्तर :

सर्वांनी धार्मिक जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

i) त्यासाठी भिन्नधर्मीय लोकांत आपण मिसळले पाहिजे. उत्तर चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहिजेत.

ii) परस्परांच्या सणउत्सवांत सहभागी झाले पाहिजे.

iii) एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सद्विचार आपण स्वीकारले पाहीजेत.

iv) आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपणांस तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे. या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. हे सर्व जमातवाद नष्ट करण्यासाठी केले पाहिजे.

3) प्रदेशवाद केव्हा बळावतो

उत्तर :

i) ‘प्रदेशवाद’ म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.

ii) इतर प्रांतीयांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत अशी भावना निर्माण होणे. हा अवाजवी प्रांताभिमान होय.

iii) जेव्हा आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला अशा अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते तेव्हा प्रदेशवाद बळावतो.

प्रश्न. 2. टिपा लिहा

1) जमातवाद

उत्तर :

i) जेव्हा धर्माच्या अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रुपांतर दरभिमानात होते. तेव्हा त्याला जमातवाद असे म्हणतात.

ii) आपलाच धर्म श्रेष्ठ आणि इतर लोकांचा धर्माला कमी लेखणे यालाच जमातवाद असे म्हणतात.

iii) अर्थात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होता.

2) प्रदेशवाद

उत्तर :

i) प्रदेशवाद म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे होय.

ii) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मियतेला अवाजवी प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त होते. यालाच प्रदेशवाद म्हणतात.

iii) आपल्या प्रांतावर प्रेम असणे स्वाभाविक आहे परंतु त्याचे विकृतीकरण नसावे. या विकृतीकरणातून प्रदेशवाद निर्माण होतो.

iv) विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादाला खतपाणी मिळते.

प्रश्न. 3. का ते लिहा. 

1) ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले

उत्तर :

कारण – i) १९८० साली पंजाबमध्ये ‘स्वतंत्र खलिस्तान’ या चळवळीने मूळ धरले.

ii) सुवर्णमंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेलसिंग भिंद्रानवाले याच्याभोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले.

iii) या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. १९८१ मध्ये संपादक लाला जगतनारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली.

iv) भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाहीसमोर हे मोठे आव्हान होते. म्हणून सुवर्णमंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले.

2) जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे

उत्तर :

कारण – i) संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे.

ii) माणसामाणसांतील विश्वास हाच सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक ऐक्यास तडा जातो.

iii) सामाजिक ऐक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य साधणार नाही म्हणूनच जमातवादाचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे.

प्रश्न. 4. पुढील संक्षिप्त रुपाचे पूर्ण रूप लिहा. 

1) MNF 

उत्तर :

मिझो नॅशनल फ्रॅट

2) NNC

उत्तर :

नागा नॅशनल कौन्सिल

3) PLGA

उत्तर :

पीपल्य लिबरेशन गुरिला आर्मी

इयत्ता नववी इतिहास सर्व स्वाध्याय साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने स्वाध्याय

2. भारत : 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय

3. भारतापुढील अंतर्गत आव्हाने स्वाध्याय

4. आर्थिक विकास स्वाध्याय

5. शैक्षणिक वाटचाल स्वाध्याय

6. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण स्वाध्याय

7. विज्ञान व तंत्रज्ञान स्वाध्याय

8. उद्योग व व्यापार स्वाध्याय

9. बदलते जीवन : भाग – 1 स्वाध्याय

10. बदलते जीवन : भाग – 2 स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय

अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी

अंतर्गत हालचाली स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा. 

1) अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत ?

भरूपांवर

गतीवर  

दिशेवर

2) मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात, तेव्हा काय निर्माण होतो ?

दाब

ताण  

पर्वत

3) खचदरी निर्माण होण्यासाठी भुकवचावर हालचालींची कोणती क्रिया घडावी लागते ?

ताण  

दाब

अपक्षय

4) खालीलपैकी ‘वली पर्वत’ कोणता ?

सातपुडा

हिमालय  

पश्चिम घाट

5) विस्तीर्ण पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भू-हालचालींचा परिणाम आहे ?

पर्वतनिर्माणकारी

खंडनिर्माणकारी  

क्षितिजसमांतर

प्रश्न. 2. भौगोलिक कारणे लिहा. 

1) हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

उत्तर ;

कारण – i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते.

ii) या ऊर्जालहरी भूपृष्ठाकडे येतात. या लहरी घन, द्रव वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.

iii) या प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती मागेपुढे हलतात. अशाप्रकारे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या या कारणांमुळे जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.

2) मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. 

उत्तर :

कारण – i) मेघालय पठार व दख्खन पठार हे दोन्ही पठार असूनही त्यांची निर्मिती वेगवगेळ्या प्रकारे झाली आहे.

ii) मेघालय पठाराची निर्मिती विभंगामुळे झाली आहे. हे गट पर्वताचे उदाहरण आहे. तर दख्खनचे पठार हे भेगीय ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे. म्हणून मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.

3) बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. 

उत्तर :

कारण – i) भूपट्ट सीमांचा ज्वालामुखीक्षेत्राशी थेट संबंध आहे.

ii) भूपट्ट सीमांवर वर्तमान वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्याचे अवशेष तिथे जागृत असतात. ही सतत होणारी क्रिया असते. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.

4) बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

उत्तर :

कारण – i) बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे क्षेत्र आहे. हा ज्वालामुखी गेली कित्येक वर्षे सुप्त अवस्थेत होता. परंतु फेब्रुवारी २०१७ पासून या ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे.

ii) या उद्रेकातून प्रामुख्याने धूळ, धूर आणि चिखल बाहेर पडत असून काही प्रमाणात लाव्हारससुद्धा बाहेर पडत आहे.

iii) या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या या पदार्थाच्या संचयनामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.

5) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

उत्तर :

कारण – i) सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळते.

ii) ज्वालामुखीय प्रक्रिया ही भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

iii) भूकंप व ज्वालामुखीमुळे या प्रक्रिया भूअंतस्थ बदलामुळे होतात, तसेच भूकंप व ज्वालामुखी हे पृथ्वीच्या अंतर्गत भागात होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनाचे परिणाम आहेत. म्हणून ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.

प्रश्न. 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. 

1) किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात. 

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – भूकंप, ज्वालामुखी

2) हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. 

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली

3) पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. 

उत्तर :

शीघ्र भू-हालचाली – ज्वालामुखी

4) प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते. 

उत्तर :

मंद भू-हालचाली – पर्वतनिर्माणकारी हालचाली.

प्रश्न. 4. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा. 

1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो. 

2) भूपट्ट अचानक हलतात. 

3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. 

4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात. 

5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. 

उत्तर :

3) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.

5) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.

2) भूपट्ट अचानक हलतात.

1) पृथ्वीच्या पृष्ठभाग हलतो.

4) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.

प्रश्न. 5. फरक स्पष्ट करा. 

1) गट पर्वत व वली पर्वत

उत्तर :

 गट पर्वत 

 वली पर्वत 

 

i) भूकवचातील खडकांवर ताण पडल्याने किंवा कठीण खडकांवर प्रचंड दाब पडल्याने खडकांमध्ये विभंग तयार होतात. या विभांगांच्या पातळीवर खडकांची हालचाल होते. काही वेळा दोन विभंगामधला खडकांचा भाग जास्त उंचीवर उचलला जातो. त्याद्वारे गट पर्वतांची निर्मिती होते. त्यांना गट पर्वत असे म्हणतात. 

ii) युरोपमधील ब्लॅक फॉस्फेट पर्वत, भारतातील मेघालय पठार.  

i) पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे भुकवचातील मृदू खडकांच्या थरांवर दाब पडतो व मृदू खडकांच्या थरांमध्ये वळ्या तयार होतात. परिणामत: खडक जास्त उंचीवर उचलेले जातात. यातून ज्या पर्वतांची निर्मिती होते त्यांना वली पर्वत असे म्हणतात. 

ii) हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. 

2) प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी

उत्तर :

 प्राथमिक भूकंप लहरी

दुय्यम भूकंप लहरी 

  

i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात. 

ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागपुढे होते. 

iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करतात. मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.  

i) प्राथमिक लहरींच्यानंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्यालहरींना दुय्यम लहरी म्हणतात. या लहरी नाभीकेंद्रापासून चहूबाजूंना पसरतात. 

ii) या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने लंबरूप म्हणजे वर-खाली होते. 

iii) या लहरी फक्त घनपदार्थातून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थात शिरल्यावर त्या शोषल्या जातात. 

3) भूकंप व ज्वालामुखी

उत्तर :

 भूकंप 

ज्वालामुखी 

 

i) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भुकवचात प्रचंड ताण निर्माण होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो व तेथे ऊर्जालहरी निर्माण होतात. यामुळे भूपृष्ठ कंप पावते, यालाच भूकंप असे म्हणतात. 

ii) भूकंपामुळे इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते. 

iii) काही वेळा भूकंपामुळे भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.  

i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायूरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वलामुखीचा उद्रेक होय. 

ii) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होऊ शकते. 

iii) मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवरे निर्माण होतात.

प्रश्न. 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1) भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

i) भूपट्ट सरकणे – दृढ शिलावरण हे स्वतंत्र अशा अनेक भूपट्टापासून बनले आहेत. भूपट्ट दुर्बलावरण या स्तरावर तरंगत आहे. हे भूपट्ट तरंगत -असतांना एकमेकांना घसटत एकमेकांपासून दूर सरकतात. त्यामुळे भूकंप होतो.

ii) भूपट्ट एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो.

iii) भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे – भूअंतर्गत शक्ती व बाह्यशक्तींचा भूपृष्ठावर परिणाम होत असतो. भूहालचालींमुळे भूपृष्ठावरील किंवा भूपृष्ठाखालील खडकांवर दाब किंवा ताण पडून खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात. त्यामुळे खडकांचे समतोलत्व बिघडते आणि खडक दुभंगतात व त्याचे स्थानांतर होते. खडक खाली सरकतात किंवा वर उचलले जातात.

iv) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होतो.

v) ज्वालामुखीचा उद्रेक – सर्वसाधारणपणे ज्या भागात ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्या भागात भूकंपाचे धक्के नेहमी बसत असल्याचे आढळतात. म्हणजेच ज्वालामुखीय प्रक्रिया ही, भूकंप निर्मितीचे महत्त्वाचे कारण आहे अशा भूकंपांना ज्वालामुखीय भूकंप असे म्हणतात.

2) जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?

उत्तर :

i) मंद भू-हालचालींमुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते. या ऊर्जालहरींमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्याची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते.

ii) म्हणजेच जगातील प्रमुख वली पर्वत मंद भू-हालचालींच्या पर्वतनिर्माणकारी हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.

3) भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे ?

उत्तर :

i) भूकंपाच्या धक्क्यामुळे भूपृष्ठाचा काही भाग प्रसरण पावतो त्यात ताण निर्माण होतात व कमी-अधिक लांबी, रुंदी व खोली असलेल्या भेगा पडतात.

ii) तीव्र भूकंपामुळे ज्या जमिनीवरून पृष्ठतरंग प्रवास करतात त्या भागातील जमीन वर-खाली हेलकावताना दिसते. भेगेलगतची जमीन खचल्यामुळे अनेक वस्त्या गाडल्या जातात. म्हणून भूकंपाची तीव्रता व घराची पडझड यांचा फार जवळचा संबंध आहे.

4) भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते ?

उत्तर :

भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.

i) भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात.

ii) भूमिपात होऊन दरडी कोसळतात.

iii) काही वेळा भूजलाचे मार्ग बदलतात. उदा. विहिरींना पाणी येते किंवा विहिरी कोरड्या पडतात.

iv) काही प्रदेश उंचावले जातात, तर काही प्रदेश खचतात.

v) सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. या लारामळे किनारी भागात मोठी जीवित व वित्तहानी होऊ शकते.

vi) हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोमळतात.

vii) इमारती कोसळून जीवितहानी व वित्तहानी होते.

viii) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात.

ix) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.

5) भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर :

भूकंप लहरींचे प्रमुख तीन प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1) प्राथमिक लहरी – i) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात. भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रित्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरीना प्राथमिक लहरी म्हणतात.

ii) या लहरीच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होतात.

iii) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू शकतात, मात्र द्रवरूपातील प्रावरणातून प्रवास करतांना त्याच्या दिशेत बदल होतो.

iii) प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठवरील इमारती पुढे-मागे हलतात.

2) दुय्यम लहरी – i) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर पोहचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा ‘S’ लहरी म्हटले जाते.

ii) या लहरीही नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.

iii) या लहरींच्या मार्गातील खडकांमधील कण, लहरींच्या वहनाच्या दिशेने म्हणजेच वरखाली होतात.

iv) या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात. परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोषल्या जातात.

v) या लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.

3) भूपृष्ठ लहरी – i) प्राथमिक व दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोहचल्यानंतर भूपृष्ठ लहरीची निर्मिती होते.

ii) या लहरी भूकवचात पृथ्वीच्या परिघाच्या दिशेत प्रवास करतात.

iii) त्या अतिशय विनाशकारी असतात.

6) ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.

उत्तर :

i) पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ‘ज्वालामुखीचा उद्रेक होय.

ii) ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. भूपृष्ठावर आल्यावर शिलारसाला लाव्हारस म्हटले जाते.

iii) ज्वालामुखीच्या उद्रेकाचे स्वरूपानुसार खालील दोन प्रकार / वर्गीकरण केले जाते.

1) केंद्रीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखादया नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात.

ii) बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती पसरतो, त्यामुळे शंकुच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात.

iii) जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणे आहेत.

2) भेगीय ज्वालामुखी – i) ज्वालामुखीचा उद्रेक होताना लाव्हारस ज्या वेळेस अनेक भेगांतून बाहेर पडतो तेव्हा त्यास भेगीय ज्वालामुखी म्हणतात.

ii) ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ तडांच्या दोन्ही बाजूंस पसरतात, त्यामुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.

iii) भारतातील दख्खनचे पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळे तयार झाले आहे.

उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे तीन प्रकार होतात.

3) जागृत ज्वालामुखी – वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदा. जपानच्या फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.

4) सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी – काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, अशा ज्वालामुखीला सुप्त/निद्रिस्त ज्वालामुखी म्हणतात. उदा. इटलीतील व्हेसुव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट.

5) मृत ज्वालामुखी – ज्यातून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, अशा ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात. उदा. टांझानियातील किलीमांजारो.

प्रश्न. 7. आकृतीच्या साहाय्याने अपिकेंद्र, नाभी, भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. 

उत्तर :

प्रश्न. 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा. 

1) माउंट किलोमांजारो 

2) मध्य अटलांटिक भूकंपक्षेत्र

3) माउंट फुजी

4) क्रॅकाटोआ

5) माउंट व्हेसुव्हियस

उत्तर :

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी

वितरणाचे नकाशे स्वाध्याय इयत्ता नववी भूगोल

प्रश्न. 1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

उत्तर :
हे विधान योग्य आहे.

कारण – i) आलेख किंवा आकृत्याद्वारे दर्शविण्यात येणारी आकडेवारी नकाशा शिवायही दाखविता येते परंतु या आकडेवारीचे स्थानिक वितरण नकाशाद्वारे व्यक्त केले तर ते खऱ्या अर्थाने भौगालिक वितरण दर्शविते. 

ii) वितरणाच्या नकाशांमुळे भौगोलिक घटकांचा त्या स्थानिय वितरणावर कसा परिणाम झाला आहे हे यातून स्पष्ट होते. म्हणून वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो.

2. क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण. – i) या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. 

ii) हे नकाशे काढताना घटकांच्या मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो. 

iii) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतली जाते. त्यासाठी त्यांचे साधारणतः ५ ते ७ गटांत वर्गीकरण केले जाते व प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात. यावरून हे सिद्ध होते की क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. 

3. क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत.

उत्तर :
हे विधान अयोग्य आहे.
कारण – i) प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्यांचे साधारणत: ५ ते ७ गटांत वर्गीकरण करतात. 
ii) प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. 

iii) ते वापरतांना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात. म्हणजेच क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलतात.

4. क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.

उत्तर : 

हे विधान अयोग्य आहे . 

कारण – i) क्षेत्रघनी नकाशा लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी वापरतात. 

ii) तर समघनी नकाशा उंची दाखविण्यासाठी वापरतात. 

iii) समधनी नकाशात उंची दाखविण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. तर क्षेत्रघनी नकाशात रंगछटांचा उपयोग केला जातो.

5. लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. 

उत्तर :

हे विधान अयोग्य आहे.

लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. 

कारण – i) दिलेल्या भौगोलिक घटकाच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशात संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते. 

ii) त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे व कोणत्या प्रदेशात कमी आहे याचे नकाशावरून सहज ज्ञान होते.

6. टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे. 

उत्तर :

हे विधान योग्य आहे. 

कारण – टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबाचे मूल्य ठरवावे लागते. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते. म्हणून टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक योग्य प्रमाण असावे.

7. समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करत नाहीत.
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे. 
कारण – समघनी नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले जातात. 
i) समघनी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते. 
ii) ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्ये असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. म्हणजेच यावरून हे सिद्ध होते की समघनी नकाशे सममूल्य रेषांनी तयार करतात.

8. टिंब पद्धती वापरून वेगवेगळ्या भौगोलिक घटकांचे वितरण दाखवता येते. 
उत्तर :
हे विधान अयोग्य आहे. कारण 
i) क्षेत्रघनी नकाशा पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही 
सहज समजते. 

ii) एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात.

प्रश्न. 2. थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. 

उत्तर : 
वितरणाच्या नकाशांचे उपयोग – i) प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करणे. 
ii) घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो.

वितरणाच्या नकाशाचे प्रकार –

i) टिंब पद्धत 
ii) क्षेत्रघनी पद्धत 

iii) समधनी पद्धत

2. समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक

उत्तर :

 समघनी पद्धत 

 क्षेत्रघनी पद्धत

 

i) समघनी पद्धतीतील क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. 

ii) समघनी नकाशे तयार करण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर करतात. 

iii) सममूल्य रेषा जवळजवळ असतील, तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. 

iv) प्रदेशाची उंची, तापमान पर्जन्य दाखविण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. 

 

 

i) क्षेत्रघनी पद्धतीत प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. 

ii) क्षेत्रघनी नकाशांसाठी एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध वापरले जातात. 

iii) रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतीबंध हे वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात. 

iv) लोकसंख्येची घनता दाखविण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 

3. प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी कोणती पद्धती उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दर्शवण्यासाठी टिंब पद्धत उपयुक्त असते.

कारण – 

i) टिंब पद्धत ही अत्यंत सोपी पद्धत आहे. 

ii) या पद्धतीद्वारे भौगोलिक घटकांचे वितरण स्पष्टपणे दाखविता येते. तसेच भौगोलिक वितरणही सहज समजते. कारण एखादया भौगोलिक घटकाच्या दाट वितरणाचे व विरळ वितरणाचे प्रदेश सहज लक्षात येतात. 

iii) एका टिबांची ठराविक किंमत असल्यामुळे एखाद्या प्रदेशातील टिंबाची संख्या मोजून घटकाचे संख्यात्मक मूल्य काढता येते. 

iv) सामान्य माणसाला हा नकाशा सहज समजतो.

प्रश्न. 3. खालील माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल ? 

1) जिल्ह्यातील गव्हाचे तालुकानिहाय उत्पादन.

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत

2) जिल्ह्यातील प्रदेशाच्या उंचीचे वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत

3) राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण. 

उत्तर :

टिंब नकाशा पद्धत

4) भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण. 

उत्तर :

क्षेत्रघनी नकाशा पद्धत

5) महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण. 

उत्तर :

समघनी नकाशा पद्धत. 

प्रश्न. 4. कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्या वितरणाचा नकाशा अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1) जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण कोणत्या पद्धतीने दाखवले आहे ?

उत्तर :

 जिल्ह्यातील लोकसंख्येचे वितरण टिंब पद्धतीने दाखवले आहे. 

2) दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे वितरण स्पष्ट करा. 

उत्तर :

दिशाच्या संदर्भात उत्तर व पूर्व दिशेत लोकसंख्येचे वितरण दाट आहे. तर पश्चिम दिशेत लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. 

3) सर्वात मोठा गोल असलेल्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे ? ते ठिकाण कोणते ?

उत्तर :

सर्वात मोठा गोल कोल्हापूर (करवीर तालुका) या ठिकाणी आहे. त्याची लोकसंख्या वीस लाख इतकी आहे. 

4) सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

उत्तर :

सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका गगनबावडा हा आहे.